शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जिल्ह्यात ५० हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:25 IST

दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देआधारभूत केंद्र : भंडाराच्या इतिहासात आॅक्टोबरमध्ये पहिल्यांदाच विक्रमी खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने धानपीक संकटात आले. एका पाण्याअभावी धानाचे उत्पन्न घटले. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान काढणीला प्रारंभ केला. काढलेला धान घरी येत आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हा धान विकावा लागत आहे. गतवर्षी पर्यंत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु व्हायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.यावर्षी शासनाने पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात धान खरेदीचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६६ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ५५ केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली. शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला धान घेऊन येत आहेत. हमीभावात धान खरेदी केला जात असून वजनातही कुठे गडबड होत नसल्याचा आधारभूत केंद्रांचा दावा आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धान घेऊन शेतकरी येत आहे. गत आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध आधारभूत केंद्रांवर तब्बल ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाचे पैसेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहे. साकोली तालुक्यातील आधारभूत केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे पैसे शेतकºयांच्या खात्यात वळते करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे दिवाळीचा सण शेतकºयांना आनंदात साजरा करण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटअपुऱ्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. धानाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे शेतकरी बोलत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्रावर महिनाभरात ५० हजार क्विंटल धान विक्रीस आले आहे. हा धान शेतकऱ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकला. त्यामुळे महिनाभरात मोठी विक्री झाल्याचे दिसून येते. दिवाळी नंतर धान केंद्रावर गर्दी ओसरेल असे बोलले जात आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. आता शासनाने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केल्याने चार तालुक्यावर अन्याय होत आहे.