शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅश ट्रान्सफर’चा धोका कायम

By admin | Updated: May 18, 2015 00:26 IST

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या....

सहकारी बँका, पतसंस्थांनी काळजी घेण्याची गरजबंदूकधारी सुरक्षा रक्षक आवश्यकदररोज कोटींची वाहतूकभंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये दिवसाआड सुमारे पंधरा लाखांची एटीएममध्ये आठ दिवसांमिळून इतकी रक्कम टाकली जाते. जिल्ह्यात सर्व एटीएमचा विचार करता दिवसाला काही कोटी रुपये बँकांना लोड करावे लागतात. राष्ट्रीयकृत बँककाकडे स्वत:चे सिक्युरिटी वाहन व सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्यांच्यापुढे सुरक्षेचा तितकासा प्रश्न नसतो. मात्र, सहकारी बँका, पतसंस्था, त्यांचे अल्पबचत प्रतिनिधी यांच्याकडून केली जाणारी कॅश ट्रान्सफर फारशी सुरक्षित नसते. येथे धोका होऊ शकतो.साध्या वाहनांचा वापर धोकादायकभंडारा जिल्ह्यातील काही सहकारी बँकानी स्वत:ची एटीएम सेवा सुरु केली आहे. या सर्व एटीएममध्ये दररोज कोट्यवधीची कॅश जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये पाठवली जाते. त्यांच्याकडे हा दररोजचा प्र्रकार असला तरी सुरक्षा यंत्रणेच्या गाफीलपणामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सहकारी बँक शहराअंतर्गत शाखंमध्ये कॅश देतात. त्यासाठी अनेका बँका साध्या वाहनांचा वापर करतात हे फारच धोकादायक आहे.रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काय?चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक पैसे, महत्त्वाची कागदपत्रे वा दागिने बँकामध्ये ठेवतात. आपला पैसा बँकेतील तिजोरीत सुरक्षित आहे. या भावनेत खातेदार निश्चित असतात. मात्र अलीकडे घरफोड्याबरोबर बँक, पतसंस्था फोडून चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या घटना टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार अनेक राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका, पतसंस्थामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेक बँका, पतसंस्थांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वॉचमन, सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्मसह सुरक्षेची सर्व प्रकारची यंत्रणा बँकामध्ये चालू स्थितीत असेलच हे सांगता येत नाही.कॅश ने-आण करण्यासाठी खास नियमावलीराष्ट्रीयकृत बँकाना कॅशची केव्हाही गरज भासते, कारण त्यामध्ये विविध सहकारी बँकाची खाती असतात. तसेच त्यांच्या ग्राहकांनाही केव्हाही पैशांची निकड भासू शकते, त्यामुळे त्यांना कॅशची तजवीज करुन ठेवावी लागते. या बँकानी जर आरबीआयकडून कॅश मागविली तर ज्या कोणत्या वाहनातून कॅशची ने-आण केली जाते. त्या वाहनांच्या सुरक्षितेसाठी केवळ पोलिसांचाच बंदोबस्त मागविला जात असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.अशी घ्या खबरदारीबँकेतील कॅश ट्रान्झिटसाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनाची बॉडी इतर वाहनापेक्षा मजबूत असावी. कारण काही अनुचित प्रकार घडला तरी या वाहनातील कॅश सहजासहजी हातात पडू नये. अशी तिची रचना असावी. या वाहनाबरोबर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक वा दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक, एक जबाबदार अधिकारी, एक शिपाई, एक क्लार्क अशी यंत्रणा आवश्यक आहे. सामान्यत: राष्ट्रीयकृत बँक कोणताही धोका न पत्करता वाहन व पुरेपुर यंत्रणेशिवाय कॅश ट्रान्झिट करत नसल्याचे दिसून येते. सहकारी बँकानी मात्र या बाबतीत आणखी सतर्क व्हायला हवे. (नगर प्रतिनिधी)