शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

रस्ता दुरुस्तीची कामे ठरली भ्रष्टाचाराचे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:47 IST

लाखांदूर तालुक्यात बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था व गुणवत्ता लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे. खडीकरण, पॅचेस, डांबरीकरणाच्या नावाखाली निधीची विल्हेवाट लावली जात असून रस्ता दुरुस्ती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अधिकारी अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीत मोठा वाटा असल्याचे बोलले जात असून या कामाची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे

ठळक मुद्देटक्केवारीची कीड कायमच : कामाची गुणवत्ता खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यात बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था व गुणवत्ता लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे. खडीकरण, पॅचेस, डांबरीकरणाच्या नावाखाली निधीची विल्हेवाट लावली जात असून रस्ता दुरुस्ती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अधिकारी अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीत मोठा वाटा असल्याचे बोलले जात असून या कामाची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शहरी व ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा पूर्णत्वास नेण्यासाठी रस्ता दुरुस्ती बांधकामाला शासनामार्फत महत्व देऊन अग्रस्थान दिले आहे. त्याकरिता विविध योजनांची आखणी व निर्मिती करून वेगवेगळ्या विभागामार्फत करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मोठा गाजावाजा सुद्धा केला जात आहे. मात्र शेळीच कुंपण खात असल्याचे दृष्य निदर्शनास येत आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया रस्त्यांची दूरावस्था आणि कामाची गुणवत्ता खालावली असून परिपत्रकानुसार काम न करता थातुरमातूर कामे करून निधीची विल्हेवाट लावल् या जात असल्यामुळे मुदतीच्या आतच रस्ते उखडून रहदारी योग्य राहात नाही.लाखांदूर तालुक्यात रस्त्यावर वर्षभर कामे केली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला रोजच यंत्राचे दर्शन घडत असते. रस्त्यावरील खड्ड्यात कधी माती तर कधी भिसी, कधी चुरी तर कधी मुरुमाची झालर दिसून येत असून पॅचेसच्या माध्यमातून डांबर पोतून अर्धे खड्डे रिकामे तर काही पूर्ण केले जातात. नंतर पुन्हा कामाच्या नावात फेरबदल करून डांबरींग रस्ता, रुंदीकरणाची कामे केली जातात. याचे गणित मांडणे कठीणच आहे.आजच्या घडीला तालुक्यातील एका रस्त्यावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून सुरुवातीला खड्ड्यात गिट्टी टाकून त्यावर मुरुमाचा मुलामा देण्यात आला. त्यानंतर दोन दिवसात तो रस्ता उखडला. आता त्यावर पॅचेस बुजविण्याच्या नावाखाली डांबरीकरणाची मलमपट्टी केली जात आहे.तो रस्ता किती दिवस टिकेल हे न सांगणेच बरे. त्याच रस्त्याची आता नव्याने ई टेंडरिंग निघाल्याचे कळते. त्यावरून बांधकाम विभागाचा कारभार कसा आहे हे दिसून येत आहे. बºयाच ठिकाणी परिपत्रकानुसार काम न करता फलक लावले जाते तर काही ठिकाणी फलकच दिसून येत नाही.तालुक्यातील बºयाच रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ आली आहे. जनतेला प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही रस्ते तर अपघाताचे रस्ते बनले आहेत. रस्त्याची दूरावस्था ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली असून दैनंदिन प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे.शासकीय परिपत्रक व निर्देशाला केराची टोपली दाखवून अनेक योजना रस्ता दुरुस्ती बांधकाम कागदावरच दाखवून रस्त्यावर थातूरमातूर कामे केली जातात. शासकीय निधीची विल्हेवाट लावून आर्थिक लूट करून विकास कामाच्या नावावर जनतेला धोका देत अधिकारी, अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी संगनमताने टक्केवारीनुसार सेटींग करून धन्यता मानत असल्याचे नाकारता येत नाही. असे मत अनेक सुजाण नागरिकांनी मांडले असून कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गिट्टी टाकून त्यावर मुरुमाचा मुलामा देण्यात आला. त्यानंतर दोन दिवसात तो रस्ता उखडला. आता त्यावर पॅचेस बुझविण्याच्या नावाखाली डांबरीकरणाची मलमपट्टी केली जात आहे. तो रस्ता किती दिवस टिकेल हे न सांगणेच बरे. त्याच रस्त्याची आता नव्याने ई टेंडरिंग निघल्याचे कळते. यावरून बांधकाम विभागाचा कारभार कसा आहे हे दिसून येत आहे. बºयाच ठिकाणी परिपत्रकानुसार काम न करता फलक लावले जाते तर काही ठिकाणी फलकच दिसून येत नाही.तालुक्यातील बºयाच रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की, मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ आली आहे. जनतेला प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही रस्ते तर अपघाताचे रस्ते बनले आहेत. रस्त्याची दूरावस्था ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली असून दैनंदिन प्रवासात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.शासकीय परिपत्रक व निर्देशाला केराची टोपली दाखवून अनेक योजना रस्ता दुरुस्ती बांधकाम कागदावरच दाखवून रस्त्यावर थातूर मातूर कामे केली जातात. शासकीय निधीची विल्हेवाट लावून आर्थिक लूट करून विकास कामांच्या नावाखाली जनतेला धोका देत अधिकारी अभियंता, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी संगनमताने टक्केवारीनुसार सेटींग करून धन्यता मानत असल्याचे नाकारता येत नाही. असे मत अनेक सुजाण नागरिकांनी मांडले असून कामांची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.