शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘हात दाखवा-बस थांबवा’ नावापुरतेच

By admin | Updated: May 29, 2014 23:47 IST

राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली.

भंडारा : राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली. परंतु चालकाच्या मनमानीमुळे ही योजना कागदावरच आहे. हात दाखविल्यानंतर अनेक बसेस थांबत नाही, अशी प्रवाशांची ओरड आहे.प्रवासी हेच दैवत आहे, असे मानणार्‍या एस.टी. महामंडळाने हात दाखवा बस थांबवा ही योजना मोठय़ा गाजावाजाने सुरु केली. परंतु या योजनेला चालक - वाहक प्रतिसाद देत नसल्याने ही योजना कागदोपत्रीच रखडत आहे. या योजनेअंतर्गत बस थांब्याऐवजी दोन चार प्रवासी असेल तर बस थांबविण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहे. परंतु प्रवासी बसथांब्यावर पोहचण्यापूर्वीच बस आलीच व थोड्या अंतरावर असलेल्या प्रवाशांनी हात दाखविला तर चालक बस थांब्याऐवजी भरधाव वेगाने बस पुढे नेतो. परंतु बस थांबविण्याचेही साधे सौजन्यही दाखवित नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ही योजना मृगजळ ठरत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यानिमित्त प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक सोयीस्कर आणि कमी खर्चाचा प्रवास आणि सुरक्षितता या सर्व दृष्टीने एस.टी. महामंडळाला प्रवाशांची पहिली पसंती आहे. असे असले तरी एस.टी. बसेसला हात दाखविण्यातच बराच वेळ निघून जातो. हा प्रकार ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नित्याचाच झाला आहे. या कारणाने नाईलाजास्तव धोक्यात जीव घालून ग्रामस्थांना अवैधरित्या प्रवास करावा लागतो. काही जण जीव धोक्यात घालून प्रवास करण्याच्या भानगडीत पडत नसल्यामुळे ते मुकाट्याने गावाला न जाता वेळ निघून गेल्यामुळे घराकडे परत जाणे पसंत करतात. शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी पास काढतात. मात्र त्यांनाच एस.टी.चा फटका सहन करावा लागतो. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष वेधून शासकीय योजनेचा प्रवाशांना लाभ मिळवून देण्याची मागणी ग्रामीण प्रवाशांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)