शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

३,५८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका

By admin | Updated: June 28, 2015 00:50 IST

जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे.

तिरोडा तालुक्यात अत्यल्प : १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेचे उद्दिष्टगोंदिया : जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रोपवाटिका घालण्यात आली नाही. तिरोडा तालुक्यात केवळ ५५ हेक्टरमध्येच रोपवाटिका घालण्यात आली असून जिल्ह्यात एकूण तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका २३ जूनपर्यंत घालण्यात आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टरमध्ये भातपिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेची गरज असताना प्रमाणशीर पावसाच्या अभावाने आतापर्यंत केवळे तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यातच तिरोडा व सालेकसा तालुक्यात कमी प्रमाणात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतासुद्धा वाढतच आहे.काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे ड्रील पॅडी मशीनचा उपयोग करून बियाणे पेरली जातात. ही मशीन ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला लावली जाते. तसेच ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉन्सप्लान्टर मशीन लावून पऱ्हेसुद्धा लावली जातात. मात्र त्यासाठी रोपांना प्लास्टिक पॉलिथिनमध्ये तयार करावी लागतात. मग त्यांना ट्रॉन्सप्लांटर मशीनमध्ये ठेवून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पऱ्हे लावले जातात. त्यामुळे मजुरांची फारशी गरज पडत नाही व मजुरीसुद्धा वाचते. यावर्षी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची आशा आहे. मात्र कधी पाऊस कधी उन्ह तर कधी संततधार यामुळे त्यांच्या आशा पूर्ण होणार किंवा नाही, याची चिंता सतावत आहे.याशिवाय काही ठिकाणी आवत्यांद्वारे बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतजमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्यांद्वारे पेरणी केल्याने मजुरी वाचते, मात्र २० टक्के उत्पन्न कमी होते. परंतु श्री पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी) आवत्या पद्धतीमध्ये पेंडीमिथीलिन (स्टॉम्प) किंवा ब्युटाक्लोर किंवा पायरोझोसल्पोरान पेरणी आधी व पेरणीनंतर जमिनीवर घालावी लागते. ही औषध रेतीमध्ये मिसळून शेतजमिनीवर फेकावी लागते. तसेच रोवणीनंतर चार ते पाच दिवसांनी तण निघण्यापूर्वी असे केल्यास तणांचा त्रास होणार नाही. औषधाचे प्रमाण दोन किलो प्रति एकर असावे. आवत्या पद्धतीमध्ये २० टक्के कमी उत्पन्न होते. मात्र श्री पद्धतीचा वापर केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटींनी वाढते.-ए.एस. भोंगाडे,तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया