शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कोरोना संसर्गात भाजीपाला सडतोय शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेणे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची उपलब्धता गत पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भाजीपाला पीक घेत आहे. परंतु गतवर्षी पासून कोरोना संसर्गाने भाजीपाला उत्पादक मोठ्या अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीचा परिणाम : बाजारपेठ बंद, माल विकायचा कुठे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्राला बसत असताना आता संचारबंदीने भाजीपाला पिकविणारे शेतकरीही उद्ध्वस्त होत आहेत. शेतात पिकलेला भाजीपाला कुठे विकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाम गाळून पिकविलेला भाजीपाला अनेक शेतातील बांधांवर सडत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे. प्रचंड मेहनत करून पिकविलेले पीक मातीमोल होताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची कालवाकालव होत आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेणे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची उपलब्धता गत पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भाजीपाला पीक घेत आहे. परंतु गतवर्षी पासून कोरोना संसर्गाने भाजीपाला उत्पादक मोठ्या अडचणीत आले आहे. गतवर्षी बसलेला फटका भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या जोमात भाजीपाला पिकाची लागवड केली. टोमॅटो, वांगे, भेंडी, कारले, मिरची, चवळी यासह विविध पिके लावली. मात्र, गत महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यातच अलीकडे संचारबंदी घोषित केल्याने बाजारपेठाही बंद झाल्या आहेत. परिपक्व झालेला भाजीपाला तोडणे गरजेचे असते. मात्र, बाजारपेठच बंद आहे तर माल विकायचा कुठे, असा प्रश्न आहे. काही शेतकऱ्यांनी तर टोमॅटोसारखे पीक तोडून बांधावर फेकून दिले आहे. 

भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नाही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकण्याचा या काळात प्रयत्न चालविला आहे. मात्र, तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च आणि बाजारातील भाव याचे गणित लागत नाही. दहा किलो वांगी विकून भजी खाण्याएवढेही पैसे घरी येताना शेतकऱ्याच्या हाती येत नाहीत. सध्या भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत. ठोक दरात वांगी पाच रुपये किलो, भेंडी दहा रुपये किलो, कारले १२ रुपये किलो, टोमॅटो चार रुपये किलो, तर चवळी दहा रुपये किलो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता शेतातील भाजीपाला तोडतच नसल्याचे दिसत आहे.एकरी ५० ते ६० हजारांचे नुकसान  भंडारा जिल्ह्यात तंत्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला पीक घेतले जाते. मल्चिंग पेपर, ठिंबक सिंचन व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला एकरी सरासरी ५० ते ६० हजार रुपये मिळतात. मात्र, सध्याची स्थिती पाहता हातात काहीही येण्याची शक्यता दिसत नाही. पालांदूर येथील प्रभाकर कडुकार म्हणाले, यंदा शेतात टोमॅटो आणि वांगी लावली आहेत; परंतु बाजारपेठ बंद असल्याने शेतातच माल झाडाला तसाच आहे. संचारबंदीत माल विकावा कुठे, असा प्रश्न आहे. बळिराम बागडे म्हणाले, कारले आणि भेंडीच्या भरवशावर वर्षभराचे नियोजन केले होते; परंतु आता कोरोना संचारबंदीने आम्ही पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत. संचारबंदी काही काळ वाढविण्यात आली तर आम्हाला शेतातील माल फुकटात वाटायची वेळ येईल.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या