शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने उडविली बळीराजाची झोप !

By admin | Updated: July 16, 2015 00:54 IST

मृग नक्षत्रात पावसाची आशा दाखवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस मात्र नक्षत्र बदलताच गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला दिसतो आहे.

पावसाने डोळे वटारले : शेतकरी आर्थिक संकटात, दुबार पेरणीचे संकट, व्यापारीही ग्राहकांच्या प्रतीक्षेतभंडारा : मृग नक्षत्रात पावसाची आशा दाखवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस मात्र नक्षत्र बदलताच गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला दिसतो आहे. लहान मुले म्हणायचे ते गीत आता बळीराजा म्हणताना दिसतो. ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’, अशी आर्त हाक ऐकूनही पावसाला मात्र पाझर फुटताना दिसत नाही. अगोदरच चारही मुंड्या चित झालेला शेतकरी या पावसाच्या लहरीपणामुळे अगदी हतबल होताना दिसत आहे.सुरुवातीचे अंदाज सत्य होताहेत. त्यामुळे मृग नक्षत्रात पाणी यायची सुरुवात झाली. त्यामुळे यावर्षी पावसाळा खूप असेल, अशी आशा लागलेल्या बळीराजाची संपूर्ण निराशा झाली आहे. त्यांची सुरुवात अगदी वेळेवर झाल्याने आता संपूर्ण नक्षत्रात पाऊस राहील, या विश्वासात शेतात बियाणे लावायचे ठरविले. पण लहरी पावसाने मात्र बळीराजाचा विश्वासघात केला. सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी राजाला निसर्गही डोळे वर काढू देत नाही, याचे दु:ख वाटते. बळीराजाची प्रभात पावसाच्या प्रतीक्षेत सुरु होते आणि रात्रही प्रतीक्षेतच जाते. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. शेतात उगवत असलेली रोपे जगवायची कशी, मशागत करुन ठेवलेल्या शेतीवर बियाणे लावायचे कधी, दुबार पेरणीला पुन्हा पैसे आणायचे कुठून, संसारातील आर्थिक व्यवहार, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादी समस्या सोडवायच्या कशा, आदी प्रश्नात तो गुरफटून आहे. सदर प्रश्न कधी सुटणार याचा विचार सतत करीत आहे. (शहर प्रतिनिधी)खरबी परिसरात पऱ्हे सुकलेखरबी (नाका) : या परिसरामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून या परिसरामध्ये पेंच प्रकल्पाचे पाटबंधारे विभागाचे नहर आहे. पण पेंच प्रकल्पाने पाणी न सोडल्यामुळे शेती मधील पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावणार असल्याचे चित्र आहे.या परिसरात बहुतांश शेतकऱ्यांच्या धान व सोयाबीन या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाण्याअभावी ६० टक्के पऱ्हे करपले असून एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर संपूर्ण पऱ्हे करपतील व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असे स्पष्ट दिसत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या परिसरात २५ टक्के शेती कृषीपंपावर ओलीत असून ७५ टक्के शेती ही पेंच प्रकल्पाच्या पावसावर अवलंबून आहे. (वार्ताहर)छत्री-रेनकोटला ग्राहकच नाहीपावसाळा सुरु होताच कपडा व्यवसायिकांनी छत्री, रेनकोटने आपली प्रतिष्ठाने भरली. लाखोंची खरेदी केली व विविध आकर्षक रंगाचे रेनकोट व छत्रीने दुकाने थाटली. मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे दुकानदार हवालदिल झाला आहे. रेनकोट छत्रीत लाखो रुपये गुंतविले. मात्र पाऊसच पडत नसेल तर छत्री व रेनकोट कोण, कशासाठी घेणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात छत्री व रेनकोट खरेदी करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांचा खरेदी केलेला माल यावर्षी शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुबार पेरणीचे संकटकुंभली : सध्या पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असून शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला आहे. रोहिणी, मृग, आद्रा व आता तरणा पाऊस म्हणून समजला जाणारा पुनर्वसू नक्षत्र सुरु आहे. दररोज शेतकरी सकाळ झाली की आकाशाकडे टक लावून बघतो. परंतु दिवस कोरडाच जातो. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे.आधीच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती धानाचे भाव नसल्यामुळे बिकट आहे. पेरणीकरिता कशीतरी बियाण्यांची व्यवस्था केली. गेल्या फसलीत झालेले धान्य बियाण्यांकरिता वापरले. तसेच पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागला. त्यात दुबार पेरणीचे सावट शेतकऱ्यांवर असल्यामुळे बळीराजाला चिंतेत जास्तच भर पडत आहे. ज्यांच्याकडे मोटारपंपची सोय आहे त्यांची रोवणी कशीतरी सुरु आहेत. परंतु जी शेती वरथेंबी आहे त्या शेतकऱ्याला वरच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याने काय करावे हा यक्ष प्रश्न आहे. दुबार पेरणी करण्याचा प्रसंग आल्यास बियाण्यांची व्यवस्था कशी करावी हा गंभीर प्रश्न आहे. (वार्ताहर)