शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

३,५८४ हेक्टरमध्ये रोपवाटिका

By admin | Updated: June 28, 2015 00:50 IST

जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे.

तिरोडा तालुक्यात अत्यल्प : १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेचे उद्दिष्टगोंदिया : जिल्ह्यात एकूण १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धानाच्या रोपवाटिकेसाठी नियोजित आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रोपवाटिका घालण्यात आली नाही. तिरोडा तालुक्यात केवळ ५५ हेक्टरमध्येच रोपवाटिका घालण्यात आली असून जिल्ह्यात एकूण तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका २३ जूनपर्यंत घालण्यात आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टरमध्ये भातपिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेची गरज असताना प्रमाणशीर पावसाच्या अभावाने आतापर्यंत केवळे तीन हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यातच तिरोडा व सालेकसा तालुक्यात कमी प्रमाणात रोपवाटिका लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतासुद्धा वाढतच आहे.काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे ड्रील पॅडी मशीनचा उपयोग करून बियाणे पेरली जातात. ही मशीन ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला लावली जाते. तसेच ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉन्सप्लान्टर मशीन लावून पऱ्हेसुद्धा लावली जातात. मात्र त्यासाठी रोपांना प्लास्टिक पॉलिथिनमध्ये तयार करावी लागतात. मग त्यांना ट्रॉन्सप्लांटर मशीनमध्ये ठेवून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पऱ्हे लावले जातात. त्यामुळे मजुरांची फारशी गरज पडत नाही व मजुरीसुद्धा वाचते. यावर्षी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची आशा आहे. मात्र कधी पाऊस कधी उन्ह तर कधी संततधार यामुळे त्यांच्या आशा पूर्ण होणार किंवा नाही, याची चिंता सतावत आहे.याशिवाय काही ठिकाणी आवत्यांद्वारे बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतजमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्यांद्वारे पेरणी केल्याने मजुरी वाचते, मात्र २० टक्के उत्पन्न कमी होते. परंतु श्री पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी) आवत्या पद्धतीमध्ये पेंडीमिथीलिन (स्टॉम्प) किंवा ब्युटाक्लोर किंवा पायरोझोसल्पोरान पेरणी आधी व पेरणीनंतर जमिनीवर घालावी लागते. ही औषध रेतीमध्ये मिसळून शेतजमिनीवर फेकावी लागते. तसेच रोवणीनंतर चार ते पाच दिवसांनी तण निघण्यापूर्वी असे केल्यास तणांचा त्रास होणार नाही. औषधाचे प्रमाण दोन किलो प्रति एकर असावे. आवत्या पद्धतीमध्ये २० टक्के कमी उत्पन्न होते. मात्र श्री पद्धतीचा वापर केल्यास उत्पन्न दीड ते दोन पटींनी वाढते.-ए.एस. भोंगाडे,तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया