शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

एसटीच्या विकासात स्पीड ब्रेकर!

By admin | Updated: November 18, 2015 00:38 IST

प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने

एस.टी. केव्हा टाकणार कात? : महामार्ग होऊनही वेग मात्र वाढेना, काळ बदलूनही एस.टी.ची सेवा मात्र ‘जैसे थे’चभंडारा : प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवासी ऐषोआराम पुरविणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. खाजगी वाहनांच्या तुलनेत हंगाम वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक राहत असल्यामुळे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. प्रवासी पैसे मोजून स्लीपर क्लास बसेसमध्ये जाण्यास इच्छुक असताना एसटी महामंडळ मात्र त्याच पारंपरिक बसेस प्रवाशांना उपलब्ध करून देते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे गरजेचे असताना एसटीने कुठलाच बदल घडवून आणला नाही. या कारणामुळे एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणारे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून, एसटी महामंडळाची धावपळीच्या स्पर्धेच्या युगात कासवगतीने वाटचाल सुरू आहे. बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचाही अभावखाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना प्रवाशांना गाणी, चित्रपट दाखविण्यात येतात. परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये अशी कुठलीच सुविधा नसते. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना कंटाळवाणे वाटते. यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे.कर्मचाऱ्यांचा तुटवडाआधुनिक साधनांचा अभावमहामंडळात चालक-वाहक, तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे महामंडळाने ठरविलेले शेड्यूल वेळेवर चालू शकत नाही. त्यासाठी रिक्त पदांची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. वाहतूक क्षेत्रात नवनवे तांत्रिक बदलासोबतच संगणकीकरण होत आहे. परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मात्र त्याच पारंपरिक पद्धतीने काम करताना दिसत असून एसटी कात टाकण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)‘स्पीड लॉक’मुळे प्रवासी कंटाळलेत एसटी महामंडळाने आपल्या सर्व बसेसचा ‘स्पीड लॉक’ केलेला असतो. यामुळे एका विशिष्ट क्षमतेच्यावर एसटीच्या बसेस धावत नाहीत. यामुळे प्रवाशांना नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. भंडारा - नागपूर हा आता चौपदरी मार्ग झाला आहे. तरीसुद्धा वेग बांधलेला असल्यामुळे या मार्गावर बसेस कमी वेगानेच धावतात. विशेष म्हणजे जलद आणि साधारण, जनता बसेसचा वेग सारखाच असतो. बस वेगाने चालविणे हे चालकावर अवलंबून असते. खाजगी वाहतुकीच्या वाहनांचा वेग एसटीच्या तुलनेत कितीतरी अधिक असतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाला ‘स्पीड लॉक’चे धोरण बंद करण्याची गरज आहे.खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा भाडे अधिकएसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासभाडे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत नेहमीच अधिक असते. भंडाराहून नागपूरला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स एसटीच्या बसपेक्षा १० ते १५ रूपये कमी तिकीट आकारून प्रवाशांची वाहतूक करते. परंतु एसटी महामंडळ स्पर्धेत उतरून प्रवासी मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी भाड्यात तडजोड करण्यासाठी तयार नाही. यामुळे एसटीचे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.बसेसची अवस्थाही दयनीयएसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा स्वच्छ नसतात. त्यामुळे बस पाहताच प्रवाशांना या बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडतो. बसमध्येही थुंकी, कचरा, घाण दिसल्यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास होतो. खाजगी बसेस चकाचक असतात. त्यातील सीटही आरामदायक असतात. प्रवासभाडेही एसटीच्या तुलनेत कमी असल्यामुळे साहजिकच प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित होतात. स्लीपर क्लास, एसी बसेसची सुविधा नाहीत. लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी एसी आणि स्लीपर क्लास बसेसना प्राधान्य देतात. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे बुकिंग करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना वेटिंगमध्ये राहावे लागते. प्रवासीवर्ग असताना एसटी महामंडळाने स्लीपर क्लास बसेस, एसी बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर क्लास बसेसने प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.