शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

नळयोजना धूळ खात

By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST

पवनी तालुक्यातील बाम्हणी येथे १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी जलप्राधिकरण योजना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षापासून धुळखात उभी आहे. यामुळे अनेक गावे पिण्याच्या

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील बाम्हणी येथे १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी जलप्राधिकरण योजना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षापासून धुळखात उभी आहे. यामुळे अनेक गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. संबंधित विभागाने याकडे त्वरीत लक्ष देण्यात यावे अशी मागणी उपसरपंच द्रोपद धारगावे यांनी केली आहे.ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला शुद्ध पाणी मिळावे, प्रत्येक पाणी टंचाईपासून मुक्त व्हावे याकरिता प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून ही नळयोजना उभी करण्यात आली. यात वैनगंगा नदीतून थेट पाणी येथे जमा केले जाते. याकरिता इटगाव ते बाम्हणीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेचे पाणी कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, वासेळा, वलनी, शिवनाळा, खैरी, भेंडाळा आदी गावांना पाणी पुरवठा करायचा होता. मात्र ज्या गावात ही योजना आहे त्याच गावाला या योजनेचे पाणी मिळणार नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नााराजी व्यक्त केली जात आहे. या नळयोजनेमध्ये काम दोन वर्षापूर्वीच झाले आहे. मात्र या योजनेची मुख्य पाईप लाईन निकृष्ट दर्जाची टाकली गेल्यामुळे जागोजागी लिकेज सुरु झाला आहे. एवढ्या कमी वेळात पाईप लाईन फुटणे म्हणजे ते किती पट चांगली आहे या बाबत न बोलले बरे. कंत्राटदाराकडून लिकेज झालेली पाईप लाईन सुरळीत करण्याकरिता एक वर्ष लागला. मात्र काम पूर्ण होऊ शकले नाही. अखेर कंत्राटदाराने काम बंद केले. आता ही नळयोजना केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. (वार्ताहर)