शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

खरेदी केंद्रात धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST

शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देसुरक्षाभिंतही नाही : चौकीदाराअभावी साहित्य चोरीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीची भिती कायम असते.शेतकºयांच्या जिव्हाळ्याचे खरेदी केंद्र म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्र या केंद्रावर शासनाच्या ठरलेल्या दरानुसार धानाचे एकमुस्त पैसे बँक खात्यावर जमा होतात. या विश्वासावरच शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता नेतात. यावर्षीच्या नविन नियमानुसार प्रत्येक शेतकºयाला धान विक्रीला आणल्या नंतर आधी सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणून आधी आॅनलाईन अर्ज करावा लागतो.या अर्जानतर जो नंबर मिळाला असेल त्या नंबरनुसार धानाचे वजन केले जाते. यासाठी कधीकधी एक दोन दिवसाचा वेळ लागतोच. तोपर्यंत शेतकºयांना धान उघड्यावरच स्वत:च्या भरोशावर धान तसाच ठेवावा लागतो.दिवसा या खरेदी केंद्रावर लोकाची ये-जा राहते मात्र रात्री हे खरेदी केंद्र सुनसान होतात. रात्री येथे चौकीदारही नसतो. त्यामुळे धान चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी श्रीराम सहकारी भात गिरणी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रातून रात्री सदु कापगते याचे आठ ते दहा धानाचे बोरे चोरीला गेले होते. याची पोलिसात तक्रारही झाली होती. मात्र तरीही रता्रीचा चौकीदार अजुनपर्यंत ठेवण्यात आला नाही. जर रात्री अचानक पाऊस आला तर धान ओले होऊ शकतात.यासाठी शेडचीही व्यवस्था नाही. तर या खरेदी केंद्रावर दिवसभर शेतकरी व इतराची ये-जा सुरु असते. धान वजन करणे, हुंडी तयार करणे हे काम दिवसातच सुरु असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोाातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे आहे. मात्र अनेक केंद्रावर तेही लावण्यात आलेले नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या सुधारणा कराव्यात अशी शेतकºयांची मागणी आहे.