शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

अपघातानंतरही राजापूर-नाकाडोंगरी रस्ता ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:11 IST

तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिलांचे बळी गेल्यानंतरही या रस्त्याची अवस्था ‘जैसे-थे’च आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिलांचे बळी गेल्यानंतरही या रस्त्याची अवस्था ‘जैसे-थे’च आहे.तुमसर कटंगी हा आंतरराज्यीय मार्ग क्रमांक ३५५ अतिशय वर्दळीचा आहे. अहोरात्र या मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरु असते. गुळगुळीत असलेल्या या रस्त्यावरून भरधाव वाहने धावतात. राजापूर ते नाकाडोंगरी दरम्यान मोठे वळण आहे. त्याचा आता यू चा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाली झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनचालकाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. तेथेच घात होतो. आतापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झालेत. अनेकांचे प्राण गेलेत. चार दिवसांपूर्वीच प्रवासी जीप एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून तीन महिला जागीच ठार झाल्या. तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग उपाययोजना करेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु चार दिवस झाले तरी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच काम हाती घेतले नाही. रस्त्यावर झुडुपे वाढली असून ती तात्काळ कापण्याची गरज आहे. तसेच या ठिकाणी अपघातप्रवण स्थळाचा फलक आणि गतीरोधक बांधण्याची गरज आहे. परंतु अपघाताला आमंत्रण देणाºया या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यावर या रस्त्याची दुरुस्ती करणार असा सवाल नागरिक करीत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पंचायत समिती सदस्य शिशूपाल गौपाले, ठाकचंद मुंगुसमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. हा रस्ता अपघातमुक्त करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या राज्य मार्गावरून राजापूर-नाकाडोंगरी यू टर्न आला की वाहन चालकांच्या मनात धडकी भरते. प्रवाशांच्या जीवावर उठलेल्या या यू टर्न वरील झाडे झुडुपे तात्काळ तोडली नाही तर आंदोलनाचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागालाही सूचना दिली आहे. परंतु चार दिवसांनंतरही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट दिसते.राजापूर-नाकाडोंगरी वळण मार्गावरील झुडपे तात्काळ काढण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अपघातानंतरही बांधकाम विभागाला जाग आली नाही. बांधकाम विभागाला पुन्हा अपघाताची प्रतीक्षा आहे काय?-शिशुपाल गौपाले, पंचायत समिती सदस्य, आष्टी.