शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

रोजगार हमी योजना कामात गैरप्रकार

By admin | Updated: May 29, 2014 23:48 IST

करडी येथे सन २0१४ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला.

करडी (पालोरा) :  करडी येथे सन २0१४ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला. कामावर न गेलेल्या स्त्रि-पुरुषांचे नावे पेमेंट काढले गेले. तलावातून काढलेले गाळ शेतकर्‍यांच्या शेतात न घालता राजकीय व्यक्तींच्या प्लाटवर घातले गेले. एकूणच रोहयो कामे  अर्धे आम्ही अर्धे तुम्ही या धर्तीवर केले गेल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे.करडी येथे रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे व गाळ शेतकर्‍यांच्या शेतावर टाकण्याचे काम हाती घेतले गेले. योजनेनुसार खोलीकरणात निघालेले गाळ शेतकर्‍यांच्या शेतात त्यांच्या मागणीनुसार  घालायचे होते. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने शेतकर्‍यांकडून सातबारा मागविला. शेतकर्‍यांनी दिलेल्या सातबारानुसार प्रती किती ट्रॅक्टर गाळ शेतकर्‍यांना द्यायचे याचे नियोजन केले गेले. मात्र त्यानंतर काही दिवसातच नियोजनाला मूठमाती देत मनमर्जीने कामे करणे सुरू झाले.खोलीकरणातून निघालेली माती शेतकर्‍यांच्या शेतात न घालता ग्रामपंचायत कमेटी व प्रथम पुरुष यांच्या संगनमताने गावातील काही लोकांच्या प्लॉटवर घालण्यात आली.गावातील सहकारी सेवा संस्था यांच्या जागेवर माती घालण्याची आवश्यकता असतानासुद्धा पूर्ण प्लॉटवर माती घालण्यात आली नाही. कामावर कधीही न गेलेल्या पुरुष व स्त्री मजुरांचे नावे वेतन काढल्या गेले.सदर रोजगार हमीचे कामकाज काम तसे दाम या म्हणीनुसार न होते, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही या म्हणीनुसार  झाले. सदर गैरप्रकारात रोहयो तांत्रिक पॅनल अभियंता व प्रथम पुरुष यांचा सिंहाचा वाटा असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.उपरोक्त कामाची तात्काळ चौकशी  करण्याची मागणी आहे. त्याचबरोबर तलावाचे खोलीकरण काम सुरू झाल्यापासून कोणकोणत्या शेतकर्‍यांना किती ट्रॅक्टर माती देण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी व गावकरी वामन राऊत, प्रभाकर गाढवे, मुकेश आगाशे, नितीन कारेमोरे, डुलीचंद साठवणे, प्रकाश डोरले, यादोराव बांते, दिनेश राऊत, दिलीप साठवणे, राजेश साठवणे, शांताबाई साठवणे, योगेश तितीरमारे, नंदकिशोर बुधे, गणेश ठवकर यांनी केली आहे. (वार्ताहर)