शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

तलाव असूनही सिंचनाचा अभाव

By admin | Updated: May 8, 2014 01:31 IST

सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे.

गोबरवाही : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे. तुमसर तालुक्यातील गुढरी खुर्द गावामध्ये सन १९७४ मध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत एक शासकीय तलावाचे निर्माण केला. परंतु ४0 वर्ष लोटूनही या तलावाच्या नहराचे बांधकाम अर्धवट पडले आहेत. तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही.ही खरी शोकांतिका आहे.शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनाकरिता दिले जात आहे. त्यामुळे शासनाला राजस्व प्राप्त होतो. शेतकर्‍यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धानाचे पीक नष्ट होऊन नुकसान सहन करावा लागतो. सन १९८0 मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्यपूर्णझाले आहेत. जवळील मध्य प्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये याच प्रकल्पाचे नहरे व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरूआहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्यअजूनही अर्धवट पडलेले आहे.जे नहरे बनली आहेत तेही आता क्षतिग्रस्त झाले. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे. तुमसर तालुक्यातील सितेकसा गावामध्ये प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. राजीव सागर प्रकल्पातील लेंडेझरी, आलेसूर, रोंधा, मंगरली, पांगडी, सितासावंगी, राजापूर, चिखला, गोबरवाही, हेटीटोला, येदरबुची, पवनारखारी, गणेशपूर, सुंदरटोला, खंदाळ, गुढरी, धामनेवाडा, सोदेपूर आदी गावे ही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत. सर्व गावाकरीता सिंचन सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्ट ईरिगेशनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु बावनथडी प्रकल्पामध्ये एक ही लिफ्ट योजनेचे निर्माण केले नाही ही शोकांतिका आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला सिंचनाची आवश्यकता आहे. (वार्ताहर)