शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

साकोली तालुक्यात पाच कोटी रूपयांचे चुकारे अडले

By admin | Updated: July 22, 2016 00:47 IST

सर्वसामान्याचा सर्वांगिण विकास करू, असे अच्छे दिनचे स्वप्न दाखवित भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली.

१६ तासांचे भारनियमन सुरू : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल संजय साठवणे साकोली सर्वसामान्याचा सर्वांगिण विकास करू, असे अच्छे दिनचे स्वप्न दाखवित भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. मात्र ऐन पावसाळ्यात १६ तासांचे भारनियमन आणि धानाचे पाच कोटी रूपयांचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी विहीर व बोरवेल करून शेतातच सिंचनाची सोय केली. यावर्षी पावसाळ्यातही १६ तासाच्या भारनियमाने शेतकरी खचला आहे. साकोली तालुक्यात केवळ ३ टक्केच रोवणी झाली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. ज्यांच्याकडे विहीरी व बोरवेल आहेत त्या शेतकऱ्यांचीही रोवणी पुर्णपणे झालेली नाही. कृषीपंपाला आठ तासच विद्युत पुरवठा होत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी कसेबसे धानाची लागवड केली. उन्हाळी धान निघाल्यानंतर धानाला भाव नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य घरी ठेवून काय करायचे म्हणून काहींनी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केली. काहींनी खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. यावेळी शासनातर्फे धानाचे दर प्रति क्विंटल १४१० रूपये व २०० रूपये बोनस, असे जाहीर केले होते. श्रीराम सहकारी संस्था साकोलीतर्फे साकोली व विर्शी या दोन केंद्राअंतर्गत साकोली केंद्रात ३९ हजार २३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावेळी २ कोटी ७० लक्ष ९ हजार ३०० रूपयाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले तर ३ कोटी ६० लक्ष ६४ हजार रूपयाचे चुकारे शिल्लक असून विर्शी केंद्राअंतर्गत १७ हजार ५०६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावेळी १ कोटी ३५ लाख ९२ हजार २३० रूपयाचे चुकारे झाले असून १ कोटी ४५ लाख ५२ हजार रूपयाचे चुकारे शिल्लक आहेत. साकोली व विर्शी केंद्र मिळून ५ कोटी रूपयांचे चुकारे अडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळी हंगामात शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे.