शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

दुधात भेसळीचे वाढतेय प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:08 IST

तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देव्यथा ग्रामीण क्षेत्राची : आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत. याचा विपरित परिणाम मानवी जीवनाच्या आरोग्यावर पडत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नुकताच कोजागिरीच्या कार्यक्रम पार पडला आहे. रात्रीच्या चांदण्यात दुध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दुध भेसळयुक्त असल्याने मानवी जीवनाच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे.हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात प्रत्येक दिवसाला २० ते २५ हजार लिटर दुधाची गरज असते.ज्याप्रसंगी शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणाची कमतरता भासत आहेत. दुधाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने याचाच फायदा म्हणून दुधात भेसळ केल्या जाते. दुधात भेसळ लक्षात येऊ नये म्हणून दुग्ध व्यापारी वर्ग नानाविधी युक्त्या वापरल्या जातात.अशी केली जाते दुधात भेसळदुधाचे संकलन वाढविण्याची दुधात पाणी मिसळविले जाते. यासोबतच आरारुट पावडर, मालटोल, मक्यापासून बनविलेले पावडर, मिठ आणि अधिक दुधासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जाते. या पद्धतीचा अवलंब केल्याने दुधात पाणी टाकेल तरी दूध घट्ट दिसते. मात्र यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम पडत आहे. पालोरा परिसरात अनेक अवैधरीत्या दुग्ध व्यवसाय करणारे आहेत. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. दुधात भेसळ ओळखण्याकरिता संबंधित विभागाध्यक्ष यांना देण्यात आली. मात्र या मशीनी फक्त शोभेच्या वस्तू ठरत आहे.मिठाई बनविण्यासाठी होतोय वापरपालोरा, लोणारा, कुर्ला परिसरातून हजारो लिटर दुध दररोज कोंढा येथे पाठविल्या जाते. कोंढा येथे आलेल्या बाहेर देशातून आलेले काही व्यापारी गोड पदार्थाचा वापर करतात. यांना दुग्ध संकलन केंद्रातून दररोज हजारो लिटर दुध पुरवठा केला जातो. हा दुध पुर्णपणे भेसळ असून व्यापाऱ्यांना अल्प दरात विकला जातो. यामुळे दुग्धव्यवसायीक व मिठाई विक्रेते मालामाल होत आहेत. मात्र शेतकऱ्यांना भाव अल्पप्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आपले जनावरे विक्रीला नेत आहे. दुधात भेसळ करणारे जेवढे व्यापारी जबाबदार आहेत तेवढेच वरिष्ठ अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत.