शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

‘हात दाखवा-बस थांबवा’ नावापुरतेच

By admin | Updated: May 29, 2014 23:47 IST

राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली.

भंडारा : राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली. परंतु चालकाच्या मनमानीमुळे ही योजना कागदावरच आहे. हात दाखविल्यानंतर अनेक बसेस थांबत नाही, अशी प्रवाशांची ओरड आहे.प्रवासी हेच दैवत आहे, असे मानणार्‍या एस.टी. महामंडळाने हात दाखवा बस थांबवा ही योजना मोठय़ा गाजावाजाने सुरु केली. परंतु या योजनेला चालक - वाहक प्रतिसाद देत नसल्याने ही योजना कागदोपत्रीच रखडत आहे. या योजनेअंतर्गत बस थांब्याऐवजी दोन चार प्रवासी असेल तर बस थांबविण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहे. परंतु प्रवासी बसथांब्यावर पोहचण्यापूर्वीच बस आलीच व थोड्या अंतरावर असलेल्या प्रवाशांनी हात दाखविला तर चालक बस थांब्याऐवजी भरधाव वेगाने बस पुढे नेतो. परंतु बस थांबविण्याचेही साधे सौजन्यही दाखवित नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ही योजना मृगजळ ठरत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यानिमित्त प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक सोयीस्कर आणि कमी खर्चाचा प्रवास आणि सुरक्षितता या सर्व दृष्टीने एस.टी. महामंडळाला प्रवाशांची पहिली पसंती आहे. असे असले तरी एस.टी. बसेसला हात दाखविण्यातच बराच वेळ निघून जातो. हा प्रकार ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नित्याचाच झाला आहे. या कारणाने नाईलाजास्तव धोक्यात जीव घालून ग्रामस्थांना अवैधरित्या प्रवास करावा लागतो. काही जण जीव धोक्यात घालून प्रवास करण्याच्या भानगडीत पडत नसल्यामुळे ते मुकाट्याने गावाला न जाता वेळ निघून गेल्यामुळे घराकडे परत जाणे पसंत करतात. शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी पास काढतात. मात्र त्यांनाच एस.टी.चा फटका सहन करावा लागतो. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष वेधून शासकीय योजनेचा प्रवाशांना लाभ मिळवून देण्याची मागणी ग्रामीण प्रवाशांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)