शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात लाल मिरचीने दिली शेतकऱ्यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST

पालांदूर (चौ.) : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना शेतीही त्याला अपवाद कशी ठरणार. शेतमालाचे त्यातही भाजीपाल्याचे ...

पालांदूर (चौ.) : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना शेतीही त्याला अपवाद कशी ठरणार. शेतमालाचे त्यातही भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला. अशातच मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मिरची शेतातच पिकू देऊन लाल मिरचीचे उत्पन्न घेणे सुरू केले. त्यामुळे या संकटात शेतकऱ्यांना लाल मिरचीने चांगलीच साथ दिल्याचे पालांदूर परिसरात दिसत आहे.

दरवर्षी शेतकरी आपल्या सोयीने बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेतात. प्रचंड परिश्रम घेऊन शेतात लागवड करतात. मात्र नैसर्गिक प्रकोप शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेला असतो. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षीही तसेच कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे. तालुकास्तरावरच्या बाजारपेठा प्रभावित झाल्या आहेत. भाजीपाला बाहेर जाणे थांबले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गडगडले. नाईलाजाने शेतकऱ्यांना दोन ते चार रुपये किलोने वांगे, टोमॅटो विकावे लागले. पानकोबी, फुलकोबीचा गड्डा तर एक रुपयाला विकण्याची वेळ आली. अशा स्थितीत पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना लाल मिरचीने साथ दिली. ३० रुपये किलो असलेला दर १५ रुपये किलोपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी शेतातील मिरची न तोडण्याचा निर्णय केला. मिरची लाल पिकविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला.

साडेतीन किलो हिरव्या मिरचीचे एक किलो लाल मिरचीएवढे वजन भरते. लाल मिरचीचे दर सध्या १४० रुपये प्रती किलो आहे. लाल मिरचीचा हंगाम सुरू झालेला आहे. अनेक जण मिरची खरेदी करून ठेवतात. त्यामुळे लाल मिरचीला मागणी आहे. आजच्या दराचा विचार केल्यास शेतकऱ्यांना यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. लाल मिरची विकली गेली नाही तर शीतगृहात नागपूरला ठेवण्याची सोय आहे असे प्रगतीशील शेतकरी अरुण पडोळे यांनी सांगितले.

बाॅक्स

कसारी मिरचीचे भाव गगनाला

कसारी अर्थात बोट मिरचीचे भाव गगनाला भिडले आहे. २३० ते २५० रुपये एवढा दर मिळत आहे. चुलबंद खोऱ्यात पालांदूर परिसरात या मिरचीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. शहरी भागात या मिरचीला मागणी असल्याची माहिती मिरची सातराचे व्यवस्थापक सुखदेव हटवार यांनी सांगितले.

बाॅक्स

महिला मजुरांना मिळाले काम

मिरची तोडण्यासाठी महिला मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील शेकडो हातांना काम मिळाले आहे. परिसरात मिरचीचे लालचुटूक सातरे सजले आहेत. दररोज या मिरचीवर लक्ष देण्यासाठी शेतकरी खपत आहे. आतापासून पाच किलो, दहा किलो मिरचीची मागणी सुरू झाली आहे. किमान पाच ते सात क्विंटल मिरची स्थानिक ग्राहकांना विकली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाचणार असून ग्राहकांनाही ती कमी किमतीत मिळेल. पालांदुरलासुद्धा लाल मिरचीचा मोठा बाजार भरतो. सध्या पालांदूर परिसरात मिरचीला चांगली मागणी असून मजुरांनाही काम मिळाल्याने कोरोना काळात चांगलाच दिलासा मिळत आहे.