शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्र सुरु करा

By admin | Updated: November 2, 2015 00:48 IST

चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे.

शेतकऱ्यांची मागणी : धान उत्पादनात कमालीची घटविरली (बु.) : चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे. दिवाळी सण समोर येणार असून सण साजरा करण्यासाठी पैशाची गरज राहणार आहे. आधारभूत केंद्र सुरु झाले नाही तर खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विकावे लागणार आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे .सुरुवातीला धान लागवडीचा खर्च अवाढव्य असून यावर्षी शेती तोट्यात आली आहे. शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले तर खासगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूकही थांबेल तसेच काही प्रमाणात दिवाळी सण साजरा करता येईल.विरली बु. येथे आधारभूत धान केंद्र सुरु करण्यासाठी सहकारी संस्थांनी तसेच परिसरातील नागरिकांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटते.विरली बु. हे लाखांदूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील १२ गावांचा दैनंदिन व्यवहार येथून चालतो. या ठिकाणी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या शाखा कार्यरत आहेत. याशिवाय दोन सहकारी पतसंस्था आणि भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरु आहे.धान हे या भागातील मुख्य पीक असून सन २०१५ च्या खरीप हंगामामध्ये लाखांदूर तालुक्यात सुमारे २५ हजार हेक्टर या पिकाखाली आहे. परंतु तालुक्यात केवळ तीन संस्थामार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रातून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने विकावे लागतात. या ठिकाणी ५ ते ६ खासगी व्यापारी धान खरेदी करीत असून त्यांच्यामार्फत दरवर्षी सुमारे ५० हजार क्विंटल धान खरेदी केले जाते. विरली बु. येथील विविध सेवा सहकारी संस्थेने आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मान्यता मिळण्यासाठी जिल्हा विपणन अधिकारी भंडारा यांच्याकडे मागणी केली आहे.सध्या मासळ आणि सरांडी बु. या ठिकाणी शासनाची धान खरेदी केंद्रे असून या गावापासून तेथील अंतर सुमारे १० कि.मी. आहे. तसेच या दोन्ही केंद्रावर ३५ ते ४० गावातील शेतकरी आपले धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे तेथे धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची सतत गर्दी असते. परिणामी धानाचे वजनमाप करण्यासाठी ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागते. त्यांच्या माहितीनुसार मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाची क वर्ग संस्था आहे. संस्थेकडे खरेदी केलेले धान साठविण्यासाठी सध्या २ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता अंदाजे ५ हजार क्विंटल एवढी आहे. सध्या संस्थेकडे २ स्थायी आणि ३ अस्थाये असे एकूण ५ कर्मचारी आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात संस्थेची उलाढाल १ कोटी १४ लक्ष रुपयाची आहे. (वार्ताहर)