शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर, आसगाव परिसरात अवकाळी पाऊस

By admin | Updated: March 15, 2016 01:08 IST

दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह

पालांदूर : दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने पालांदूर परिसरात जोरदार हजेरी लावली. परिसरात ४७.६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. जीव धोक्यात घालून शेतमालांची जपवणूक करण्याकरिता धावपळ केली. हलक्या स्वरुपाची गारपीट झाली. परंतु नुकसान समजले नाही. गहू व चना पिकाला सुमार नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी पाऊस व गारपीट अपेक्षितच होती. बागायतीमध्ये वांगा पिकाला झोडपले असून शेतात पाणी साचले आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचा त्रास वाढणार हे निश्चित आहे. फुलकोबी खराब झाली असून भावात नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरडवाहू शेतीला या पावसाने पोषकता दिली असून खरीपाची तयारी करण्याकरिता सकारात्मकता मिळाली आहे. पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले जाते. महाशिवरात्री ते होळीच्या दरम्यान वातावरणात बदल अपेक्षित दिसतो. दोन वर्षापूर्वी खराशी, खुनारी, लोहारा, मचारणा, दिघोरी, पळसगाव आदी गावांना गारपिटीचा जबर दणका बसून घरांचे व शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले होते. आसगावात वादळी पाऊसआसगाव: पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने गव्हाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे मळणीची कामे खोळंबली आहेत.सानगडी परिसरात वादळी पाऊस गारांसहसाकोली/सानगडी : सानगडी परिसरात सासरा, विहिरगाव (बु.), कटंगधरा, सालेबर्डी, सानगाव, शिवणीबांध, झाडगाव, सिरेगाव (बांध), सोमानपूर, गुढरी टोला आदी गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मेघ गर्जनेसह वादळी पाऊस बरसला. यात १६.१ मि.मी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तूर, हरभरा, गहू, उळीद, लाखोरी, मिरची व भाजीपाला वादळामुळे भुईसपाट झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला. परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)पावसाचा कांदा उत्पादनाला फटका४चिचाळ : चिचाळ येथे गेल्या ५ ते ६ वर्षापासून येथील कांद्याची मागणी जिल्ह्याशिवाय पर जिल्ह्यातही वाढल्याने व कांदा पीक हे नगदी पीक असल्याने या वर्षाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र काल रात्री वादळी पावसाने झोडपल्याने शेतात पाणी साचल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे. मागील वर्षी चिचाळ येथील कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जास्त नफा मिळाला. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले असून अंदाजे ७०० एकरामध्ये कांद्याची लागवड केली आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच धान निघाल्यानंतर रब्बी पीक म्हणून गहू, हरभरा, वाटाणा, लाख, उळीद, मुग आदी पीके घेतली जात होती. ज्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी उन्हाळी धान पीक घेत होते. परंतु धानावर येणारी कीड, महागडे रासायनिक खताचे भाव व धानाला नसलेला भाव यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु कांदा या पिकाला धानापेक्षा पाणी व खर्च कमी लागत असल्यामुळे चिचाळ येथील शेतकरी कांदा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. चिचाळ परिसरात २८.२ मि.मी पाऊस बरसला.४कांदा उत्पादन होत असले तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांचेकडे किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात व्यापाऱ्याला विकावा लागतो हे व्यापारी कांदा दुप्पट, तिप्पट भावाने विकून नफा कमावित असतात. परंतु या भागात कांदा साठवणूकगृहाची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊ शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने कोणताही राजकारणी पुढाकार घेताना दिसत नाही. काल रात्री झालेल्या अकाली वादळी पावसाने कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून कांद्याची पाल जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारी उत्पन्न ऐन वेळेवर पावसाने हिसकावली तर शेतातील गहू, हरभरा, वाटाणा, उळीद, मुग, चना, लाख आदी रब्बी पिकांच्या कळपा व गंज्या पाण्यात सापडल्याने संपूर्ण फसल मातीमोल झाली आहे. शासनाने व स्थानिक जि.प. सदस्यांनी सदर परिसराची चौकशी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. ४या संदर्भात कृषी सहाय्यक एकनाथ पाखमोडे यांचेशी संपर्क साधला असता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत कांदा साठवणूकगृह ही शासनाची ४० हजार रुपयाची योजना असून ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिला जातो. यासाठी सातबारा, गाव नमुना, आठ अ, नकाशा रेकॉर्डला कांदा लागवड क्षेत्राची नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणूकगृह उपलब्ध होऊ शकते.