शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

मुलींच्या आरोग्यासाठी सरसावली ग्रामपंचायत

By admin | Updated: January 26, 2016 00:28 IST

मुली वयात आल्या की, त्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात हिमोग्लोबीन ही मुख्य समस्या सध्या आढळून येत आहे.

२० मुलींच्या आहारावर केला खर्चप्रशांत देसाई भंडारामुली वयात आल्या की, त्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात हिमोग्लोबीन ही मुख्य समस्या सध्या आढळून येत आहे. या समस्येवर आरोग्य विभाग कार्यरत असला तरी, ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला आहे. लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने मुलींच्या हिमोग्लोबीन वाढीसाठी शिबीर राबविले आहे. असा उपक्रम राबविणारी ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.गावात शासकीय योजना राबवून शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने गावाचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहचविले आहे. अशा गावातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. विवाहपूर्व व विवाहानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर ग्रामपंचायत कमिटीने सभेत चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरवून तसा प्रत्यक्षात पुढाकार घेतला. यात गावातील १३ ते २५ या वयोगटातील ७० किशोरवयीन मुलींची आंग्ल दाखाखाना व पिंपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहयोगातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यात २० मुलींचे हिमोग्लोबीन १० मिलीग्रॅमपेक्षा कमी आढळून आले. हिमोग्लोबीनसोबतच मुलींची सिकलसेल, रक्तगट तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबीन कमी आढळून आल्याने ग्रामपंचायतीने अंगणवाडी केंद्रात त्यांच्या आरोग्यासाठी सकस आहाराचे शिबीर लावले. यात त्यांना आयर्नयुक्त मुंगाचे उसळ, गाजर, बीट, पराठे, पालक, मेथी पराठे, राजमा उसळ, चना उसळ व शेंगदाण्याची चटणी नियमित आहारात देण्यात आले. हे शिबीर अठरा दिवस राबविण्यात आले. यावर ग्रामपंचायतीने स्व:निधीतून सुमारे १५ हजार रूपये खर्च केले.शिबीरानंतर मुलींच्या हिमोग्लोबीनची पुन्हा तपासणी करण्यात आली. यात वाढ झाल्याचे प्रमाण आढळून आले. आयर्नयुक्त सकस आहाराने मुलींच्या हिमोग्लोबीनमध्ये ११ ते १४ मिलीग्रॅमपर्यंत वाढ झाली. यावेळी त्यांना वैद्यकीय अधिकारी सायली डहारे यांनी त्यांच्या शंकांचे निरसण केले. आरोग्य विभागाने राबवायची जबाबदारी शिवणी ग्रामपंचायतीने राबविली. गावातील मुलींच्या आरोग्यासाठी धडपड करणारी शिवणी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविल्यास किशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबीनच्या समस्या मार्गी लागू शकेल असा हा आदर्श उपक्रम ठरणारा आहे.ग्रामपंचायतीचा पुढाकारविवाहानंतर नविन आयुष्याची सुरूवात करणाऱ्या मुलींच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण चांगले राहिल्यास त्यांना प्रसुतीनंतर सुदृढ बाळ जन्मास येईल. हा महत्वाचा मुद्दा समोर ठेवून ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या सहकार्यातून सकस आहार शिबीर राबविले. यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.लाजणे ही समस्या कारणीभूतकिशोरवयीन मुलींच्या शरीराच्या वाढीसोबतच त्यांच्या आहाराचे प्रमाणही वाढते. मात्र, अनेकदा मुली या वयात खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करून त्यांच्या सुदरतेकडे लक्ष देतात. यामुळे आहाराकडे दुर्लक्ष झाल्याने शरीरात आयर्नचे प्रमाण कमी होतात. त्यासोबतच मासीक पाळीचे दिवस असल्याने त्याचे अनेक विकारही ज्यात अतिरक्तस्त्राव होतो. मात्र, या वयात त्यांचे लाजण्याचे प्रमाणही अधिक असल्याने समस्या सांगण्यासाठी लाजतात. यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करण्यास अडचण निर्माण होते.गावातील महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी राहणार नाही. व गावची मुलगी विवाहानंतर बाहेरगावी गेल्यानंतर तिला कुणी हिनवणार नाही. याची काळजी तसेच गावात विवाह होवून येणारी सुन हिचेसुध्दा हिमोग्लोबीन प्रमाण तपासणी करण्यात येणार आहे.-जयंत गडपायलेग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत शिवणी