शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रस्ता बांधकाम रखडल्याने दवडीपारवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचार दिवसांचा अल्टीमेटम : पोलिसांनी केली मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-पवनी राज्य मार्गावरील सुरू असलेले बांधकाम दवडीपार बाजार शिवारात रखडल्याने यापरिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांंच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप्त व्यक्त केला. आज सकाळी महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी रात्रीला झालेल्या दमदार पावसामुळे दवडीपार येथील नाल्यांमध्ये पाणी साचले. घरामध्ये पाणी शिरले. रखडलेल्या बांधकामामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या बांधकामामुळे पावसाने पितळ उघडे केल्याने दवडीपार वासीयांमध्ये एकच संताप उसळला. त्यांनी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती भंडारा पोलिसांना होताच पोलिसांचा ताफा दवडीपार येथे पोहचला. संतप्त नागरिकांना पोलिसांनी आश्वस्त केले.आंदोलनकर्त्यांनी जर येत्या चार दिवसात या महामार्गाचे बांधकाम चालू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी सरपंच अश्विनी मडावी, उपसरंच भागवत हजारे, सदस्य प्रमोद गोस्वामी, ईरफान पठान, संजय मडावी, पोलीस पाटील प्रफूल धुर्वे, शिवाजी ग्रृपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा