शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जिल्ह्यात ५० हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:25 IST

दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देआधारभूत केंद्र : भंडाराच्या इतिहासात आॅक्टोबरमध्ये पहिल्यांदाच विक्रमी खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने धानपीक संकटात आले. एका पाण्याअभावी धानाचे उत्पन्न घटले. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान काढणीला प्रारंभ केला. काढलेला धान घरी येत आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हा धान विकावा लागत आहे. गतवर्षी पर्यंत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु व्हायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.यावर्षी शासनाने पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात धान खरेदीचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६६ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ५५ केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली. शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला धान घेऊन येत आहेत. हमीभावात धान खरेदी केला जात असून वजनातही कुठे गडबड होत नसल्याचा आधारभूत केंद्रांचा दावा आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धान घेऊन शेतकरी येत आहे. गत आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध आधारभूत केंद्रांवर तब्बल ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाचे पैसेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहे. साकोली तालुक्यातील आधारभूत केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे पैसे शेतकºयांच्या खात्यात वळते करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे दिवाळीचा सण शेतकºयांना आनंदात साजरा करण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटअपुऱ्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. धानाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे शेतकरी बोलत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्रावर महिनाभरात ५० हजार क्विंटल धान विक्रीस आले आहे. हा धान शेतकऱ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकला. त्यामुळे महिनाभरात मोठी विक्री झाल्याचे दिसून येते. दिवाळी नंतर धान केंद्रावर गर्दी ओसरेल असे बोलले जात आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. आता शासनाने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केल्याने चार तालुक्यावर अन्याय होत आहे.