शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

खरेदी केंद्रात धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST

शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देसुरक्षाभिंतही नाही : चौकीदाराअभावी साहित्य चोरीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीची भिती कायम असते.शेतकºयांच्या जिव्हाळ्याचे खरेदी केंद्र म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्र या केंद्रावर शासनाच्या ठरलेल्या दरानुसार धानाचे एकमुस्त पैसे बँक खात्यावर जमा होतात. या विश्वासावरच शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता नेतात. यावर्षीच्या नविन नियमानुसार प्रत्येक शेतकºयाला धान विक्रीला आणल्या नंतर आधी सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणून आधी आॅनलाईन अर्ज करावा लागतो.या अर्जानतर जो नंबर मिळाला असेल त्या नंबरनुसार धानाचे वजन केले जाते. यासाठी कधीकधी एक दोन दिवसाचा वेळ लागतोच. तोपर्यंत शेतकºयांना धान उघड्यावरच स्वत:च्या भरोशावर धान तसाच ठेवावा लागतो.दिवसा या खरेदी केंद्रावर लोकाची ये-जा राहते मात्र रात्री हे खरेदी केंद्र सुनसान होतात. रात्री येथे चौकीदारही नसतो. त्यामुळे धान चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी श्रीराम सहकारी भात गिरणी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रातून रात्री सदु कापगते याचे आठ ते दहा धानाचे बोरे चोरीला गेले होते. याची पोलिसात तक्रारही झाली होती. मात्र तरीही रता्रीचा चौकीदार अजुनपर्यंत ठेवण्यात आला नाही. जर रात्री अचानक पाऊस आला तर धान ओले होऊ शकतात.यासाठी शेडचीही व्यवस्था नाही. तर या खरेदी केंद्रावर दिवसभर शेतकरी व इतराची ये-जा सुरु असते. धान वजन करणे, हुंडी तयार करणे हे काम दिवसातच सुरु असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोाातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे आहे. मात्र अनेक केंद्रावर तेही लावण्यात आलेले नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या सुधारणा कराव्यात अशी शेतकºयांची मागणी आहे.