शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना इतिहासजमा

By admin | Updated: November 17, 2015 00:41 IST

बपेरा गावाच्या हद्दीत बांधकाम करण्यात आलेली सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इतिहास जमा होणार असल्याचे दिसून येत आहे.

योजना भंगारात : गावात अभिनव जलकुंभ, शासनाची निष्क्रियता कारणीभूतरंजित चिंचखेडे चुल्हाड(सिहोरा)बपेरा गावाच्या हद्दीत बांधकाम करण्यात आलेली सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इतिहास जमा होणार असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पाणी मिळाले नाही. ही शोकांतिका आहे.वैनगंगा व बावनथडी या बारमाही वाहणाऱ्या नद्याच्या खोऱ्यात बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आहेत. पंरतु नियोजन शुन्यतेमुळे या गावात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याचे संकट गावकऱ्यांवर येत आहे. या गावात नळ योजना असून गावकऱ्यांची तहान भागवित असले तरी शुध्द पाणी पुरवठ्याची 'नो गॅरंटी' आहे. या नळ योजनांनी जलशुध्दीकरणाची सोय नाही. नदीपात्रातून उपसा करण्यात येणारे पाणी थेट नागरिकांना दिले जात आहे. जलकुंभात केवळ ब्लिचींग पावडरचा आधार आहे. दरम्यान या गावांना शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेचे गावा-गावात अभिनव जलकुंभ उभ्या करण्यात आलेल्या आहेत.या योजनेने सुरुवातीपासुन कटुसत्य अनुभवले आहे. योजनेच्या विकासामुळे सातत्याने लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष झाले आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रातुन खासदार झाले. या शिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले आहे. पंरतु या पदाचा उपयोग तहान भागविण्यासाठी झाला नाही. या परिसरात येरली आणि सिहोरा अशा दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निरंतर सुरु आहेत. पंरतु प्रशासनाला सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला न्याय देता आले नाही.सध्या या योजेनत लोखंडी साहित्य लंपास झाली आहेत. विजेची उपकरणे चोरीला गेली आहेत. अनेक साहित्यांना गंज चढलेला आहे. केवळ योजनेचा सांगाडा शिल्लक आहे. पुन्हा या योजनेची पुर्नबांधणी करतांना लाखो रुपयाची गरज पडणार आहे. विजेचे देयके थकल्याने विज वितरण कंपनी कान टवकारुन आहे. विज पुरवठा आधीच खंडीत करण्यात आला आहे. या योजनेची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. सुरक्षा करणे करिता योजनेत आता काही शिल्लक नाही. पाण्याला ग्रामीण भागात पुण्य समजले जात असताना यंत्रणा किती गंभीर आहे. त्याचे हे ताजे उदाहरण आहे. हक्काचे पाणी पुरवठा योजना नियोजनाअभावी लंगडी झाली आहे. या योजनेची अभिनव टाकी देवरी (देव) गावात आहे. या टाकीचे एक बुंद पाणी अनुभवला नाही. गावात टाकी असल्याने अन्य योजना मंजुर करताना डोकदुखी होत आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे गृहगाव आहे. त्यांचे नळ योजना मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रात तिन महिला नेतृत्व करीत आहेत. या शिवाय बहुतांश गावात महिला सरपंच आहेत. पाण्याची असणारी झळ त्यांनी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामसभेत योजना पुर्ववत सुरु ठेवण्यासाठी ठराव घेण्याचे पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी राजकीय इच्छेसह पुढाकाराची गरज निर्माण झाली आहे.