शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

जिल्हा रुग्णालयात दररोज हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:12 IST

दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे.

ठळक मुद्देवातावरणातील बदल : गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण, खासगी रुग्णालयातही वाढली गर्दी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे. वाढत्या गर्दीने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेक जण आर्थिक परिस्थिती नसतानाही खासगी रुग्णालयाचा रस्ता धरत आहेत. सध्या वातावरणातील बदलाने गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण दिसत आहेत.पावसाने दडी मारल्यापासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. गत दीड महिन्यांपासून दररोज उन्हाळ्यासारखी उन्ह तापत आहे. गत आठवडाभरापासून रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहाटे बोचरी थंडी ग्रामीण भागात जाणवते. या विषम वातावरणामुळे आजाराने डोके वर काढले आहे. डोकेदुखी, सर्दी, पडसे, ताप यासह विविध आजाराचे रुग्ण गावागावात दिसून येत आहेत. अंग कणकण वाटायला लागले की रुग्ण सुरुवातीला एखादी गोळी घेऊन घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यातून बरे वाटले नाही की रुग्णालयात धाव घेते. ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतात. मात्र या ठिकाणी त्यांना समाधानकारक उपचार मिळत नाही. त्यामुळे सर्वांची धाव भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे असते. शुक्रवारी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात ११४० रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी ९४३ रुग्ण येथे उपचारासाठी आले. या गर्दीवरूनच ग्रामीण भागात आजार किती मोठ्या प्रमाणात बळावले हे दिसून येते.आजारी रुग्णांमध्ये सर्वाधिक बालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार होत नसल्याचे कायम ओरड आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात नाईलाजाने धाव घ्यावी लागते. शहरातील बाल रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा नाही. विविध चाचण्या करून उपचार करण्याच्या पद्धतीने रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर वेळेवर येत नाही. रात्रीच्या वेळी तर शिपायाशिवाय रुग्णालयात कुणीही भेटत नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभारही गत काही दिवसांपासून ढेपाळल्याचे जाणवत आहे.जिल्हा रुग्णालयाला घाणीचा विळखाभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येते. रुग्णांसोबत असणाºया नातेवाईकांचा रुग्णालयाला कायम गराडा पडलेला असतो. खर्रा, पानाच्या पिचकाºया आणि तंबाखू यामुळे रुग्णालयाच्या भिंती रंगल्या आहेत. रुग्णालयातील प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. रुग्णालयाच्या परिसरात रस्त्यावर पार्कींग केली जाते. रुग्णालय परिसरात कायम दुर्गंधी असते.शिस्तीसाठी हवेत डॉक्टर मालेभंडारा येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.एकनाथ माले कार्यरत होते. शिस्तप्रिय असलेल्या डॉक्टरांनी या रुग्णालयालाही शिस्त लावली होती. या ठिकाणी येणाºया प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी तपासणी केली जात होती. तंबाखू, खर्रा आदी एका बॉक्समध्ये टाकल्या जात होता. तसेच अंतर्गत आणि बाह्य स्वच्छताही दररोज होत होती. आता येथील गचाळ अवस्था पाहून येथे जाणाºया प्रत्येकांना डॉक्टर एकनाथ माले यांची प्रकर्षाने आठवण येते.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत ती कमीच आहे. विविध रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टर व कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. रिक्त पदासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.-डॉ.माधुरी थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय