शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकाम रखडल्याने दवडीपारवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचार दिवसांचा अल्टीमेटम : पोलिसांनी केली मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-पवनी राज्य मार्गावरील सुरू असलेले बांधकाम दवडीपार बाजार शिवारात रखडल्याने यापरिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांंच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप्त व्यक्त केला. आज सकाळी महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी रात्रीला झालेल्या दमदार पावसामुळे दवडीपार येथील नाल्यांमध्ये पाणी साचले. घरामध्ये पाणी शिरले. रखडलेल्या बांधकामामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या बांधकामामुळे पावसाने पितळ उघडे केल्याने दवडीपार वासीयांमध्ये एकच संताप उसळला. त्यांनी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती भंडारा पोलिसांना होताच पोलिसांचा ताफा दवडीपार येथे पोहचला. संतप्त नागरिकांना पोलिसांनी आश्वस्त केले.आंदोलनकर्त्यांनी जर येत्या चार दिवसात या महामार्गाचे बांधकाम चालू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी सरपंच अश्विनी मडावी, उपसरंच भागवत हजारे, सदस्य प्रमोद गोस्वामी, ईरफान पठान, संजय मडावी, पोलीस पाटील प्रफूल धुर्वे, शिवाजी ग्रृपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा