शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब लागवडीसाठी जिद्द आवश्यक

By admin | Updated: December 26, 2016 00:58 IST

डाळींब लागवड करीत असताना शेतकऱ्यांनी जिद्द, कष्ट आणि अभ्यासवृत्ती बाळगणे आवश्यक

डी.एस. गायकवाड : ग्रीन पॅराडाईस फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उपक्रम भंडारा : डाळींब लागवड करीत असताना शेतकऱ्यांनी जिद्द, कष्ट आणि अभ्यासवृत्ती बाळगणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन डी.एस. गायकवाड यांनी केले. ग्रीन पॅराडाईस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमीटेड व हरितवेल कृषी व ग्रामीण विकास बहु. संस्था भंडारा यांच्या वतीने आयोजित डाळींबाच्या शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. जिल्ह्यात डाळींब पिकाचा वाढता कल लक्षात घेता काही उत्सूक तसेच शेतीमध्ये आवड असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग व तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकास घडवून आणण्यास सुरुवात केली. याचे उदाहरण म्हणजे मागील तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी डाळींब शेतीची लागवड केली आहे. डाळींब शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास मिळणारा नफा देखील मोठा आहे. परंतु डाळींब मुख्यत: कोरड्या व कमीपावसाचे ठिकाणचे पीक असून जिल्ह्यातील हवामान पिकास पाहिजे तसे अनुकुल नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना डाळींब बागेमध्ये बहार, कीड व रोगाच्या व्यवस्थापन करण्यास अडचणी येत आहेत. सध्या जिल्ह्यात २५ ते ३० एक क्षेत्रावर डाळींब बागाची लागवड केली आहे. परंतु वर्षानुवर्ष फक्त भात पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांना डाळींब उत्पादनाविषयी तांत्रिक ज्ञान व योग्य माहिती उपलब्ध नसल्याने उभारलेल्या बागेमधून पाहिजे तसा नफा मिळत नाही. डाळींब लागवड केलेल्या शेतकऱ्यांना डाळींब उत्पादनाविषयी तांत्रिक माहिती उपलब्ध होेण्याचे उद्देशाने ग्रीन पॅराडाईस फॉर्मन प्रोड्युसर कंपनी लिमीटेड व हरितवेल कृषी व ग्रामीण विकास संस्था समृद्धीनगर, भंडारा यांच्या वतीने कंपनीच्या प्रशिक्षण सभागृहात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आसावरी पात्रीकर, डॉ.गिरीश निखाडे, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड, तात्रिक तंत्र व्यवस्थापक अपेक्षा बोरकर आदी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात डाळींब पिकाविषयी मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांना लागवडीचे यशस्वी मंत्र सांगताना यामध्ये लागवड तंत्रज्ञान करीत योग्य जमीन तयार करणे, जलव्यवस्थापन, हवामान रोप (वाण), डाळींब लागवडीपासून तर फळ धारणा होवून काढणीपर्यंत लागणारे अन्नद्रव्य, खताचे व्यवस्थापन, एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन दोन झाडातील अंतर झाडाला आकार देण्याची पद्धत, छाटणी बागेला ताण देवून यशस्वी भारधानेसाठी तांत्रिक बाबीची माहिती, बहार व्यवस्थापन, फळ तोंडणी तसेच विक्री व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करून डाळींब उत्पादनाच्या यशस्वी मुलमंत्र मंडळ कृषी अधिकारी साकोलीचे डी.एस. गायकवाड यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांचे पिकाबाबत मत जाणून चर्चासत्राद्वारे त्याच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर कंपनीच्या संचालक आसावरी पात्रीकर यांनी कंपनी स्थापनेचे उद्देश शेतकऱ्यांना गरजेनुसार योग्य मार्गदर्शन व मालाच्या प्रतवारीनुसार योग्य बाजारपेठ उपलब्ध करून घेणे आहे आणि पुढे सीताफळ व अ‍ॅपल बोर याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्याचे कंपनीचे निर्णय असल्याचे सांगितले. डॉ.गिरीश निखाडे यांनी, आधुनिक शेतीकरीत असताना जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय श्ेतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर पात्रीकर यांनी आधुनिक शेती करीत असताना शेतकऱ्यांनी वेळोवेळी नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञानार्जन करावे असे मत व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गामध्ये डाळींब लागवड केलेले तसेच नव्याने डाळींब लागवड करण्यास इच्छुक शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्राचे संचालन नितीश किरणापुरे यांनी केले. तर प्रास्ताविक आसावरी पात्रीकर यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ.गिरीश निखाडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)