शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

गोसेखुर्द शेतकऱ्यांसाठी ‘वर’दान

By admin | Updated: August 2, 2015 00:47 IST

गोसीखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतू गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी पुरेशा प्रमाणात सिंचनासाठी उपलब्ध होवू शकले नाही.

सिंचनाचे भिजत घोंगडे : बळीराजाला आस प्रकल्पाच्या पाण्याचीअशोक पारधी पवनीगोसीखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतू गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी पुरेशा प्रमाणात सिंचनासाठी उपलब्ध होवू शकले नाही. राष्ट्रीय प्रकल्प घोषित होवूनही सिंचन होवू शकले नाही. ३७२ कोटी रूपयाचा हा प्रकल्प १८११० कोटी रूपयावर पोहचला. परंतू प्रकल्पाचे पाणी २० कि़मी.च्या पुढे पाठविण्याची क्षमता निर्माण होवू शकली नाही. विदर्भाच्या वाट्याला मुख्यमंत्री व अर्थमंत्री ही दोन महत्वाची खाती मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.गोसीखुर्द प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली त्यावेळी रूपये ३७२ कोटी एवढीसी किंमत ठरविण्यात आली. त्यानंतर प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार रूपये २०९१ कोटी किंमत आकारण्यात आली. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार रूपये ५६५९ कोटीवर किंमत पोहचली. गोसीखुर्द प्रकल्पात केंद्रीय जल आयोग नवी दिल्लीच्या तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली व त्यानुसार ७७४८ कोटी किंमत निश्चित करण्यात आली. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प झाल्यास राज्य शासनाकरीता भार कमी होईल व केंद्राचे निधीमधून प्रकल्प पूर्ण होईल असा ठाम विश्वास जनतेला व लोकप्रतिनिधींना होता. निकड लक्षात घेवून केंद्र शासनाने २६ फेब्रुवारी २००९ रोजी गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. कामसुद्धा गतीने सुरू झाले परंतू सिंचनाची सोय व्हावी म्हणून बांधकाम करण्यात आलेल्या उजव्या व डाव्या कालव्याचे कामात अनियमितता व प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे पाहणी करणाऱ्या केंद्रीय चमुच्या लक्षात आले आणि केंद्राचा निधी मिळण्यास राज्य शासनाला अडचणी निर्माण झाल्या. प्रकल्पाचे काम पुन्हा रखडले. प्रकल्पाचा उजवा कालवा भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १,३३,३३२ हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरवठा करू शकणार आहे. परंतू उजव्या कालव्याद्वारे १२७२ हेक्टर क्षेत्रात सिंचन होवू शकले आहे. पावसाअभावी दुष्काळी स्थितीयंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. रोवणीस सुरूवात झाली, परंतु रोवणी थांबली. गोसीखुर्द प्रकल्प जिल्ह्यात असताना शेतकऱ्यांना पावसाचे पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रकल्प वेळीच पूर्ण झाला असता, तर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली असती.