शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

जिल्ह्यात ५० हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:25 IST

दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देआधारभूत केंद्र : भंडाराच्या इतिहासात आॅक्टोबरमध्ये पहिल्यांदाच विक्रमी खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने धानपीक संकटात आले. एका पाण्याअभावी धानाचे उत्पन्न घटले. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान काढणीला प्रारंभ केला. काढलेला धान घरी येत आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हा धान विकावा लागत आहे. गतवर्षी पर्यंत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु व्हायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.यावर्षी शासनाने पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात धान खरेदीचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६६ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ५५ केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली. शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला धान घेऊन येत आहेत. हमीभावात धान खरेदी केला जात असून वजनातही कुठे गडबड होत नसल्याचा आधारभूत केंद्रांचा दावा आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धान घेऊन शेतकरी येत आहे. गत आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध आधारभूत केंद्रांवर तब्बल ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाचे पैसेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहे. साकोली तालुक्यातील आधारभूत केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे पैसे शेतकºयांच्या खात्यात वळते करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे दिवाळीचा सण शेतकºयांना आनंदात साजरा करण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटअपुऱ्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. धानाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे शेतकरी बोलत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्रावर महिनाभरात ५० हजार क्विंटल धान विक्रीस आले आहे. हा धान शेतकऱ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकला. त्यामुळे महिनाभरात मोठी विक्री झाल्याचे दिसून येते. दिवाळी नंतर धान केंद्रावर गर्दी ओसरेल असे बोलले जात आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. आता शासनाने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केल्याने चार तालुक्यावर अन्याय होत आहे.