शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

गुणवत्तेचा पायाच कच्चा

By admin | Updated: August 8, 2015 00:42 IST

गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा डंका पिटणाऱ्या जिल्हा परिषद शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पायाच कच्चा होत चालला आहे.

विज्ञान, गणित शिक्षकांचा अभाव : शिक्षण विभागाचे दुर्लक्षराजू बांते मोहाडीगुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा डंका पिटणाऱ्या जिल्हा परिषद शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पायाच कच्चा होत चालला आहे. सहावी ते आठवीला विज्ञान, गणित विषय शिकविण्यासाठी तब्बल ४१ बी.एस.सी. अर्हता शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. बालकांचा शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान - गणित विषयाच्या शिक्षकांची उणीव आहे. मोहाडी तालुक्यात बीएससी अर्हता धारक ४५ शिक्षकांची आवश्यकता असून कार्यरत ४२५ शिक्षकांपैकी चारच शिक्षक मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. मोहाडी तालुक्यात सहावी ते सातवीच्या ४० शाळा आहेत. सातवीला आठवा वर्ग जोडलेल्या ११ शाळा आहेत. यात हिवरा, नेरी, पाहुणी, निलजखुर्द, पिंपळगाव, देव्हाडा, मांडेसर, रोहणा, ताळगाव, रोहा व ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. या शाळांपैकी सहावी ते आठवीसाठी बीएससी शिक्षक ताळगाव, हरदोली, नेरी व रोहणा या चारच जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आहेत. आर.टी.ई. कायद्याप्रमाणे सहावी ते आठवीच्या वर्गासाठी विज्ञान विषयासाठी ४५ पदे मंजूर आहे. भाषा विषयासाठी १८ तर सामाजिक शास्त्रासाठी ४१ पदे मंजूर आहेत. यापैकी सामाजिक शास्त्र व भाषा विषयासाठी शिक्षक आहेत. विज्ञान व गणित विषयासाठी शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे भाषा विषयाचेच शिक्षक गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत आहेत. विज्ञान व गणित हे दोनही विषय तांत्रिक आहेत. येथे त्या विषयात शैक्षणिक अर्हता धारक शिक्षक त्या विषयाला न्याय देऊ शकतो. परंतु पर्याय नसल्यामुळे ढकलगाडी सुरू आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा बनत चालला आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. ग्रामीण भागातला मराठी शाळेतला विद्यार्थीसुद्धा दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश करू लागला आहे. परंतु, प्राथमिक शाळेतून विज्ञान व गणित हे दोन विषय कच्चे राहत असल्यामुळे गुणवत्ता कशी वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील शैक्षणिक सत्रात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बीएससी, बारावी विज्ञान तरुणांची स्थानिक पातळीवर मानधनावर नियुक्ती केली होती. हा प्रयोग यशस्वी झाला. मात्र यावर्षीचे नियोजन दिसून येत नाही.अलीकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. दरवर्षी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोवर शिक्षक भरती बंद राहणार असण्याची शक्यता आहे. नवीन भरती करताना ‘टेट’मध्ये ऊतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार आहे. पुढची भरती करताना विज्ञान व गणित विषयासाठी बी.एस.सी. बी.एड. शिक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे. जोपर्यंत नवीन भरती होत नाही तेवढे वर्ष सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.कलम ९ काय सांगतेशिक्षण हक्क कायद्यानुसार व विद्यार्थी शिक्षक प्रमाणानुसार असावेत. जर नसल्यास जिल्हा परिषदेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोतातून शाळा व शिक्षक हक्क कायद्यातील निकषानुसार पूर्तता करावी.विज्ञान व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा अभाव हा मोहाडी तालुक्यातील नाही तर भंडारा जिल्ह्यात आहे. किंबहूना ही समस्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळांचीसुद्धा आहे.