शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

३,५८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका

By admin | Updated: June 28, 2015 00:50 IST

जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे.

तिरोडा तालुक्यात अत्यल्प : १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेचे उद्दिष्टगोंदिया : जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रोपवाटिका घालण्यात आली नाही. तिरोडा तालुक्यात केवळ ५५ हेक्टरमध्येच रोपवाटिका घालण्यात आली असून जिल्ह्यात एकूण तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका २३ जूनपर्यंत घालण्यात आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टरमध्ये भातपिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेची गरज असताना प्रमाणशीर पावसाच्या अभावाने आतापर्यंत केवळे तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यातच तिरोडा व सालेकसा तालुक्यात कमी प्रमाणात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतासुद्धा वाढतच आहे.काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे ड्रील पॅडी मशीनचा उपयोग करून बियाणे पेरली जातात. ही मशीन ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला लावली जाते. तसेच ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉन्सप्लान्टर मशीन लावून पऱ्हेसुद्धा लावली जातात. मात्र त्यासाठी रोपांना प्लास्टिक पॉलिथिनमध्ये तयार करावी लागतात. मग त्यांना ट्रॉन्सप्लांटर मशीनमध्ये ठेवून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पऱ्हे लावले जातात. त्यामुळे मजुरांची फारशी गरज पडत नाही व मजुरीसुद्धा वाचते. यावर्षी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची आशा आहे. मात्र कधी पाऊस कधी उन्ह तर कधी संततधार यामुळे त्यांच्या आशा पूर्ण होणार किंवा नाही, याची चिंता सतावत आहे.याशिवाय काही ठिकाणी आवत्यांद्वारे बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतजमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्यांद्वारे पेरणी केल्याने मजुरी वाचते, मात्र २० टक्के उत्पन्न कमी होते. परंतु श्री पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी) आवत्या पद्धतीमध्ये पेंडीमिथीलिन (स्टॉम्प) किंवा ब्युटाक्लोर किंवा पायरोझोसल्पोरान पेरणी आधी व पेरणीनंतर जमिनीवर घालावी लागते. ही औषध रेतीमध्ये मिसळून शेतजमिनीवर फेकावी लागते. तसेच रोवणीनंतर चार ते पाच दिवसांनी तण निघण्यापूर्वी असे केल्यास तणांचा त्रास होणार नाही. औषधाचे प्रमाण दोन किलो प्रति एकर असावे. आवत्या पद्धतीमध्ये २० टक्के कमी उत्पन्न होते. मात्र श्री पद्धतीचा वापर केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटींनी वाढते.-ए.एस. भोंगाडे,तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया