शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:09 IST

संजय साठवणे। लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : शेतकºयांचा धान घरी येताच व्यापाऱ्यांकडून लूट सुरु झाली आहे. रोखीने पैशाचे आमीष ...

ठळक मुद्देसाकोली तालुका : हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकºयांचा धान घरी येताच व्यापाऱ्यांकडून लूट सुरु झाली आहे. रोखीने पैशाचे आमीष दाखवत हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. सणासुदीच्या दिवसात आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी व्यापाºयांच्या भूलथापांना बळी पडत आहे. साकोली तालुक्यात हा प्रकार खुलेआम सुरु असून व्यापारी १५०० रुपये क्विंटलने धानाची खरेदी करीत आहेत.यावर्षी अपुऱ्या पावसाने दुष्काळाचे सावट असताना थोडाथोडका धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. दिवाळी सणापुर्वी धान विकून दिवाळी साजरी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र शासकीय धान खरेदी केंद्रावर वेळेवर पैसे मिळत नसल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत.शासनाने साकोली तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. त्याठिकाणी उच्च प्रतीच्या धानाला १७७० आणि निम्न प्रतीच्या धानाला १७०० दर निश्चित केला आहे. मात्र यावर्षी या केंद्रावर धान देण्यासाठी सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक घेऊन आॅनलाईन अर्ज करावा लागत आहे. यानंतर जो क्रमांक मिळतो त्यानुसार धानाची विक्री करावी लागते. यात बराच कालावधी जातो. तसेच नगदी पैसेही मिळत नाही. उलट हमाल धान मोजणी करताना ७० किलोच्या पोत्यावर दोन किलो ओल्या धानाच्या नावाखाली अधिक घेतात. तसेच पोते मोजतानाही गडबड केली जाते. त्यामुळे शेतकºयांचे तीन ते चार किलो धान अधिक जातात. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.आता या संधीचा फायदा व्यापारी घेत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गावोगाव फिरत असून नगदी पैशाचे आमीष देऊन शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करीत आहेत. १५०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात आहे.अडलेला शेतकरी या व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकत आहे. समोर दिवाळी असल्याने नाईलाजाने तो व्यापाऱ्यांना आपला धान देत आहे. मात्र यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि हमीभावापेक्षा कमी किमतीत धान खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.आधारभूत केंद्रावर जादा धान?शासन निर्णयाप्रमाणे आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा धान मोजताना ४० किलो धान व पोत्याचा ६०० ग्रॅम असे एकुण ४० किलो ६०० ग्रॅम धान मोजावे असा नियम आहे. मात्र बहुतांश आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी करून ४० किलो धानाची पावती दिली जाते. शेतकऱ्याकडून १४०० ग्रॅम धान सुकवून अधिकचे घेतले जातात. येथेही शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. याकडे कोणाचे लक्ष दिसत नाही.