शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

नियमबाह्य भाजीपाला मार्केटला अभय

By admin | Updated: October 8, 2016 00:34 IST

नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: शिवसेना आंदोलनाचा इशाराभंडारा : नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यावर योग्य तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्यता येईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला आहे.भंडारा शहरातील जलशुध्दीकरण केंद्राजवळील १.५० एकर जागेवर नियमबाहयरित्या, अवैधपणे ठोक भाजी मार्केटचे बांधकाम जेमतेम सुरु झाले असतांनी शिवसेनातर्फे सर्वप्रथम याला विरोध केला. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सदर कामावर स्थगिती दिलेली होती. या स्थगिती दरम्यान बांधकाम पुर्णपणे बंद करावयाची जवाबदारी नगर पालिका प्रशासनाची होती. परंतु जवाबदारीचे भान न ठेवता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळयादेखील भाजी मार्केटचे काम पुर्ण होवून भाजी मार्केट सुरु देखील झाले. तेव्हापासून अनेकदा या विषयांवर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, मुख्यमंत्र्यापर्यंत शिवसेनातर्फे निवेदने देण्यात आलीत.वास्तविक ही जागा चार वर्षापुर्वी मंजुर झालेल्या परंतु त्यासाठी अद्यापही जिल्हा प्रशासनाला जागा न मिळू शकणाऱ्या स्वतंत्र्य महिला रुग्णालयासाठी शिवसेनातर्फे मागण्यात आलेली होती. परंतु विषयाचे गांर्भीर्य न कळलेल्या लोप्रतिनिधीनी भाजी मार्केटला ही जागा द्यावी, याकरिता प्रयत्न केले, हे या दुर्देव म्हणावे लागेल. शिवसेनेतर्फे एक वर्षापासून या विषयावर प्रशासनाशी, शासनाशी भांडून स्वाक्षरी मोहीम राबवून ११ हजार सहयानिशी मुख्यमंत्र्यांना निवेदन अशा अनेक प्रकारे हा विषय तेवतच ठेवला. परंतु राजकीय नेत्यांच्या आर्शीवादाने ठोक भाजी मार्केट सुरु झाला, त्यातही नियमांना धाब्यावरच बसविण्यात आले, बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नगर पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेता, इतर ठोक भाजी व्यापाऱ्यांचा नगर पालिकेशी करारपत्र न होताच अनिधिकृतपणे भाजी मार्केट सुरु झाले. अधिकारी मात्र तोंड पाहतच असल्याने त्यांच्यावर संशय येत असल्याचेही रेहपाडे यांनी म्हटले आहे.नगर पालिका प्रशासनाने ज्या बीटीबी संस्थेशी करारनामा करुन ही जागा ठोक भाजी मार्केटला दिली. मागील वर्षभरापासून चालणाऱ्या या सर्व गैरप्रकाराला पुर्ण विराम देवून ठोक भाजी मार्केटच्या नावाने अवैधरित्या, नियमाबाहयरितीने उभे केलेले बांधकामाची जागा ही जिल्हयातील एकमेव होणाऱ्या महिला रुग्णालयासाठी देवून जिल्हयातील महिला रुग्णांना न्याय देण्यात यावा. प्रशासनाने वेळीच या मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनातर्फे १५ आॅक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा येणार आहे तो मोर्चा भाजी मार्केटकडे वळता करु अशा इशाराही प्रशासनास दिला आहे. त्या दरम्यान काही परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल यांची नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेना तर्फे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, अनिल गायधने, ललित बोंद्रे, नितीन साकुरे, सतिश तुरकर, न.प.सदस्य किरण व्यवहारे, मयुर लांजेवार, पंकज दहीकर, संदिप सार्वे, रोशन कळंबे, सुधीर उरकुडे, जग्गु हजारे, नितेश मोगरे, आशीष महाकाळकर, आकाश जनबंधु, प्रविण कळंबे, प्रकाश देशकर, मयुर जोशी आदींनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)