शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
15
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
16
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
17
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
18
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
19
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
20
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

खेड्यापाड्यात पळवापळवीचे राजकारण

By admin | Updated: August 4, 2015 00:31 IST

गाव विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नुकत्याच गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात आणि कही खुशी कही गमचे वातावरण दृष्टीस पडले.

कौन बनेगा सरपंच?तीर्थाटन व पैशाच्या सेटिंगची चर्चायुवराज गोमासे करडी (पालोरा)गाव विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नुकत्याच गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात आणि कही खुशी कही गमचे वातावरण दृष्टीस पडले. आता ४ व ६ आॅगस्ट रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कौन बनेगा सरपंच यावर सट्टाबाजार गरम झालेला असून अनेक गावचे नवनियुक्त सदस्य गावातून दिसेनासे झाले आहेत. काही तिर्थाटन तर काही पैशाच्या सेटींगसाठी चर्चेत आहेत. समर्थकांनी त्यासाठी सर्वकाही करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. पंचायत राज अभियानांतर्गत सध्या ग्रामपंचायतींना विविध अधिकार शासनाने प्रदान केलेले आहेत. गावाच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामप्रतिनिधींकडे सोपविण्यात आलेली आहे. शासनाच्या विविध योजना व थेट निधीही दिला जात आहे. विकास कामांचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेखीबरोबर पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार प्रदान झाल्यानेच वरिष्ठ पुढाऱ्यांचे लक्ष सुद्धा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनी वेधून घेतले आहे. पुढाऱ्यांची जननी म्हणून ग्रामपंचयातींना ओळखले जाते ते या समीकरणांमुळेच. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपले व आपल्याच समर्थकांचे अधिराज्य असावे या मानसिकतेतूनच गावाच्या निवडणुकात पैशासारखा पैसा खर्च झाला. विविध कामे मिळावीत म्हणून काही कंत्राटदारांनी अनेक उमेदवारांचा खर्च स्वखिशातून केला. आता सरपंचही आपल्याच मर्जीतला, जवळचा, मित्र, नातेवाईक असावा यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गावातीलच नव्हे तर बाहेर गावातील राजकीय मंडळींना हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. कोण, कुठे, केव्हा, कुणाचे घरी जातो याची तपशिलवार माहिती ठेवली जात आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने घोडेबाजार वधारला आहे. जिथे कमी सदस्य निवडून आले तिथे इतरांच्या मदतीसाठी साम, दाम, दंड, भेद आदी नीती अवनीतीचा वापर सुरु आहे. आपणच सरपंच होणार म्हणून काहींनी तर देवाला नवस फेडण्याच्या नावाखाली कोंबडे व बकऱ्यांच्या ओल्या पार्ट्या सुद्धा दिल्या व देण्याचे कबुलही केले आहे. हा सर्व उपद्व्याप फक्त खुर्चीसाठी केला जात आहे. सरपंच पदाची लालसा नवनियुक्तांना स्वस्थ बसू देत नाही व झोपूही देत नाही. घरचे मंडळी यामुळे कमालीचे त्रस्त आहेत. पळवापळवीचे राजकारण शिगेला पोहचले असून कुठे तिर्थाटन तर कुठे पैशाच्या बळावर सेटींग झाल्याच्या चर्चा आहेत. सरपंचपदासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असून वेळ पडल्यास जमीन विकण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही असा दम समर्थकांकडून व्यक्त होत आहे. कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१४८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूकजिल्ह्यात १४८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक २५ जुलैला ोण्यात आली. जवळपास २ हजार ६१४ उमेदवारांच्या नशिबाचा फैसला २७ जुलैला झाला. दि. ४ व ६ आॅगस्ट रोजी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रिया होणार आहेत. प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी चालविली आहे.