शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा परिसरात राष्ट्रीयकृत बँकांचा अभाव, ग्राहकांची गैरसोय

By admin | Updated: September 2, 2014 23:30 IST

सिहोरा परिसरातील गावे विकासात एक पाऊल पुढे ठेवत असताना, आर्थिक क्षेत्रात थेट नागरिकांना जोडणाऱ्या बँकांची अवस्था दुष्काळासारखी आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या अभावाने बँक आॅफ इंडिया शाखेच्या

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावे विकासात एक पाऊल पुढे ठेवत असताना, आर्थिक क्षेत्रात थेट नागरिकांना जोडणाऱ्या बँकांची अवस्था दुष्काळासारखी आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या अभावाने बँक आॅफ इंडिया शाखेच्या दारात नागरिकांची गर्दी उसळत आहे. यात कार्यरत कर्मचाऱ्यांचा दोष नसतांना असंतोषाचे खापर त्यांच्यावरच फुटत आहेत.सिहोरा परिसरात पाऊण लक्ष लोकसंख्या आहे. यात शासकीय योजना प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांचा आकडा फुगत आहे. या लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याचे निर्देशित आहे. पोस्ट विभागातून प्राप्त होणारे अनुदान बँकेकडे वळते करण्यात आली आहेत. या शिवाय शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी राष्ट्रीयकृत बँकेत धडक देत आहे. ग्रामपंचायत, बचत गट या सर्वांचे आर्थिक व्यवहार बँकेतून होत असताना शेकडो नागरिकांचे रोहयो अंतर्गत बचत खाते उघडण्यात आली आहेत. यामुळे एका व्यक्तीचे बँकेत ५ खाते निर्माण झाली आहेत. या बचत खात्यात मात्र राशीचा दुष्काळ आहे. याआधी गॅस अनुदान प्राप्त करण्यासाठी बचत खाते बंधनकारक करण्यात आले होते. काही महिने ही योजना सुरु ठेवण्यात आली. नंतर योजना बंद करण्यात आली. परंतु खाते उघडण्यासाठी लागणारे ५०० रुपये पाण्यात गेले. याशिवाय स्वस्त धान्य, रॉकेल अनुदानासाठी बचत खाते आदीची सक्ती करण्यात आली होती. त्यातही लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले. नियोजन कर्त्यांचे योजना नागरिकांना आर्थिक तोट्यात घालणाऱ्या घरलेल्या आहेत. परंतु बँकेत मात्र नागरिकांचे खातेच खाते निर्माण झाली आहे. अनेक बचत खाते निर्माण झाल्याने नागरिकांना पुस्तक शोधावे लागत आहे.चुल्हाडात ग्रामीण बँक आहे. या बँकेला १८ गावे जोडण्यात आली आहेत. सिहोऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, सेंट्रल को आॅप बँक आहेत. याशिवाय राष्ट्रीयकृत एकमेव बँक आॅफ इंडिया शाखा आहे. अन्य बँकेच्या शाखेची ओरड आहे. परंतु प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. बँक आॅफ इंडिया शाखेत बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यावर कामाचा वाढता व्याप आहे. या बँकेत खातेदारांची रांगच रांग दिसून येत आहे. यात दोष कर्मचाऱ्याचा नाही. १० वर्षापूर्वी निर्माण झालेले पदे आहेत. यात वाढ झाली नाही. परंतु लोकसंख्या वाढीव प्रमाणे बचत खाते वाढत असताना मुख्य बँक व्यवस्थापन नियोजन करीत नाही. केंद्र शासनाने नुकतीच जनधन योजना आणली आहे. सकाळी ९ वाजताच बँकेच्या दारात महिला आणि पुरुष ठाण मांडून बसत आहेत. या योजनेत जुने बचत खाते जनधन योजनेला संलग्न करणार किंवा नाही. या संदर्भात बँकांना माहिती देण्यात आली नाही. परिणामत: बँकेत धांदल उडत आहे. (वार्ताहर)