शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

देशाला गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज!

By admin | Updated: March 9, 2017 00:37 IST

गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी मांडलेल्या लोकशाही संकल्पनेला आध्यात्मिकतेची बैठक होती.

एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादनजवाहरनगर : गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी मांडलेल्या लोकशाही संकल्पनेला आध्यात्मिकतेची बैठक होती. त्यांना पश्चिमात्याची लोकशाहीची संकल्पना मान्य नव्हती, तर तळागाळातील माणसासोबतच उच्चवर्गीय माणसालादेखील समाज संधी प्राप्त होणे म्हणजेच लोकशाही. याकरिता गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज आहे, असे प्रतिपादन उद्घाटक व बीजभाषक डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप जवाहरनगर येथील युजीसी दिल्लीद्वारा पुरस्कृत महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारे ‘गांधी विचारधारा आणि भारतीय लोकशाही मुल्यव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटकीय भाषणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा बोलत होते. अध्यक्षस्थानी रातुमचे माजी विद्वत परिषद सदस्य डॉ. जी.डी. टेंभरे हे होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता आनंद मिश्रा, माजी प्राचार्य ए.एस. उखलकर, रायपूर विश्वविद्यालयाचे भाषा अध्ययन प्रमुख डॉ. व्ही.एन. दुबे उपस्थित होते.आनंद मिश्रा म्हणाले गांधीजी अहिंसेरूपी क्रांतीचे विचारसरणीचे विचारक होते. उपभोग व आवश्यकता यांची तुलनात्मक उत्पादन करण्याची गरज आहे. विकास कशासाठी हा शोध घेण्याची गरज आहे. याकरीता गांधीजींच्या संकल्पनेतील लोकशाही द्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करावी, डॉ. व्ही. दुबे म्हणाले शिक्षण हे श्रमावर आधारित असावा. ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे धाव घेत आहे. याकडे अर्थव्यवस्थाकारांनी विचारात घेवून गांधी विचारधारा रूजवावी व गावाचा विकास साधावा. अध्यक्षीय भाषणात डॉ. जी.डी. टेंभरे म्हणाले गांधीजीच्या संकल्पनेतील भारत घडविण्यासाठी शेवटच्या माणसाचे विकास वाढावा यासाठी गांधीजींच्या आदर्श तत्वाचे पालन करावे. राष्ट्रीय चर्चासत्राच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. अशोक काळे हे होते. जे.एम. पटेल महाविद्यालयाचे डॉ. सुमन देशपांडे यांनी राष्ट्रीय एकात्मता एवं महात्मा गांधी व गांधी रिसर्च फाऊंडेशन जैन हिल्स जळगावचे बी.आर. बोबडे यांनी महात्मा गांधी का राजकीय तत्वज्ञान शोधनिबंध वाचन केले. संचालन डॉ. सुरेंद्र पवार यांनी केले. आभार डॉ. साधना वाघाडे यांनी मानले. दुपारनंतर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष पं. रविशंकर विश्वविद्यालय रायपूरचे भाषा व साहित्य अध्ययन विभाग प्रमुख डॉ. व्ही. दुबे होते. डॉ. मधुलता व्यास व डॉ. उमावती पवार यांनी महात्मा गांधीजी का धार्मिक मानवतावाद शोध निबंध वाचन केले. संचालन डॉ. मुकूंद मेश्राम मौदा यांनी केले. आभार डॉ. राम चौधरी यांनी मानले. देशभरातील ८० प्राध्यापक उपस्थिती संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी यांनी केले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्रप्रसाद पटले यांनी मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)