शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

जिल्हा रुग्णालयात दररोज हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:12 IST

दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे.

ठळक मुद्देवातावरणातील बदल : गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण, खासगी रुग्णालयातही वाढली गर्दी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे. वाढत्या गर्दीने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेक जण आर्थिक परिस्थिती नसतानाही खासगी रुग्णालयाचा रस्ता धरत आहेत. सध्या वातावरणातील बदलाने गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण दिसत आहेत.पावसाने दडी मारल्यापासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. गत दीड महिन्यांपासून दररोज उन्हाळ्यासारखी उन्ह तापत आहे. गत आठवडाभरापासून रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहाटे बोचरी थंडी ग्रामीण भागात जाणवते. या विषम वातावरणामुळे आजाराने डोके वर काढले आहे. डोकेदुखी, सर्दी, पडसे, ताप यासह विविध आजाराचे रुग्ण गावागावात दिसून येत आहेत. अंग कणकण वाटायला लागले की रुग्ण सुरुवातीला एखादी गोळी घेऊन घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यातून बरे वाटले नाही की रुग्णालयात धाव घेते. ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतात. मात्र या ठिकाणी त्यांना समाधानकारक उपचार मिळत नाही. त्यामुळे सर्वांची धाव भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे असते. शुक्रवारी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात ११४० रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी ९४३ रुग्ण येथे उपचारासाठी आले. या गर्दीवरूनच ग्रामीण भागात आजार किती मोठ्या प्रमाणात बळावले हे दिसून येते.आजारी रुग्णांमध्ये सर्वाधिक बालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार होत नसल्याचे कायम ओरड आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात नाईलाजाने धाव घ्यावी लागते. शहरातील बाल रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा नाही. विविध चाचण्या करून उपचार करण्याच्या पद्धतीने रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर वेळेवर येत नाही. रात्रीच्या वेळी तर शिपायाशिवाय रुग्णालयात कुणीही भेटत नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभारही गत काही दिवसांपासून ढेपाळल्याचे जाणवत आहे.जिल्हा रुग्णालयाला घाणीचा विळखाभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येते. रुग्णांसोबत असणाºया नातेवाईकांचा रुग्णालयाला कायम गराडा पडलेला असतो. खर्रा, पानाच्या पिचकाºया आणि तंबाखू यामुळे रुग्णालयाच्या भिंती रंगल्या आहेत. रुग्णालयातील प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. रुग्णालयाच्या परिसरात रस्त्यावर पार्कींग केली जाते. रुग्णालय परिसरात कायम दुर्गंधी असते.शिस्तीसाठी हवेत डॉक्टर मालेभंडारा येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.एकनाथ माले कार्यरत होते. शिस्तप्रिय असलेल्या डॉक्टरांनी या रुग्णालयालाही शिस्त लावली होती. या ठिकाणी येणाºया प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी तपासणी केली जात होती. तंबाखू, खर्रा आदी एका बॉक्समध्ये टाकल्या जात होता. तसेच अंतर्गत आणि बाह्य स्वच्छताही दररोज होत होती. आता येथील गचाळ अवस्था पाहून येथे जाणाºया प्रत्येकांना डॉक्टर एकनाथ माले यांची प्रकर्षाने आठवण येते.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत ती कमीच आहे. विविध रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टर व कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. रिक्त पदासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.-डॉ.माधुरी थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय