शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नाममात्र’ ठरल्यात तंटामुक्त गाव समित्या

By admin | Updated: October 20, 2016 00:31 IST

जिल्ह्यातील अनेक गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच असून या समित्यांचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही.

पदाधिकाऱ्यांची उदासीनता : केवळ पुरस्कारासाठी सुरू आहे धडपडभंडारा : जिल्ह्यातील अनेक गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच असून या समित्यांचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही. काही बोटावर मोजण्या एवढ्या गावांच्या तंटामुक्त समित्याच सक्रीय असल्याचे दिसत आहे. तंटामुक्त पुरस्कार मिळविण्यासाठी नेहमीच या गावांची धडपड असते.शासनातच्यावतीने ‘तंटामुक्त गाव योजना’ ही अतिशय क्रांतिकारक योजना राबविल्या जात आहे. गावागावांत शुल्लक कारणावरून होणारे तंटे संपुष्टात यावे आणि गावाला शांततेकडून समृध्दीकडे न्यावे, हा या योजने मागील उद्देश आहे. या योजनेसाठी शासन तंटामुक्त गावासाठी लाखो रूपयांचे प्रोत्साहनपर बक्षिस देते. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटवून आपल्या गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने १५ आॅगष्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली आहे. तत्कालिन दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कार्यकाळात सुरु झालेली ही योजना अतिशय चांगली योजना आहे. या योजनेला सुरुवातीला चांगला प्रतिसादही मिळाला. गावागावांतील तंटामुक्त समित्या सक्रीयपणे काम करीत होत्या. परंतु प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळे मात्र या समित्यांच्या कामाला मर्यादा आली.गावागावांत होणारी भांडणे ही केवळ प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळेच होत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजातील उणीवा याच तंटामुक्त गाव योजनेतील खरा अडसर ठरत आहे. प्रशासकीय कामकाजातील उणिवा दूर केल्या तरच तंटामुक्त गाव योजनेची संकल्पना यशस्वी ठरणार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. तंटामुक्त गाव योजना ही मोहिम राबविताना गावात लोकांना सहज उपलब्ध होणारी दारू ही या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. गावातील बहुतांश तंटे हे दारूमुळे होतात, हे शासनास अभिप्रेत असतानासुध्दा केवळ महसूल मिळावा म्हणून शासन गावात दारू विक्रीचे परवाने देवून दारूची विक्री वाढावी, यासाठी सतत प्रयत्न करीत असते, ही दुर्दैवाची बाब असल्याच्या प्रतिक्रीया येथे उमटत आहे.पोलिस आणि दारूबंदी विभागातील अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीने हातभट्ट्या व अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गावागावांत दारू पिणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतो. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडून फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत असतानाही शासनस्तरावर दारूबंदीसाठी कुठलेही प्रयत्न होत नाही. ५० टक्के महिलांनी ग्रामसभेतून दारूबंदी करण्याचा ठराव पारित करून शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्या गावातील दारू बंद होईल, असा शासन निर्णय आहे. परंतु अशाप्रकारचे ठराव पाठवूनही शासनाने दारूची दुकाने बंद केलेली नाही. शासन जोपर्यंत गावात दारू विक्री बंद करणार नाही, तोपर्यंत दारूमुळे हाणारे फौजदारी स्वरूपाचे तंटे कमीच होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. गावातील काही तंटे रस्त्यावरून, नाल्यावरून, झांज्या सरकण्यावरून, अतिक्रमण सरकण्यावरून होत असतात. अशा कामात नागरिक जेवढे जबाबदार आहेत. तितकाच जबाबदार स्थानिक ग्रामपंचायतीचा कारभार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीचे नकाशे, रस्त्याचे नकाशे, लोकांच्या जागेचे मिळकतीचे दस्तावेज, वेळोवेळी खरेदी विक्री होत असलेल्या नोंदीचे संपुर्ण दस्तावेज ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे गावामध्ये वाढलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रभावीपणे होत नाही. (शहर प्रतिनिधी)