शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

‘वरूणराजा’ बरसतोय! पण कुठे?

By admin | Updated: August 1, 2016 00:12 IST

‘मान्सुन येणार’ हा शब्द ऐकुणच दु:ख बाजुला सारून बळीराजा मशागतीच्या कामाला सुरूवात करतो.

शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला : सर्वदूर दमदार पावसाची गरज, जिल्ह्यात फक्त २७ टक्केच रोवणी, भारनियमनाचे संकट डोक्यावरभंडारा : ‘मान्सुन येणार’ हा शब्द ऐकुणच दु:ख बाजुला सारून बळीराजा मशागतीच्या कामाला सुरूवात करतो. नेहमीप्रमाणे उशिरा का असेना पाऊस बसरतोही. पेरणीच्या कामाला प्रारंभ होतो. परंतु पावसाची दगाबाजी कायम होत असल्याने सद्यस्थितीत तरी शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. वरूणराजा बरसतोय पण कुठे, हा प्रश्न बळीराजासमोर आहे. जिथे पाऊस बसरला तिथे आनंद असला तरी जिथे पावसाची हजेरी नसल्याने जिल्ह्यात ‘कुठे खुशी कुठे गम’चा प्रत्यय येत आहे. भंडारा शहरात आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. मागील २४ तासात पावसाने जिल्ह्यातील सातही तालुक्यात कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली असली तरी बळीराजा समाधानी नाही. लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. या पावसाने काही परिसरातील शतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोनशे मीटर परिघात पाऊस बसरतो पण त्यानंतर पावसाचा थांगपत्तानसतो. कुठे कुठे गावात पाऊस तर शेत शिवारात पाण्याचा शिरकाव नाही. काही ठिकाणी स्थिती यापेक्षा विरूद्ध आहे. या विचित्र स्थितीने जिल्ह्यात सरासरी जवळपास २७ टक्के रोवणी झाली आहे. मोहाडी, लाखनी, लाखांदुर, साकोली, तुमसर तालुक्तातही पेरणीची कामे आटोपली असली तरी पावसाअभावी रोणवी खोळंबली आहे. लाखांदूर/दिघोरी : लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. एकट्या दिघोरी परिसरात फक्त ३५ टक्के रोवणी झाली आहे. येथ कल शनिवारी पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली.पवनी/भुयार : तज्ञांनी यावर्षी भरपूर पावसाची भविष्यवाणी वर्तविली होती. महिन्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र मागील आठ पंधरवाड्यापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर मधील भात पिकाची रोवणी खोळंबली असून शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. दरम्यान काल शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने याचा फटका भाजी बाजाराला बसला. जुलैच्या सुरूवातीत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली मात्र एक आठवड्यानंतर अचानक पावसाने दडी मारली तसाही या परिसरात पाऊन असमाधानकारक राहील आहे. बहुतांश भात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्याचा भात पिकाच्या रोवणीवर जास्तच बसला आहे. सुरूवातीला बरसलेल्या दमदार पावसामुळे हंंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांनी शेतीची कामे आटोपून भात पिकाचे पऱ्हे टाकले. कसा शेतीचा पुढील हंगाम केला मात्र पाऊन अचानक दिसेनासा झाला त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था असली तरी विद्युत पुरवठा वेळोवेळी मिळत नाही. रीमझिम पाऊस काही दिवस चालल्याने रोवणीला कशीबसी सुरूवात झाली. काही शेतकऱ्यांनी उशिरा पऱ्हे टाकल्याने सडण्याच्या भितीने साचलेले पाणी बाहेर काढावे लागले. त्यामुळे दमदार पाऊस शेतकऱ्याच्या कामी पडला नाही. तेव्हापासून पाऊस अचानक गायब आहे. निलज आमगाव परिसरात २५ टक्के रोवणी झाली असली तरी भुयार परिसरात ५० टक्के रोवणी खोळंबली आहे. काही शेतकरी दुरवरून, पाणी शेतात आणून रोवणी करीत आहे. मोहाडी : तालुक्यात पावसाची हजेरी अजुनपर्यंत लागलेली नाही. ढग जमतात, पण बसरत नाही, अश्ी स्थिती आहे. परिणामी शेतकरी चितेंच्या गर्तेत सापडला आहे.लाखनी/पालांदूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका थेट बळीराजाला भोगावा लागत आहे. २८ टक्केच शेती सिंचित क्षेत्रात असून ७२ टक्के आजही निसर्गाच्या आश्रीत आहे. मागील १० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला होता. काल सायंकाळच्या सुमारास आठवडी बाजार जोमात असताना वरुणराजा मेहरबान झाला. सरीवर सरी कोसळत ८०-९० मिनिटात समाधानकारक पाऊस झाला. त्याची ७६.२ मि.मी. नोंद करण्यात आली. यामुळे खोळंबलेली रोवणी सुरू झाली आहे. रोवणी झालेल्या शेतात जमीनींना पाण्याअभावी भेगा पडून धान पिवळे पडले. काल बरसलेल्या पावसाने खंडीत पडलेली रोवणी पुन्हा आजपासून पुर्ववत सुरु झाली. यासंदर्भात मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंज म्हणाले, ५ हजार ५१४ हेक्टर धान क्षेत्रापैकी ३ हजार ३२ हेक्टरवर रोवणी झालेली आहे. आवत्या १ हजार ५० हेक्टरवर तर २६१ हेक्टरवर अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी रोवणी ५५ टक्केच आटोपली आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)लाखनी तालुक्यात अतिवृष्टीजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली. मागील २४ तासात भंडारा तालुक्यात ९ मिमी, मोहाडी निरंक, तुमसर निरंक, पवनी ५९.८, साकोली १७.४, लाखांदूर १९.२ तर लाखनी येथे ८४.८ मिमी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली. सध्यास्थितीत ३१ जुलैपर्यंत बरसणाऱ्या पावसाची सरासरी ८४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही सरासरी थोडी अधिक आहे. मात्र वरुणराजाची कृपादृष्टी एकाच परिसरात जास्त प्रमाणात असल्याने दुसरीकडे दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. अशा स्थितीत बळीराजावर आर्थिक संकट बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सध्या स्थितीत सर्वदूर पावसाची गरज आहे.