शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

‘कॅश ट्रान्सफर’चा धोका कायम

By admin | Updated: May 18, 2015 00:26 IST

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या....

सहकारी बँका, पतसंस्थांनी काळजी घेण्याची गरजबंदूकधारी सुरक्षा रक्षक आवश्यकदररोज कोटींची वाहतूकभंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये दिवसाआड सुमारे पंधरा लाखांची एटीएममध्ये आठ दिवसांमिळून इतकी रक्कम टाकली जाते. जिल्ह्यात सर्व एटीएमचा विचार करता दिवसाला काही कोटी रुपये बँकांना लोड करावे लागतात. राष्ट्रीयकृत बँककाकडे स्वत:चे सिक्युरिटी वाहन व सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्यांच्यापुढे सुरक्षेचा तितकासा प्रश्न नसतो. मात्र, सहकारी बँका, पतसंस्था, त्यांचे अल्पबचत प्रतिनिधी यांच्याकडून केली जाणारी कॅश ट्रान्सफर फारशी सुरक्षित नसते. येथे धोका होऊ शकतो.साध्या वाहनांचा वापर धोकादायकभंडारा जिल्ह्यातील काही सहकारी बँकानी स्वत:ची एटीएम सेवा सुरु केली आहे. या सर्व एटीएममध्ये दररोज कोट्यवधीची कॅश जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये पाठवली जाते. त्यांच्याकडे हा दररोजचा प्र्रकार असला तरी सुरक्षा यंत्रणेच्या गाफीलपणामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सहकारी बँक शहराअंतर्गत शाखंमध्ये कॅश देतात. त्यासाठी अनेका बँका साध्या वाहनांचा वापर करतात हे फारच धोकादायक आहे.रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काय?चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक पैसे, महत्त्वाची कागदपत्रे वा दागिने बँकामध्ये ठेवतात. आपला पैसा बँकेतील तिजोरीत सुरक्षित आहे. या भावनेत खातेदार निश्चित असतात. मात्र अलीकडे घरफोड्याबरोबर बँक, पतसंस्था फोडून चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या घटना टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार अनेक राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका, पतसंस्थामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेक बँका, पतसंस्थांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वॉचमन, सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्मसह सुरक्षेची सर्व प्रकारची यंत्रणा बँकामध्ये चालू स्थितीत असेलच हे सांगता येत नाही.कॅश ने-आण करण्यासाठी खास नियमावलीराष्ट्रीयकृत बँकाना कॅशची केव्हाही गरज भासते, कारण त्यामध्ये विविध सहकारी बँकाची खाती असतात. तसेच त्यांच्या ग्राहकांनाही केव्हाही पैशांची निकड भासू शकते, त्यामुळे त्यांना कॅशची तजवीज करुन ठेवावी लागते. या बँकानी जर आरबीआयकडून कॅश मागविली तर ज्या कोणत्या वाहनातून कॅशची ने-आण केली जाते. त्या वाहनांच्या सुरक्षितेसाठी केवळ पोलिसांचाच बंदोबस्त मागविला जात असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.अशी घ्या खबरदारीबँकेतील कॅश ट्रान्झिटसाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनाची बॉडी इतर वाहनापेक्षा मजबूत असावी. कारण काही अनुचित प्रकार घडला तरी या वाहनातील कॅश सहजासहजी हातात पडू नये. अशी तिची रचना असावी. या वाहनाबरोबर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक वा दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक, एक जबाबदार अधिकारी, एक शिपाई, एक क्लार्क अशी यंत्रणा आवश्यक आहे. सामान्यत: राष्ट्रीयकृत बँक कोणताही धोका न पत्करता वाहन व पुरेपुर यंत्रणेशिवाय कॅश ट्रान्झिट करत नसल्याचे दिसून येते. सहकारी बँकानी मात्र या बाबतीत आणखी सतर्क व्हायला हवे. (नगर प्रतिनिधी)