शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाश्यांना जीवनदान

By admin | Updated: October 19, 2015 00:52 IST

मानवाच्या जगण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व महत्वाचे आहे. परंतु मनुष्याच्या अमानवीय कृतीमुळे मधमाशांची संख्या कमी होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

वन्यप्रेमींमध्ये आनंद : मधमाशीविना मानवसृष्टी उपाशी मरेल? हरिश्चंद्र कोरे विरली बु.मानवाच्या जगण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व महत्वाचे आहे. परंतु मनुष्याच्या अमानवीय कृतीमुळे मधमाशांची संख्या कमी होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांना वाचविण्यासाठी समाजात जाणीवजागृती निर्माण होण्याची गरज आहे. अशातच विरली बु. येथील एका युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाशांंना मरण्यापासून वाचविले असून त्यांना जीवनदान दिले आहे.विरली बु. किटाळी मार्गावरील एका बाभळीच्या झाडावर सुमारे १२ ते १५ मधमाशांची पोळे वसाहती करून आहेत. या मधमाशांवर परिसरातील मध गोळा करणाऱ्यांची नजर होती. याची जाणीव विरली बु. येथील शेखर धनपाल सिंगाडे या युवकाला होती. त्याने अन्य आपल्या मित्रांच्या मदतीने यावर पाळत ठेवली होती. अशातच मध गोळा करणारा एक गट तेथे मधसंकलनासाठी आला. या युवकांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. आणखी दोन दिवसांनी दुसऱ्या गावातील तसाच एक गट तेथे आला. त्यांना सुद्धा पळवून लावले. एवढेच नाही तर त्या मध गोळा करणाऱ्या गटाला मधमाशांच्या संबंधाने प्रबोधन केले आणि मधमाशांचे शास्त्रशुद्ध मध संकलन प्रशिक्षणासाठी त्यांची नोंद करून घेतली.जैवविविधता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात जाणीवजागृती होत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. मधमाशांचे अस्तित्व हे मनुष्य दृष्टीसाठी लाभदायक आहे. परंतु या मधमाशांच्या विरोधातच काम चालले आहे. मध संकलन करणारे गट प्रत्येक गावात आहेत. परंतु मध संकलन करताना अमानवीय कृत्याने मधाचे संकलन केले जाते. पारंपारिक पद्धतीने मध संकलन करताना अतिशय हिंसक पद्धतीने मधमाशांना जाळण्यात येते. याशिवाय पोळ्यांची मोडतोड करण्यात येते. यामध्ये असंख्य मधमाशा मारल्या जातात. तसेच त्यांच्या अंडी पिलांचा नाश होतो. परिणामी मधमाशांची निसर्गातील संख्या कमी होत असून याचा विपरित परिणाम विविध कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनांवर होतो आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तर मानवसृष्टीवर असमतोल होण्याची शक्यता आहे. पर्यायाने मधमाशीविना मनुष्यसृष्टी उपाशी मरेल काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. या जागरूक युवकांच्या कृतीने असंख्य मधमाशांना जीवनदान मिळाले आहे. यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.बी.एस. रहिले, पाणलोट समितीचे सचिव राजेश महावाडे, सामाजिक कार्यकर्ते शिलमंजू सिव्हगडे, अखिल कोरे, भास्कर ब्राम्हणकर, विलास महावाडे यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)मधमाश्यांविषयी महत्त्वाचेमधमाशा शांतताप्रिय असतात. मधमाशा स्वत:हून हल्ला करीत नाहीत.निसर्गातील फुलांतून पराग आणि मकरंद घेऊन मधमाशी मध निर्माण करते.एक मधमाशी दररोज ५०० ते ७०० फुलांना भेट देतात. यामध्ये फुलांचे परागीभवन होऊन पिकांचे उत्पादन वाढते.एका पोळ्यामध्ये सुमारे २० ते २५ हजार मधमाशा असतात.एक मधमाशी ३ कि.मी. परिसरातून मकरंद आणि पराग गोळा करते.