शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

परिसीमनानंतर बदलली राजकीय समीकरणे

By admin | Updated: September 13, 2014 01:05 IST

मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली ज्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांनी यावेळी चांगलीच कंबर कसलेली आहे.

भंडारा : मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली ज्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांनी यावेळी चांगलीच कंबर कसलेली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकच दावेदार नशिब आजमाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही सर्व घडामोड परिसीमनानंतर बदलली. सात तालुक्याच्या भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा, अड्याळ, साकोली आणि लाखांदूर असे पाच विधानसभा क्षेत्र होते. परिसीमनानंतर अड्याळ आणि लाखांदूर हे दोन क्षेत्र गोठवून तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात पाच विधानसभा क्षेत्र समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे दोन आमदार कमी झाले. परिणामी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात झपाट्याने एकाचवेळी बदल घडून आला. मतदारांचीही तीन विधानसभा क्षेत्रात विभागण्यात आले. परिसीमनानंतर विधानसभेची पहिली निवडणूक सन २००९ मध्ये झाली. त्यावेळी लोकसभा क्षेत्र भाजपाकडे होता. लोकसभा क्षेत्रावर भाजपचा कब्जा होता. असे असताना २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून आणल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वारे सुरू होते. २००९ च्या परिसीमनानंतर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस-राकाँ आघाडी आणि भाजपा-शिवसेना युतीमध्ये लढत झाली होती. तुमसर आणि साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत झाली होती. भंडारा क्षेत्रात शिवसेना विरुद्ध राकाँ असा मुकाबला रंगला. यात तुमसरात काँग्रेसचे अनिल बावनकर, भंडाऱ्यात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर साकोलीत भाजपाचे नाना पटोले यांनी बाजी मारली होती.आचारसंहिता घोषित होण्याची सर्वच राजकीय पक्ष वाट बघत होता. आज शुक्रवारला आचारसंहिता घोषित झाली तरी अद्यापही आघाडी आणि युतीतील चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यामुळे उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येकच दावेदार जोमाने तयारीला भिडलेला आहे. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणत दावेदारांचे पराकोटीचे प्रयत्न सुरू आहेत. आता उमेदवारी कुणाला मिळते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)