शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

कोरड्या दुष्काळाची छाया

By admin | Updated: August 27, 2014 23:18 IST

आकाशात ढग दाटले की शेतकरी आकाशाकडे हात जोडून वरुणराजाला विणवणी करतो. परंतु पाऊस पडत नही. मागीलवर्षी अतिवृष्टीने हतबल शेतकरी यावर्षी कोरड्या दुष्काळाच्या सावटात अडकला आहे.

बारव्हा : आकाशात ढग दाटले की शेतकरी आकाशाकडे हात जोडून वरुणराजाला विणवणी करतो. परंतु पाऊस पडत नही. मागीलवर्षी अतिवृष्टीने हतबल शेतकरी यावर्षी कोरड्या दुष्काळाच्या सावटात अडकला आहे.मागीलवर्षी अतिवृष्टी झाली. त्यापूर्वी दोन वर्षे पाऊस कमी पडला होता. त्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे उत्पादनात घट झाली. कसेबसे हाती आलेल्या उत्पन्नाला सरकारनेही योग्य दर दिला नाही. त्यामुळे शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात येत आहे. शेतकऱ्यांना एखाद्या जोडधंद्याचा आधार घ्यावा लागत आहे. केवळ शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे त्यांना अशक्य झाले आहे. पुढील वर्ष भरघोस उत्पन्नाचे येईल या भाबड्या आशेने बळीराजा शेतात आपला व आपल्या कुटुंबाचा घाम गाळतच आहे. सुरुवातीच्या नक्षत्रांनी दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार नव्हे तर तिबार पेरणी करावी लागली. त्यात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. बियाण्यांची धावाधाव करावी लागली. एकदाची पावसाने उशिरा हजेरी लावली अन् त्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. मात्र पावसाने पुन्हा हुलकावणी दिली अन् आता शेतकऱ्यांचा जीवच टांगणीला लागला आहे. जुलै आॅगस्ट महिन्यात शेतात सर्वत्र हिरवी पिके डौलाने उभे दिसतात. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे पिके आता कोमेजू लागली आहे. पिकांची मशागत करून खत देऊन शेतकरी पावसाची वाट बघत आहे. मात्र वरुण राजा चांगलाच रुसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानपिके आता धोक्यात सापडली आहे. धानपिकाची दशा बघून बळीराजाही मनातून कुठत आहे. पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. पावसाचे दोन महिने उलटले तरीही शेतातील पिके डोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे. परिणामी बळीराजाच्या जीवनातील आशाच कोरड्या पडत आहे. यावर्षी कुटुंबाचा गाडा कसा ओढावा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)