शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
3
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
4
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
5
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
6
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
7
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
8
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
9
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
10
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
12
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
13
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
14
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
15
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
16
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
17
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
18
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
19
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
20
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

पालांदूर, आसगाव परिसरात अवकाळी पाऊस

By admin | Updated: March 15, 2016 01:08 IST

दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह

पालांदूर : दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने पालांदूर परिसरात जोरदार हजेरी लावली. परिसरात ४७.६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. जीव धोक्यात घालून शेतमालांची जपवणूक करण्याकरिता धावपळ केली. हलक्या स्वरुपाची गारपीट झाली. परंतु नुकसान समजले नाही. गहू व चना पिकाला सुमार नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी पाऊस व गारपीट अपेक्षितच होती. बागायतीमध्ये वांगा पिकाला झोडपले असून शेतात पाणी साचले आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचा त्रास वाढणार हे निश्चित आहे. फुलकोबी खराब झाली असून भावात नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरडवाहू शेतीला या पावसाने पोषकता दिली असून खरीपाची तयारी करण्याकरिता सकारात्मकता मिळाली आहे. पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले जाते. महाशिवरात्री ते होळीच्या दरम्यान वातावरणात बदल अपेक्षित दिसतो. दोन वर्षापूर्वी खराशी, खुनारी, लोहारा, मचारणा, दिघोरी, पळसगाव आदी गावांना गारपिटीचा जबर दणका बसून घरांचे व शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले होते. आसगावात वादळी पाऊसआसगाव: पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने गव्हाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे मळणीची कामे खोळंबली आहेत.सानगडी परिसरात वादळी पाऊस गारांसहसाकोली/सानगडी : सानगडी परिसरात सासरा, विहिरगाव (बु.), कटंगधरा, सालेबर्डी, सानगाव, शिवणीबांध, झाडगाव, सिरेगाव (बांध), सोमानपूर, गुढरी टोला आदी गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मेघ गर्जनेसह वादळी पाऊस बरसला. यात १६.१ मि.मी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तूर, हरभरा, गहू, उळीद, लाखोरी, मिरची व भाजीपाला वादळामुळे भुईसपाट झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला. परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)पावसाचा कांदा उत्पादनाला फटका४चिचाळ : चिचाळ येथे गेल्या ५ ते ६ वर्षापासून येथील कांद्याची मागणी जिल्ह्याशिवाय पर जिल्ह्यातही वाढल्याने व कांदा पीक हे नगदी पीक असल्याने या वर्षाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र काल रात्री वादळी पावसाने झोडपल्याने शेतात पाणी साचल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे. मागील वर्षी चिचाळ येथील कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जास्त नफा मिळाला. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले असून अंदाजे ७०० एकरामध्ये कांद्याची लागवड केली आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच धान निघाल्यानंतर रब्बी पीक म्हणून गहू, हरभरा, वाटाणा, लाख, उळीद, मुग आदी पीके घेतली जात होती. ज्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी उन्हाळी धान पीक घेत होते. परंतु धानावर येणारी कीड, महागडे रासायनिक खताचे भाव व धानाला नसलेला भाव यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु कांदा या पिकाला धानापेक्षा पाणी व खर्च कमी लागत असल्यामुळे चिचाळ येथील शेतकरी कांदा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. चिचाळ परिसरात २८.२ मि.मी पाऊस बरसला.४कांदा उत्पादन होत असले तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांचेकडे किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात व्यापाऱ्याला विकावा लागतो हे व्यापारी कांदा दुप्पट, तिप्पट भावाने विकून नफा कमावित असतात. परंतु या भागात कांदा साठवणूकगृहाची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊ शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने कोणताही राजकारणी पुढाकार घेताना दिसत नाही. काल रात्री झालेल्या अकाली वादळी पावसाने कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून कांद्याची पाल जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारी उत्पन्न ऐन वेळेवर पावसाने हिसकावली तर शेतातील गहू, हरभरा, वाटाणा, उळीद, मुग, चना, लाख आदी रब्बी पिकांच्या कळपा व गंज्या पाण्यात सापडल्याने संपूर्ण फसल मातीमोल झाली आहे. शासनाने व स्थानिक जि.प. सदस्यांनी सदर परिसराची चौकशी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. ४या संदर्भात कृषी सहाय्यक एकनाथ पाखमोडे यांचेशी संपर्क साधला असता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत कांदा साठवणूकगृह ही शासनाची ४० हजार रुपयाची योजना असून ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिला जातो. यासाठी सातबारा, गाव नमुना, आठ अ, नकाशा रेकॉर्डला कांदा लागवड क्षेत्राची नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणूकगृह उपलब्ध होऊ शकते.