शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेचा पायाच कच्चा

By admin | Updated: August 8, 2015 00:42 IST

गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा डंका पिटणाऱ्या जिल्हा परिषद शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पायाच कच्चा होत चालला आहे.

विज्ञान, गणित शिक्षकांचा अभाव : शिक्षण विभागाचे दुर्लक्षराजू बांते मोहाडीगुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याचा डंका पिटणाऱ्या जिल्हा परिषद शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पायाच कच्चा होत चालला आहे. सहावी ते आठवीला विज्ञान, गणित विषय शिकविण्यासाठी तब्बल ४१ बी.एस.सी. अर्हता शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. बालकांचा शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान - गणित विषयाच्या शिक्षकांची उणीव आहे. मोहाडी तालुक्यात बीएससी अर्हता धारक ४५ शिक्षकांची आवश्यकता असून कार्यरत ४२५ शिक्षकांपैकी चारच शिक्षक मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. मोहाडी तालुक्यात सहावी ते सातवीच्या ४० शाळा आहेत. सातवीला आठवा वर्ग जोडलेल्या ११ शाळा आहेत. यात हिवरा, नेरी, पाहुणी, निलजखुर्द, पिंपळगाव, देव्हाडा, मांडेसर, रोहणा, ताळगाव, रोहा व ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. या शाळांपैकी सहावी ते आठवीसाठी बीएससी शिक्षक ताळगाव, हरदोली, नेरी व रोहणा या चारच जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत आहेत. आर.टी.ई. कायद्याप्रमाणे सहावी ते आठवीच्या वर्गासाठी विज्ञान विषयासाठी ४५ पदे मंजूर आहे. भाषा विषयासाठी १८ तर सामाजिक शास्त्रासाठी ४१ पदे मंजूर आहेत. यापैकी सामाजिक शास्त्र व भाषा विषयासाठी शिक्षक आहेत. विज्ञान व गणित विषयासाठी शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे भाषा विषयाचेच शिक्षक गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत आहेत. विज्ञान व गणित हे दोनही विषय तांत्रिक आहेत. येथे त्या विषयात शैक्षणिक अर्हता धारक शिक्षक त्या विषयाला न्याय देऊ शकतो. परंतु पर्याय नसल्यामुळे ढकलगाडी सुरू आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा बनत चालला आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. ग्रामीण भागातला मराठी शाळेतला विद्यार्थीसुद्धा दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश करू लागला आहे. परंतु, प्राथमिक शाळेतून विज्ञान व गणित हे दोन विषय कच्चे राहत असल्यामुळे गुणवत्ता कशी वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील शैक्षणिक सत्रात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बीएससी, बारावी विज्ञान तरुणांची स्थानिक पातळीवर मानधनावर नियुक्ती केली होती. हा प्रयोग यशस्वी झाला. मात्र यावर्षीचे नियोजन दिसून येत नाही.अलीकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. दरवर्षी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोवर शिक्षक भरती बंद राहणार असण्याची शक्यता आहे. नवीन भरती करताना ‘टेट’मध्ये ऊतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार आहे. पुढची भरती करताना विज्ञान व गणित विषयासाठी बी.एस.सी. बी.एड. शिक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे. जोपर्यंत नवीन भरती होत नाही तेवढे वर्ष सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.कलम ९ काय सांगतेशिक्षण हक्क कायद्यानुसार व विद्यार्थी शिक्षक प्रमाणानुसार असावेत. जर नसल्यास जिल्हा परिषदेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोतातून शाळा व शिक्षक हक्क कायद्यातील निकषानुसार पूर्तता करावी.विज्ञान व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा अभाव हा मोहाडी तालुक्यातील नाही तर भंडारा जिल्ह्यात आहे. किंबहूना ही समस्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळांचीसुद्धा आहे.