शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

कोरोना संसर्गात भाजीपाला सडतोय शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेणे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची उपलब्धता गत पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भाजीपाला पीक घेत आहे. परंतु गतवर्षी पासून कोरोना संसर्गाने भाजीपाला उत्पादक मोठ्या अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीचा परिणाम : बाजारपेठ बंद, माल विकायचा कुठे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्राला बसत असताना आता संचारबंदीने भाजीपाला पिकविणारे शेतकरीही उद्ध्वस्त होत आहेत. शेतात पिकलेला भाजीपाला कुठे विकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाम गाळून पिकविलेला भाजीपाला अनेक शेतातील बांधांवर सडत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे. प्रचंड मेहनत करून पिकविलेले पीक मातीमोल होताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची कालवाकालव होत आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेणे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची उपलब्धता गत पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात बहुतांश शेतकरी भाजीपाला पीक घेत आहे. परंतु गतवर्षी पासून कोरोना संसर्गाने भाजीपाला उत्पादक मोठ्या अडचणीत आले आहे. गतवर्षी बसलेला फटका भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या जोमात भाजीपाला पिकाची लागवड केली. टोमॅटो, वांगे, भेंडी, कारले, मिरची, चवळी यासह विविध पिके लावली. मात्र, गत महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यातच अलीकडे संचारबंदी घोषित केल्याने बाजारपेठाही बंद झाल्या आहेत. परिपक्व झालेला भाजीपाला तोडणे गरजेचे असते. मात्र, बाजारपेठच बंद आहे तर माल विकायचा कुठे, असा प्रश्न आहे. काही शेतकऱ्यांनी तर टोमॅटोसारखे पीक तोडून बांधावर फेकून दिले आहे. 

भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नाही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकण्याचा या काळात प्रयत्न चालविला आहे. मात्र, तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च आणि बाजारातील भाव याचे गणित लागत नाही. दहा किलो वांगी विकून भजी खाण्याएवढेही पैसे घरी येताना शेतकऱ्याच्या हाती येत नाहीत. सध्या भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत. ठोक दरात वांगी पाच रुपये किलो, भेंडी दहा रुपये किलो, कारले १२ रुपये किलो, टोमॅटो चार रुपये किलो, तर चवळी दहा रुपये किलो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता शेतातील भाजीपाला तोडतच नसल्याचे दिसत आहे.एकरी ५० ते ६० हजारांचे नुकसान  भंडारा जिल्ह्यात तंत्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला पीक घेतले जाते. मल्चिंग पेपर, ठिंबक सिंचन व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला एकरी सरासरी ५० ते ६० हजार रुपये मिळतात. मात्र, सध्याची स्थिती पाहता हातात काहीही येण्याची शक्यता दिसत नाही. पालांदूर येथील प्रभाकर कडुकार म्हणाले, यंदा शेतात टोमॅटो आणि वांगी लावली आहेत; परंतु बाजारपेठ बंद असल्याने शेतातच माल झाडाला तसाच आहे. संचारबंदीत माल विकावा कुठे, असा प्रश्न आहे. बळिराम बागडे म्हणाले, कारले आणि भेंडीच्या भरवशावर वर्षभराचे नियोजन केले होते; परंतु आता कोरोना संचारबंदीने आम्ही पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहोत. संचारबंदी काही काळ वाढविण्यात आली तर आम्हाला शेतातील माल फुकटात वाटायची वेळ येईल.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या