शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

अपघातानंतरही राजापूर-नाकाडोंगरी रस्ता ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:11 IST

तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिलांचे बळी गेल्यानंतरही या रस्त्याची अवस्था ‘जैसे-थे’च आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिलांचे बळी गेल्यानंतरही या रस्त्याची अवस्था ‘जैसे-थे’च आहे.तुमसर कटंगी हा आंतरराज्यीय मार्ग क्रमांक ३५५ अतिशय वर्दळीचा आहे. अहोरात्र या मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरु असते. गुळगुळीत असलेल्या या रस्त्यावरून भरधाव वाहने धावतात. राजापूर ते नाकाडोंगरी दरम्यान मोठे वळण आहे. त्याचा आता यू चा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाली झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनचालकाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. तेथेच घात होतो. आतापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झालेत. अनेकांचे प्राण गेलेत. चार दिवसांपूर्वीच प्रवासी जीप एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून तीन महिला जागीच ठार झाल्या. तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग उपाययोजना करेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु चार दिवस झाले तरी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच काम हाती घेतले नाही. रस्त्यावर झुडुपे वाढली असून ती तात्काळ कापण्याची गरज आहे. तसेच या ठिकाणी अपघातप्रवण स्थळाचा फलक आणि गतीरोधक बांधण्याची गरज आहे. परंतु अपघाताला आमंत्रण देणाºया या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यावर या रस्त्याची दुरुस्ती करणार असा सवाल नागरिक करीत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पंचायत समिती सदस्य शिशूपाल गौपाले, ठाकचंद मुंगुसमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. हा रस्ता अपघातमुक्त करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या राज्य मार्गावरून राजापूर-नाकाडोंगरी यू टर्न आला की वाहन चालकांच्या मनात धडकी भरते. प्रवाशांच्या जीवावर उठलेल्या या यू टर्न वरील झाडे झुडुपे तात्काळ तोडली नाही तर आंदोलनाचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागालाही सूचना दिली आहे. परंतु चार दिवसांनंतरही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट दिसते.राजापूर-नाकाडोंगरी वळण मार्गावरील झुडपे तात्काळ काढण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अपघातानंतरही बांधकाम विभागाला जाग आली नाही. बांधकाम विभागाला पुन्हा अपघाताची प्रतीक्षा आहे काय?-शिशुपाल गौपाले, पंचायत समिती सदस्य, आष्टी.