शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

एसटीच्या विकासात स्पीड ब्रेकर!

By admin | Updated: November 18, 2015 00:38 IST

प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने

एस.टी. केव्हा टाकणार कात? : महामार्ग होऊनही वेग मात्र वाढेना, काळ बदलूनही एस.टी.ची सेवा मात्र ‘जैसे थे’चभंडारा : प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात तेच परंपरागत धोरण, नव्या बदलांकडे पाठ आणि प्रवाशांना काय हवे काय नको याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवासी ऐषोआराम पुरविणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. खाजगी वाहनांच्या तुलनेत हंगाम वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक राहत असल्यामुळे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. प्रवासी पैसे मोजून स्लीपर क्लास बसेसमध्ये जाण्यास इच्छुक असताना एसटी महामंडळ मात्र त्याच पारंपरिक बसेस प्रवाशांना उपलब्ध करून देते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे गरजेचे असताना एसटीने कुठलाच बदल घडवून आणला नाही. या कारणामुळे एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणारे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून, एसटी महामंडळाची धावपळीच्या स्पर्धेच्या युगात कासवगतीने वाटचाल सुरू आहे. बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचाही अभावखाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना प्रवाशांना गाणी, चित्रपट दाखविण्यात येतात. परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये अशी कुठलीच सुविधा नसते. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना कंटाळवाणे वाटते. यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये करमणुकीच्या साधनांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे.कर्मचाऱ्यांचा तुटवडाआधुनिक साधनांचा अभावमहामंडळात चालक-वाहक, तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे महामंडळाने ठरविलेले शेड्यूल वेळेवर चालू शकत नाही. त्यासाठी रिक्त पदांची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. वाहतूक क्षेत्रात नवनवे तांत्रिक बदलासोबतच संगणकीकरण होत आहे. परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मात्र त्याच पारंपरिक पद्धतीने काम करताना दिसत असून एसटी कात टाकण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)‘स्पीड लॉक’मुळे प्रवासी कंटाळलेत एसटी महामंडळाने आपल्या सर्व बसेसचा ‘स्पीड लॉक’ केलेला असतो. यामुळे एका विशिष्ट क्षमतेच्यावर एसटीच्या बसेस धावत नाहीत. यामुळे प्रवाशांना नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. भंडारा - नागपूर हा आता चौपदरी मार्ग झाला आहे. तरीसुद्धा वेग बांधलेला असल्यामुळे या मार्गावर बसेस कमी वेगानेच धावतात. विशेष म्हणजे जलद आणि साधारण, जनता बसेसचा वेग सारखाच असतो. बस वेगाने चालविणे हे चालकावर अवलंबून असते. खाजगी वाहतुकीच्या वाहनांचा वेग एसटीच्या तुलनेत कितीतरी अधिक असतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाला ‘स्पीड लॉक’चे धोरण बंद करण्याची गरज आहे.खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा भाडे अधिकएसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासभाडे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत नेहमीच अधिक असते. भंडाराहून नागपूरला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स एसटीच्या बसपेक्षा १० ते १५ रूपये कमी तिकीट आकारून प्रवाशांची वाहतूक करते. परंतु एसटी महामंडळ स्पर्धेत उतरून प्रवासी मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी भाड्यात तडजोड करण्यासाठी तयार नाही. यामुळे एसटीचे प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत असून त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.बसेसची अवस्थाही दयनीयएसटी महामंडळाच्या बसेस अनेकदा स्वच्छ नसतात. त्यामुळे बस पाहताच प्रवाशांना या बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडतो. बसमध्येही थुंकी, कचरा, घाण दिसल्यामुळे प्रवाशांचा भ्रमनिरास होतो. खाजगी बसेस चकाचक असतात. त्यातील सीटही आरामदायक असतात. प्रवासभाडेही एसटीच्या तुलनेत कमी असल्यामुळे साहजिकच प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित होतात. स्लीपर क्लास, एसी बसेसची सुविधा नाहीत. लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी एसी आणि स्लीपर क्लास बसेसना प्राधान्य देतात. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे बुकिंग करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना वेटिंगमध्ये राहावे लागते. प्रवासीवर्ग असताना एसटी महामंडळाने स्लीपर क्लास बसेस, एसी बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर क्लास बसेसने प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.