शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

साकोली तालुक्यात पाच कोटी रूपयांचे चुकारे अडले

By admin | Updated: July 22, 2016 00:47 IST

सर्वसामान्याचा सर्वांगिण विकास करू, असे अच्छे दिनचे स्वप्न दाखवित भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली.

१६ तासांचे भारनियमन सुरू : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल संजय साठवणे साकोली सर्वसामान्याचा सर्वांगिण विकास करू, असे अच्छे दिनचे स्वप्न दाखवित भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. मात्र ऐन पावसाळ्यात १६ तासांचे भारनियमन आणि धानाचे पाच कोटी रूपयांचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी विहीर व बोरवेल करून शेतातच सिंचनाची सोय केली. यावर्षी पावसाळ्यातही १६ तासाच्या भारनियमाने शेतकरी खचला आहे. साकोली तालुक्यात केवळ ३ टक्केच रोवणी झाली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. ज्यांच्याकडे विहीरी व बोरवेल आहेत त्या शेतकऱ्यांचीही रोवणी पुर्णपणे झालेली नाही. कृषीपंपाला आठ तासच विद्युत पुरवठा होत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी कसेबसे धानाची लागवड केली. उन्हाळी धान निघाल्यानंतर धानाला भाव नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य घरी ठेवून काय करायचे म्हणून काहींनी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केली. काहींनी खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. यावेळी शासनातर्फे धानाचे दर प्रति क्विंटल १४१० रूपये व २०० रूपये बोनस, असे जाहीर केले होते. श्रीराम सहकारी संस्था साकोलीतर्फे साकोली व विर्शी या दोन केंद्राअंतर्गत साकोली केंद्रात ३९ हजार २३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावेळी २ कोटी ७० लक्ष ९ हजार ३०० रूपयाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले तर ३ कोटी ६० लक्ष ६४ हजार रूपयाचे चुकारे शिल्लक असून विर्शी केंद्राअंतर्गत १७ हजार ५०६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावेळी १ कोटी ३५ लाख ९२ हजार २३० रूपयाचे चुकारे झाले असून १ कोटी ४५ लाख ५२ हजार रूपयाचे चुकारे शिल्लक आहेत. साकोली व विर्शी केंद्र मिळून ५ कोटी रूपयांचे चुकारे अडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळी हंगामात शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे.