शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी सुरक्षेच्या नावावर वाहतुकीवर निर्बंध

By admin | Updated: October 20, 2016 00:29 IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी नियम तयार करण्यात येतात.

खासगी शाळांसाठी नियमांची सक्ती : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा एस.टी.ने सुविधांविना प्रवासभंडारा : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी नियम तयार करण्यात येतात. दुसरीकडे शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी एस.टी.ने प्रवास करतात. त्यामुळे या सुविधा राज्य परिवहन विभागाच्या बसेसमध्येही असाव्यात. परंतु परिवहन विभागाकडून नियमांची पायमल्ली होत आहे. खाजगी शाळांच्या बसेसमध्ये सर्व सुविधा हव्यात आणि परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये नियम का नाही? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.बदलत्या काळात शिक्षणाचे स्वरूप बदलले. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे सर्वांचा कल वाढला. खेड्यातुन शहराकडे आणि शहरातुन महानगरातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवाशाची संख्याही वाढली. प्रत्येक शाळा आपआपल्या सुविधेनुसार वाहतुक व्यवस्था करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासाची वाढती संख्या लक्षात घेऊन बाजारात वाहनाची रेलचेल वाढली. त्यातच राज्य परिवहन विभागाला उत्त्पन्न वाढवण्याची कल्पना सुचल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वाहतुक व्यवस्थेसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या नावावर नवनविन नियम व एकाच एसटीत एकावरएक उभे राहुन प्रवास करणारे आणि तासनतास बसच्या प्रतिक्षेत रात्री उशिरा येणारे विद्यार्थी आणि बसेसची सुविधा नसल्यामुळे शाळा बुडणाऱ्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या वाहनासाठी सुरक्षेच्या नावावर नवनविन नियम लावण्यात येतात. परवान्याची आवश्यकता, परवाना नुतनीकरण, प्रवेश क्षमता, शाळास्तरावर सुरक्षा समिती वाहन थांबे, परवाना शुल्क, अग्निशमक यंत्र, दरवाजे-खिडक्या, पायदान, अशा अनेक सुविधाचे आणि परीवहन विभागात नियमीत तपासणी होते.परंतु, लाखो विद्यार्थी शासकीय शाळेत शिक्षणासाठी प्रवास करतात. त्यांच्यासाठी घरघर आवाज करणारी बस. त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी, बसायला तर सोडा उभे राहण्याची सोय नाही. एकावर एक उभे राहुन विद्यार्थी मनस्तापात शिक्षण घेतात. अनियमीत बसफेऱ्या त्रासदायक आहेत. ६ तासाच्या शाळेत १४ तास निघून जात आहेत. बसची प्रतिक्षा आणि त्यासाठी होणारी धावपळ जीवघेणी ठरत आहे. शालेय वेळेवर बस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थ्याची शाळा बुडत आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. तर सर्वस्तरावर सारखे नियम लागू करून सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या वाहतुक व्यवस्थेत बदल आवश्यक आहे. बसची पास नियमीत काढून त्यासाठी अ‍ॅडव्हान्स पैसे भरणाऱ्या विद्यार्थ्याच्या नशिबात दुर्देवी प्रवास का? असा प्रश्न पालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)पालकावर नाहक भुर्दंड विद्यार्थी सुरक्षेच्या नावावर शासनाने लावलेले नियम आणि त्यासाठी आकारलेले शुल्क व तपासणीच्या नावावर होणारी लुट ही पालकांच्या खिशातून होते. शुल्काच्या स्वरुपात शासनाला द्यावे लागणारी रक्कम पालकांच्या खिशातून वाढीव प्रवास शुल्कस्वरुपात वसुल केली जाते. अनेक शाळाच्या प्रवेश शुल्कापेक्षा जास्त खर्च हा प्रवासावर होतो. सुरक्षा महत्वाची आहे. पण मग सर्वाना समान नियमावली हवी. खासगी वाहतुकीकरीता नियम आणि एसटीत शिथीलता नको.अवैध प्रवाशी वाहतुक दुर्लक्षितराज्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतुक सुरु आहे. याकडे आर्थिक संबधातुन हेतुपरस्पर दुर्लक्ष करून वाहतुक विभागाने शाळा-महाविद्यालयाच्या खासगी वाहतुक व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. नियमांचे पालन होत नाही म्हणून अर्ध्या रस्त्यात विद्यार्थ्यासह बस अडवून उभ्या केल्या जातात. तपासणीच्या नावावर शालेय वेळात बस उभ्या केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणारे विद्यार्थी सर्वसाधारण प्रवासी म्हणून प्रवास करतात. परंतु स्कूल बस म्हणून धावणाऱ्या बसेसकरीता मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. विद्यार्थी सुरक्षेकरीता शासनाने जीआर काढलेले आहे. स्कूल विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत बस सेवा आहे.- एस. निमजे, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, भंडारा.