शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तलाव असूनही सिंचनाचा अभाव

By admin | Updated: May 8, 2014 01:31 IST

सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे.

गोबरवाही : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र शासनाचे मंत्री करीत असले तरी हा दावा पुर्ण झाले हे म्हणणे चुकीचे आहे. तुमसर तालुक्यातील गुढरी खुर्द गावामध्ये सन १९७४ मध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत एक शासकीय तलावाचे निर्माण केला. परंतु ४0 वर्ष लोटूनही या तलावाच्या नहराचे बांधकाम अर्धवट पडले आहेत. तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही.ही खरी शोकांतिका आहे.शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनाकरिता दिले जात आहे. त्यामुळे शासनाला राजस्व प्राप्त होतो. शेतकर्‍यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धानाचे पीक नष्ट होऊन नुकसान सहन करावा लागतो. सन १९८0 मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्यपूर्णझाले आहेत. जवळील मध्य प्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये याच प्रकल्पाचे नहरे व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरूआहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्यअजूनही अर्धवट पडलेले आहे.जे नहरे बनली आहेत तेही आता क्षतिग्रस्त झाले. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे. तुमसर तालुक्यातील सितेकसा गावामध्ये प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. राजीव सागर प्रकल्पातील लेंडेझरी, आलेसूर, रोंधा, मंगरली, पांगडी, सितासावंगी, राजापूर, चिखला, गोबरवाही, हेटीटोला, येदरबुची, पवनारखारी, गणेशपूर, सुंदरटोला, खंदाळ, गुढरी, धामनेवाडा, सोदेपूर आदी गावे ही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत. सर्व गावाकरीता सिंचन सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्ट ईरिगेशनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु बावनथडी प्रकल्पामध्ये एक ही लिफ्ट योजनेचे निर्माण केले नाही ही शोकांतिका आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला सिंचनाची आवश्यकता आहे. (वार्ताहर)