लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-पवनी राज्य मार्गावरील सुरू असलेले बांधकाम दवडीपार बाजार शिवारात रखडल्याने यापरिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांंच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप्त व्यक्त केला. आज सकाळी महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी रात्रीला झालेल्या दमदार पावसामुळे दवडीपार येथील नाल्यांमध्ये पाणी साचले. घरामध्ये पाणी शिरले. रखडलेल्या बांधकामामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या बांधकामामुळे पावसाने पितळ उघडे केल्याने दवडीपार वासीयांमध्ये एकच संताप उसळला. त्यांनी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती भंडारा पोलिसांना होताच पोलिसांचा ताफा दवडीपार येथे पोहचला. संतप्त नागरिकांना पोलिसांनी आश्वस्त केले.आंदोलनकर्त्यांनी जर येत्या चार दिवसात या महामार्गाचे बांधकाम चालू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी सरपंच अश्विनी मडावी, उपसरंच भागवत हजारे, सदस्य प्रमोद गोस्वामी, ईरफान पठान, संजय मडावी, पोलीस पाटील प्रफूल धुर्वे, शिवाजी ग्रृपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
रस्ता बांधकाम रखडल्याने दवडीपारवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST
भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
रस्ता बांधकाम रखडल्याने दवडीपारवासी संतप्त
ठळक मुद्देचार दिवसांचा अल्टीमेटम : पोलिसांनी केली मध्यस्थी