शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

पावसाने उडविली बळीराजाची झोप !

By admin | Updated: July 16, 2015 00:54 IST

मृग नक्षत्रात पावसाची आशा दाखवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस मात्र नक्षत्र बदलताच गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला दिसतो आहे.

पावसाने डोळे वटारले : शेतकरी आर्थिक संकटात, दुबार पेरणीचे संकट, व्यापारीही ग्राहकांच्या प्रतीक्षेतभंडारा : मृग नक्षत्रात पावसाची आशा दाखवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस मात्र नक्षत्र बदलताच गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला दिसतो आहे. लहान मुले म्हणायचे ते गीत आता बळीराजा म्हणताना दिसतो. ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’, अशी आर्त हाक ऐकूनही पावसाला मात्र पाझर फुटताना दिसत नाही. अगोदरच चारही मुंड्या चित झालेला शेतकरी या पावसाच्या लहरीपणामुळे अगदी हतबल होताना दिसत आहे.सुरुवातीचे अंदाज सत्य होताहेत. त्यामुळे मृग नक्षत्रात पाणी यायची सुरुवात झाली. त्यामुळे यावर्षी पावसाळा खूप असेल, अशी आशा लागलेल्या बळीराजाची संपूर्ण निराशा झाली आहे. त्यांची सुरुवात अगदी वेळेवर झाल्याने आता संपूर्ण नक्षत्रात पाऊस राहील, या विश्वासात शेतात बियाणे लावायचे ठरविले. पण लहरी पावसाने मात्र बळीराजाचा विश्वासघात केला. सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी राजाला निसर्गही डोळे वर काढू देत नाही, याचे दु:ख वाटते. बळीराजाची प्रभात पावसाच्या प्रतीक्षेत सुरु होते आणि रात्रही प्रतीक्षेतच जाते. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. शेतात उगवत असलेली रोपे जगवायची कशी, मशागत करुन ठेवलेल्या शेतीवर बियाणे लावायचे कधी, दुबार पेरणीला पुन्हा पैसे आणायचे कुठून, संसारातील आर्थिक व्यवहार, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादी समस्या सोडवायच्या कशा, आदी प्रश्नात तो गुरफटून आहे. सदर प्रश्न कधी सुटणार याचा विचार सतत करीत आहे. (शहर प्रतिनिधी)खरबी परिसरात पऱ्हे सुकलेखरबी (नाका) : या परिसरामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून या परिसरामध्ये पेंच प्रकल्पाचे पाटबंधारे विभागाचे नहर आहे. पण पेंच प्रकल्पाने पाणी न सोडल्यामुळे शेती मधील पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे यावर्षी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावणार असल्याचे चित्र आहे.या परिसरात बहुतांश शेतकऱ्यांच्या धान व सोयाबीन या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाण्याअभावी ६० टक्के पऱ्हे करपले असून एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर संपूर्ण पऱ्हे करपतील व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असे स्पष्ट दिसत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या परिसरात २५ टक्के शेती कृषीपंपावर ओलीत असून ७५ टक्के शेती ही पेंच प्रकल्पाच्या पावसावर अवलंबून आहे. (वार्ताहर)छत्री-रेनकोटला ग्राहकच नाहीपावसाळा सुरु होताच कपडा व्यवसायिकांनी छत्री, रेनकोटने आपली प्रतिष्ठाने भरली. लाखोंची खरेदी केली व विविध आकर्षक रंगाचे रेनकोट व छत्रीने दुकाने थाटली. मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे दुकानदार हवालदिल झाला आहे. रेनकोट छत्रीत लाखो रुपये गुंतविले. मात्र पाऊसच पडत नसेल तर छत्री व रेनकोट कोण, कशासाठी घेणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात छत्री व रेनकोट खरेदी करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने व्यापाऱ्यांचा खरेदी केलेला माल यावर्षी शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुबार पेरणीचे संकटकुंभली : सध्या पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असून शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला आहे. रोहिणी, मृग, आद्रा व आता तरणा पाऊस म्हणून समजला जाणारा पुनर्वसू नक्षत्र सुरु आहे. दररोज शेतकरी सकाळ झाली की आकाशाकडे टक लावून बघतो. परंतु दिवस कोरडाच जातो. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे.आधीच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती धानाचे भाव नसल्यामुळे बिकट आहे. पेरणीकरिता कशीतरी बियाण्यांची व्यवस्था केली. गेल्या फसलीत झालेले धान्य बियाण्यांकरिता वापरले. तसेच पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागला. त्यात दुबार पेरणीचे सावट शेतकऱ्यांवर असल्यामुळे बळीराजाला चिंतेत जास्तच भर पडत आहे. ज्यांच्याकडे मोटारपंपची सोय आहे त्यांची रोवणी कशीतरी सुरु आहेत. परंतु जी शेती वरथेंबी आहे त्या शेतकऱ्याला वरच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याने काय करावे हा यक्ष प्रश्न आहे. दुबार पेरणी करण्याचा प्रसंग आल्यास बियाण्यांची व्यवस्था कशी करावी हा गंभीर प्रश्न आहे. (वार्ताहर)