शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अटकेच्या भीतीने म्होरक्या भूमिगत

By admin | Updated: September 13, 2014 23:39 IST

वाघ व बिबट कातडीच्या तस्करीत वन विभागाला आवश्यक असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी भूमिगत झाला आहे. यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली असून आता डब्ल्यूसीसी

वाघाची कातडी प्रकरण : डब्ल्यूसीसी करणार अटकेची कारवाईप्रशांत देसाई - भंडारा वाघ व बिबट कातडीच्या तस्करीत वन विभागाला आवश्यक असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी भूमिगत झाला आहे. यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली असून आता डब्ल्यूसीसी अटकेची कारवाई करणार आहे.विदर्भातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदेसह वन्यप्राण्यांची संख्याही जास्त आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ व ओडिशा येथील काही शिकारी टोळ्यांनी वन्यप्राण्यांना आपले लक्ष केले आहे. मागील काही दिवसात वन्यप्राण्यांच्या शिकारींच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात वाघांची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शिकार झालेल्या वाघांची कातडी विकणाऱ्या अनेकांना वनविभागाने अटकेची कारवाई केली. अशाच एका कारवाईत वाघाच्या कातडीसह भंडारा जिल्ह्यात तस्करांना पकडले होते. त्यांच्या माहितीवरून ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यातील हनमंतू साहूच्या अटकेची कारवाई २९ आॅगस्टेला करण्यात आली होती. हनमंतूचा ९ सप्टेंबरपर्यंत वनकोठडीत ठेवण्यात आले होते. यावेळी त्याने, 'त्याचा वाघ कातडीत सहभाग नाही' असे सांगितले होते. वाघ कातडीचा मुख्य आरोपी एका राजकीय पक्षाचा पुढारी असून त्याचे नाव माजी व अन्य एकाचे गणेश गौडा असल्याचे वनविभागाला सांगितले.हनमंतूच्या सांगण्यावरून वन विभागाने माजीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. त्याने अटकेमुळे परिसरातील गावात राजकीय प्रतिमा मलिन होईल, असे कारण पुढे करून स्वत: वनविभागापुढे आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्याच्या भुलथापाला वनविभाग बळी पडला व अटकेची कारवाई करण्याऐवजी त्याची वाट बघत बसले होते. दरम्यान हनमंतुच्या वनकोठडीची मुदत संपली व त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार असल्याने त्याची बहिण भेटायला भंडारा येथे आली होती. वनाधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन वाघ कातडीच्या तस्करी प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी तिनेही माजी व गौडाचे नाव घेतल्याचे समजते. ती गावाला पोहचल्यावर वनविभागाने माजीशी पुन्हा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्याने भंडारा येथे जात असल्याचे सांगितले व घरून निघाला. मात्र अटकेची कारवाई होणार असल्याने माजी भुमिगत झाला आहे.वनविभाग तीन दिवसांपासून माजीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याचा भ्रमणध्वनी बंद असल्याची माहिती मिळत आहे. वनविभागाच्या 'थांबा, आरोपी येत आहे' या भुमिकेमुळे त्याला फरार होण्याची संधी मिळाली. वनविभागाने वेळीच अटकेची कारवाई केली असती तर माजी वनविभागाच्या ताब्यात असता. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्युसीसी) ही पंतप्रधानांच्या अखत्यारित काम करणारी संस्था असून त्यांच्या नेतृत्वात माजी व गौडाला अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. राज्याची डब्ल्युसीसी ओडिशातील बोर्डाशी संपर्क साधुन त्यांच्या सहकार्यातून माजी व गौडाला अटकेची कारवाई करणार आहेत. फरार दोघांनाही ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहे. लवकरच दोघेही वन विभागाच्या जाळ्यात अडकणार असल्याचा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक उपवनसंरक्षक (भरारी पथक) अधिकारी विनय राठोड यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला.