शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

‘नाममात्र’ ठरल्यात तंटामुक्त गाव समित्या

By admin | Updated: October 20, 2016 00:31 IST

जिल्ह्यातील अनेक गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच असून या समित्यांचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही.

पदाधिकाऱ्यांची उदासीनता : केवळ पुरस्कारासाठी सुरू आहे धडपडभंडारा : जिल्ह्यातील अनेक गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच असून या समित्यांचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही. काही बोटावर मोजण्या एवढ्या गावांच्या तंटामुक्त समित्याच सक्रीय असल्याचे दिसत आहे. तंटामुक्त पुरस्कार मिळविण्यासाठी नेहमीच या गावांची धडपड असते.शासनातच्यावतीने ‘तंटामुक्त गाव योजना’ ही अतिशय क्रांतिकारक योजना राबविल्या जात आहे. गावागावांत शुल्लक कारणावरून होणारे तंटे संपुष्टात यावे आणि गावाला शांततेकडून समृध्दीकडे न्यावे, हा या योजने मागील उद्देश आहे. या योजनेसाठी शासन तंटामुक्त गावासाठी लाखो रूपयांचे प्रोत्साहनपर बक्षिस देते. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटवून आपल्या गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने १५ आॅगष्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली आहे. तत्कालिन दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कार्यकाळात सुरु झालेली ही योजना अतिशय चांगली योजना आहे. या योजनेला सुरुवातीला चांगला प्रतिसादही मिळाला. गावागावांतील तंटामुक्त समित्या सक्रीयपणे काम करीत होत्या. परंतु प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळे मात्र या समित्यांच्या कामाला मर्यादा आली.गावागावांत होणारी भांडणे ही केवळ प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळेच होत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजातील उणीवा याच तंटामुक्त गाव योजनेतील खरा अडसर ठरत आहे. प्रशासकीय कामकाजातील उणिवा दूर केल्या तरच तंटामुक्त गाव योजनेची संकल्पना यशस्वी ठरणार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. तंटामुक्त गाव योजना ही मोहिम राबविताना गावात लोकांना सहज उपलब्ध होणारी दारू ही या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. गावातील बहुतांश तंटे हे दारूमुळे होतात, हे शासनास अभिप्रेत असतानासुध्दा केवळ महसूल मिळावा म्हणून शासन गावात दारू विक्रीचे परवाने देवून दारूची विक्री वाढावी, यासाठी सतत प्रयत्न करीत असते, ही दुर्दैवाची बाब असल्याच्या प्रतिक्रीया येथे उमटत आहे.पोलिस आणि दारूबंदी विभागातील अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीने हातभट्ट्या व अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गावागावांत दारू पिणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतो. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडून फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत असतानाही शासनस्तरावर दारूबंदीसाठी कुठलेही प्रयत्न होत नाही. ५० टक्के महिलांनी ग्रामसभेतून दारूबंदी करण्याचा ठराव पारित करून शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्या गावातील दारू बंद होईल, असा शासन निर्णय आहे. परंतु अशाप्रकारचे ठराव पाठवूनही शासनाने दारूची दुकाने बंद केलेली नाही. शासन जोपर्यंत गावात दारू विक्री बंद करणार नाही, तोपर्यंत दारूमुळे हाणारे फौजदारी स्वरूपाचे तंटे कमीच होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. गावातील काही तंटे रस्त्यावरून, नाल्यावरून, झांज्या सरकण्यावरून, अतिक्रमण सरकण्यावरून होत असतात. अशा कामात नागरिक जेवढे जबाबदार आहेत. तितकाच जबाबदार स्थानिक ग्रामपंचायतीचा कारभार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीचे नकाशे, रस्त्याचे नकाशे, लोकांच्या जागेचे मिळकतीचे दस्तावेज, वेळोवेळी खरेदी विक्री होत असलेल्या नोंदीचे संपुर्ण दस्तावेज ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे गावामध्ये वाढलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रभावीपणे होत नाही. (शहर प्रतिनिधी)