शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

तेथे मिळते बालकांना संस्काराची शिदोरी

By admin | Updated: May 11, 2014 00:07 IST

पाश्चिमात्यकरणाच्या ओघात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण संगणक, इंटरनेट अशाच साधनांचा वापर मनोरंजन आणि ज्ञानसंवर्धनासाठी करतात.

भंडारा : पाश्चिमात्यकरणाच्या ओघात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण संगणक, इंटरनेट अशाच साधनांचा वापर मनोरंजन आणि ज्ञानसंवर्धनासाठी करतात. परीक्षा संपली. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की पालकही पाल्यांना अशा वेगवेगळ्या शिबिरांना पाठवून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतात. मात्र अशा आधुनिकीकरणाच्या वातावरणात जरी कुणी हिंदू संस्कृती आणि तिचे संस्कार जीवंत राहावेत म्हणून ‘वारकरी बाल सुसंस्कार’ शिबिर घेत असेल तर ते कौतुकाचेच नाही का? तब्बल १०० हून बालकांवर व्रतबंधनाचे संस्कार करुन एका खेडेगावात सुरू असलेले हे शिबिर एक सुसंस्कारित पिढी घडविण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. पहाटे उठल्यापासून रात्री नीजेपर्यंत सतत सुुरू असलेल्या संस्काराच्या बिजरोपणामुळे नक्कीच शिबिरात आलेले हे शिष्य भविष्यात चांगले नागरिक म्हणून उदयास येतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील टेकेपार नावाचे गाव. या गावात मागील १७ दिवसांपासून एक शिबिर घेतले जात आहे. १० ते १६ वयोमर्यादेच्या बालकांवर चांगले संस्कार व्हावे, वारकरी संप्रदायाची ओळख होऊन या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे रक्षण व्हावे या हेतूने प्रेरित होत हभप कृष्णानंद चेटुले महाराज यांनी त्यांच्या मुळगावी टेकेपार येथे या शिबिराचा घाट घातला. संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम संस्थानात सुरू असलेल्या शिबिरात नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १०० हून अधिक बालके सहभागी झाली आहे. १ मे पासून १२ मे पर्यंत चालणार्‍या या शिबिरात एक सुसंस्कृत शिबिराच्या नावाने सुरू असलेल्या हिंदू संस्कृतीच्या जतनाचा प्रयत्न करणार्‍या या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक अन् प्रत्येक बालकावर शिबिराच्या पहिल्या दिवशी उपनयन संस्कार करण्यात आले. प्रत्येक बालकाचे ‘चौल’ करुन जाणवे परिधान करण्यात आले. आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने संस्काराला सुरुवात झाली. पांढरी बंगाली आणि पायजामा किंवा धोतर असा ड्रेसकोड सर्व प्रशिक्षणार्थींना देण्यात आला आहे. सकाळी उठल्यापासून त्यांची दिनचर्या सुरू होते. योग, प्राणायाम, ध्यान, संस्कृत भाषेचा अभ्यास, गायन म्हणजे भजनाचा सराव, गीतापाठ, विष्णु सहस्त्रनाम, हरिपाठ,प्रवचन अशा अनेक गोष्टी दिवसभरात प्रत्येकाला शिकविल्या जातात. त्यांची उजळणीही नित्याने घेतली जाते. आळंदीहून आलेले श्रीहरी महाराज, विठ्ठल महाराज, हभप जनार्दन कावळे महाराज या सर्वांना अज्ञात्माचे धडे देत आहेत. कोणत्याही प्रकारचा या सर्व गोष्टींचा गंध नसलेल्या बालकांनी शिबिराच्या पहिल्या दिवशी शिबिरात प्रवेश घेतला. मात्र त्यांच्यात झालेला बदल निश्चितच सकारात्मक आहे. ग्रामीण भागातील बहुतांश खेड्यांमधील बालकांचा समावेश या शिबिरात आहे. ज्यांना संस्कृत आणि इतर कोणत्याही गोष्टींचा कधी स्पर्र्शच झाला नाही. अशाही बालकांच्या तोंडात आज संस्कृत शब्द आपोआप येऊ लागले आहेत. मुखपाठ झालेला हरिपाठ, न अडखळता म्हटले जाणारे विष्णसहस्त्रनाम यातून नक्कीच बालकांवर चांगले संस्कार होणार यात शंका नाही. आज बालपणापासून शहरात असल्यास संगणक, इंटरनेटचे वेड किंवा ग्रामीण भागात उनाडक्या करीत फिरणार्‍या बालकांसाठी हा उपक्रम निश्चितच सकारात्मक बदल घडवूून आणणारा आहे. लहानांपासून व्यसनाधीनतेकडे वळणार्‍यांनाही एक दिशा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करीत असल्याचे हभप चेटुले महाराज यांनी सांगितले. भविष्यात मोठ्या स्वरुपात अशा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिराला आतापर्यंत आ.नाना पटोले, जि.प. सभापती अरविंद भालाधरे यांनी भेटी दिल्या. (वार्ताहर)