शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

धान खरेदी केंद्र सुरु करा

By admin | Updated: November 2, 2015 00:48 IST

चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे.

शेतकऱ्यांची मागणी : धान उत्पादनात कमालीची घटविरली (बु.) : चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे. दिवाळी सण समोर येणार असून सण साजरा करण्यासाठी पैशाची गरज राहणार आहे. आधारभूत केंद्र सुरु झाले नाही तर खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विकावे लागणार आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे .सुरुवातीला धान लागवडीचा खर्च अवाढव्य असून यावर्षी शेती तोट्यात आली आहे. शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले तर खासगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूकही थांबेल तसेच काही प्रमाणात दिवाळी सण साजरा करता येईल.विरली बु. येथे आधारभूत धान केंद्र सुरु करण्यासाठी सहकारी संस्थांनी तसेच परिसरातील नागरिकांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटते.विरली बु. हे लाखांदूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील १२ गावांचा दैनंदिन व्यवहार येथून चालतो. या ठिकाणी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या शाखा कार्यरत आहेत. याशिवाय दोन सहकारी पतसंस्था आणि भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरु आहे.धान हे या भागातील मुख्य पीक असून सन २०१५ च्या खरीप हंगामामध्ये लाखांदूर तालुक्यात सुमारे २५ हजार हेक्टर या पिकाखाली आहे. परंतु तालुक्यात केवळ तीन संस्थामार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रातून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने विकावे लागतात. या ठिकाणी ५ ते ६ खासगी व्यापारी धान खरेदी करीत असून त्यांच्यामार्फत दरवर्षी सुमारे ५० हजार क्विंटल धान खरेदी केले जाते. विरली बु. येथील विविध सेवा सहकारी संस्थेने आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मान्यता मिळण्यासाठी जिल्हा विपणन अधिकारी भंडारा यांच्याकडे मागणी केली आहे.सध्या मासळ आणि सरांडी बु. या ठिकाणी शासनाची धान खरेदी केंद्रे असून या गावापासून तेथील अंतर सुमारे १० कि.मी. आहे. तसेच या दोन्ही केंद्रावर ३५ ते ४० गावातील शेतकरी आपले धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे तेथे धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची सतत गर्दी असते. परिणामी धानाचे वजनमाप करण्यासाठी ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागते. त्यांच्या माहितीनुसार मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाची क वर्ग संस्था आहे. संस्थेकडे खरेदी केलेले धान साठविण्यासाठी सध्या २ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता अंदाजे ५ हजार क्विंटल एवढी आहे. सध्या संस्थेकडे २ स्थायी आणि ३ अस्थाये असे एकूण ५ कर्मचारी आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात संस्थेची उलाढाल १ कोटी १४ लक्ष रुपयाची आहे. (वार्ताहर)