शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

गोडावून झाले फुल्ल, धानाची उचल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

मुखरू बागडे पालांदूर : वीस दिवसांपासून धान खरेदी गोडावून विविध समस्यांने बंद होते. धान खरेदी कधी सुरू होणार, ...

मुखरू बागडे

पालांदूर : वीस दिवसांपासून धान खरेदी गोडावून विविध समस्यांने बंद होते. धान खरेदी कधी सुरू होणार, अशी शेतकऱ्यांची रोज विचारणा होत होती. शासनाकडून धान उचल करण्याचे आदेश निर्गमित न झाल्याने गोडावून फुल्ल भरून आहेत. भात गिरणी मालकांच्या समस्या न सुटल्याने धान खरेदी प्रकरण आणखी प्रलंबित राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची धान मोजणीची समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याने शेतकरी समस्येत भर पडली आहे. ढगाळ वातावरणातही गोडावूनच्या मोकळ्या जागेत खुल्या नभाखाली पालांदूर संस्थेने धान मोजणी शेतकरी हितार्थ सुरू केली आहे.

वीस दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शेतकऱ्यांचे धान मोजणी सुरू झालेली आहे. किमान पंधरा हजार क्विंटल धान गोडावूनच्या भव्य पटांगणात गत ६० ते ७० दिवसांपासून अडून पडले आहे. धानाच्या पोत्याची नुकसान झाले आहे. गोडावून परिसरातील मोकाट जनावरेसुद्धा धानाचे नुकसान करीत आहेत. शेतकरी दररोज आपल्या पोत्याची पाहणी करुन घरी निराशेने परत येतो आहे. सेवा सहकारी संस्थेत शेतकरी भेट देत मोजणी करण्याची विनवणी करत आहेत. संस्थाही शेतकऱ्यांची असल्याने मोजणी करणे अत्यावश्यक आहे. परंतु गोडावून भरले असल्याने व आतापर्यंत एकही क्विंटल धानाची उचल न झाल्याने गोडावून भरलेलीच आहेत. शासन-प्रशासन स्तरावरून भात गिरणी मालकांच्या समस्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनीसुद्धा माल न उचलण्याचा हट्ट धरल्याने धान खरेदी प्रभावित झालेली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी केंद्र पालांदूर येथे सुरू झाले आहे. या खरेदी केंद्रावर सुमारे ३९ हजार क्विंटल धानाची खरेदी दोन गोडावूनच्या माध्यमातून आटोपली आहे. गोडावून रिकामे होतील व आपली खरेदीही सुरळीत राहील, अशी आशा असताना, शासनाकडून सहकार्य न मिळाल्याने धान खरेदी नाईलाजाने सुमारे वीस दिवस बंद ठेवावी लागली.

लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकरी व भात गिरणी मालकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेत नसल्याने समस्या प्रलंबित आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालय व भात गिरणी मालकांची बैठका सुरू आहेत. परंतु अजून अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याने आणखी धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात येऊ नये, याकरिता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर यांनी मासिक सभा बोलावून शेतकऱ्यांच्या हितार्थ गोडावूनच्या खुल्या जागेत धान खरेदीचा निर्णय घेतला.

चौकट /डब्बा

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चारही जिल्ह्यांतील धान खरेदी काही प्रमाणात आटोपलेली असून, अडीच महिन्यात एकही क्विंटल धानाचे कोणत्याही भात गिरणी धारकांनी उचल केलेली नाही. शासन व प्रशासनाच्या डोईजड धोरणाने भात गिरणी मालक सुद्धा संकटात सापडले आहेत. वास्तव परिस्थितीचा विचार न करता, अवास्तव नियमांनी भात गिरणी मालकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता असल्याने भात गिरणीधारक डिवो स्वीकारायला तयार नाहीत.

शेतकरी हा आमचा आधार असून, संस्थेला धान खरेदी केंद्र मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा धान मोजणे हे आमची जबाबदारी आहे. १९ जानेवारीपर्यंत ३९ हजार पाचशे तीस क्विंटल धानाची मोजणी आटोपलेली आहे. आणखी १५ ते २० हजार क्विंटल धान मोजणी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने डिवोबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

विजय कापसे,

अध्यक्ष, कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर.