शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

तलाव असूनही सिंचनाचा अभाव

By admin | Updated: May 8, 2014 01:31 IST

सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे.

गोबरवाही : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे. तुमसर तालुक्यातील गुढरी खुर्द गावामध्ये सन १९७४ मध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत एक शासकीय तलावाचे निर्माण केला. परंतु ४0 वर्ष लोटूनही या तलावाच्या नहराचे बांधकाम अर्धवट पडले आहेत. तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही.ही खरी शोकांतिका आहे.शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनाकरिता दिले जात आहे. त्यामुळे शासनाला राजस्व प्राप्त होतो. शेतकर्‍यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धानाचे पीक नष्ट होऊन नुकसान सहन करावा लागतो. सन १९८0 मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्यपूर्णझाले आहेत. जवळील मध्य प्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये याच प्रकल्पाचे नहरे व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरूआहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्यअजूनही अर्धवट पडलेले आहे.जे नहरे बनली आहेत तेही आता क्षतिग्रस्त झाले. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे. तुमसर तालुक्यातील सितेकसा गावामध्ये प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. राजीव सागर प्रकल्पातील लेंडेझरी, आलेसूर, रोंधा, मंगरली, पांगडी, सितासावंगी, राजापूर, चिखला, गोबरवाही, हेटीटोला, येदरबुची, पवनारखारी, गणेशपूर, सुंदरटोला, खंदाळ, गुढरी, धामनेवाडा, सोदेपूर आदी गावे ही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत. सर्व गावाकरीता सिंचन सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्ट ईरिगेशनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु बावनथडी प्रकल्पामध्ये एक ही लिफ्ट योजनेचे निर्माण केले नाही ही शोकांतिका आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला सिंचनाची आवश्यकता आहे. (वार्ताहर)