शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

देशाला गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज!

By admin | Updated: March 9, 2017 00:37 IST

गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी मांडलेल्या लोकशाही संकल्पनेला आध्यात्मिकतेची बैठक होती.

एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादनजवाहरनगर : गांधीजी हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी मांडलेल्या लोकशाही संकल्पनेला आध्यात्मिकतेची बैठक होती. त्यांना पश्चिमात्याची लोकशाहीची संकल्पना मान्य नव्हती, तर तळागाळातील माणसासोबतच उच्चवर्गीय माणसालादेखील समाज संधी प्राप्त होणे म्हणजेच लोकशाही. याकरिता गांधीजींच्या नैतिक लोकशाहीच्या मुल्यांची गरज आहे, असे प्रतिपादन उद्घाटक व बीजभाषक डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप जवाहरनगर येथील युजीसी दिल्लीद्वारा पुरस्कृत महात्मा गांधी अभ्यास केंद्राद्वारे ‘गांधी विचारधारा आणि भारतीय लोकशाही मुल्यव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटकीय भाषणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा बोलत होते. अध्यक्षस्थानी रातुमचे माजी विद्वत परिषद सदस्य डॉ. जी.डी. टेंभरे हे होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता आनंद मिश्रा, माजी प्राचार्य ए.एस. उखलकर, रायपूर विश्वविद्यालयाचे भाषा अध्ययन प्रमुख डॉ. व्ही.एन. दुबे उपस्थित होते.आनंद मिश्रा म्हणाले गांधीजी अहिंसेरूपी क्रांतीचे विचारसरणीचे विचारक होते. उपभोग व आवश्यकता यांची तुलनात्मक उत्पादन करण्याची गरज आहे. विकास कशासाठी हा शोध घेण्याची गरज आहे. याकरीता गांधीजींच्या संकल्पनेतील लोकशाही द्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करावी, डॉ. व्ही. दुबे म्हणाले शिक्षण हे श्रमावर आधारित असावा. ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे धाव घेत आहे. याकडे अर्थव्यवस्थाकारांनी विचारात घेवून गांधी विचारधारा रूजवावी व गावाचा विकास साधावा. अध्यक्षीय भाषणात डॉ. जी.डी. टेंभरे म्हणाले गांधीजीच्या संकल्पनेतील भारत घडविण्यासाठी शेवटच्या माणसाचे विकास वाढावा यासाठी गांधीजींच्या आदर्श तत्वाचे पालन करावे. राष्ट्रीय चर्चासत्राच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. अशोक काळे हे होते. जे.एम. पटेल महाविद्यालयाचे डॉ. सुमन देशपांडे यांनी राष्ट्रीय एकात्मता एवं महात्मा गांधी व गांधी रिसर्च फाऊंडेशन जैन हिल्स जळगावचे बी.आर. बोबडे यांनी महात्मा गांधी का राजकीय तत्वज्ञान शोधनिबंध वाचन केले. संचालन डॉ. सुरेंद्र पवार यांनी केले. आभार डॉ. साधना वाघाडे यांनी मानले. दुपारनंतर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष पं. रविशंकर विश्वविद्यालय रायपूरचे भाषा व साहित्य अध्ययन विभाग प्रमुख डॉ. व्ही. दुबे होते. डॉ. मधुलता व्यास व डॉ. उमावती पवार यांनी महात्मा गांधीजी का धार्मिक मानवतावाद शोध निबंध वाचन केले. संचालन डॉ. मुकूंद मेश्राम मौदा यांनी केले. आभार डॉ. राम चौधरी यांनी मानले. देशभरातील ८० प्राध्यापक उपस्थिती संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी यांनी केले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्रप्रसाद पटले यांनी मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)