शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

‘कॅश ट्रान्सफर’चा धोका कायम

By admin | Updated: May 18, 2015 00:26 IST

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या....

सहकारी बँका, पतसंस्थांनी काळजी घेण्याची गरजबंदूकधारी सुरक्षा रक्षक आवश्यकदररोज कोटींची वाहतूकभंडारा जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व काही सहकारी बँका मिळून सुमारे ७५ सुमारास एटीएम आहेत यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये दिवसाआड सुमारे पंधरा लाखांची एटीएममध्ये आठ दिवसांमिळून इतकी रक्कम टाकली जाते. जिल्ह्यात सर्व एटीएमचा विचार करता दिवसाला काही कोटी रुपये बँकांना लोड करावे लागतात. राष्ट्रीयकृत बँककाकडे स्वत:चे सिक्युरिटी वाहन व सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्यांच्यापुढे सुरक्षेचा तितकासा प्रश्न नसतो. मात्र, सहकारी बँका, पतसंस्था, त्यांचे अल्पबचत प्रतिनिधी यांच्याकडून केली जाणारी कॅश ट्रान्सफर फारशी सुरक्षित नसते. येथे धोका होऊ शकतो.साध्या वाहनांचा वापर धोकादायकभंडारा जिल्ह्यातील काही सहकारी बँकानी स्वत:ची एटीएम सेवा सुरु केली आहे. या सर्व एटीएममध्ये दररोज कोट्यवधीची कॅश जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये पाठवली जाते. त्यांच्याकडे हा दररोजचा प्र्रकार असला तरी सुरक्षा यंत्रणेच्या गाफीलपणामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सहकारी बँक शहराअंतर्गत शाखंमध्ये कॅश देतात. त्यासाठी अनेका बँका साध्या वाहनांचा वापर करतात हे फारच धोकादायक आहे.रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काय?चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक पैसे, महत्त्वाची कागदपत्रे वा दागिने बँकामध्ये ठेवतात. आपला पैसा बँकेतील तिजोरीत सुरक्षित आहे. या भावनेत खातेदार निश्चित असतात. मात्र अलीकडे घरफोड्याबरोबर बँक, पतसंस्था फोडून चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या घटना टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार अनेक राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका, पतसंस्थामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेक बँका, पतसंस्थांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वॉचमन, सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्मसह सुरक्षेची सर्व प्रकारची यंत्रणा बँकामध्ये चालू स्थितीत असेलच हे सांगता येत नाही.कॅश ने-आण करण्यासाठी खास नियमावलीराष्ट्रीयकृत बँकाना कॅशची केव्हाही गरज भासते, कारण त्यामध्ये विविध सहकारी बँकाची खाती असतात. तसेच त्यांच्या ग्राहकांनाही केव्हाही पैशांची निकड भासू शकते, त्यामुळे त्यांना कॅशची तजवीज करुन ठेवावी लागते. या बँकानी जर आरबीआयकडून कॅश मागविली तर ज्या कोणत्या वाहनातून कॅशची ने-आण केली जाते. त्या वाहनांच्या सुरक्षितेसाठी केवळ पोलिसांचाच बंदोबस्त मागविला जात असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.अशी घ्या खबरदारीबँकेतील कॅश ट्रान्झिटसाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनाची बॉडी इतर वाहनापेक्षा मजबूत असावी. कारण काही अनुचित प्रकार घडला तरी या वाहनातील कॅश सहजासहजी हातात पडू नये. अशी तिची रचना असावी. या वाहनाबरोबर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक वा दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक, एक जबाबदार अधिकारी, एक शिपाई, एक क्लार्क अशी यंत्रणा आवश्यक आहे. सामान्यत: राष्ट्रीयकृत बँक कोणताही धोका न पत्करता वाहन व पुरेपुर यंत्रणेशिवाय कॅश ट्रान्झिट करत नसल्याचे दिसून येते. सहकारी बँकानी मात्र या बाबतीत आणखी सतर्क व्हायला हवे. (नगर प्रतिनिधी)