शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

दुधात भेसळीचे वाढतेय प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:08 IST

तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देव्यथा ग्रामीण क्षेत्राची : आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत. याचा विपरित परिणाम मानवी जीवनाच्या आरोग्यावर पडत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नुकताच कोजागिरीच्या कार्यक्रम पार पडला आहे. रात्रीच्या चांदण्यात दुध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दुध भेसळयुक्त असल्याने मानवी जीवनाच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे.हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात प्रत्येक दिवसाला २० ते २५ हजार लिटर दुधाची गरज असते.ज्याप्रसंगी शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणाची कमतरता भासत आहेत. दुधाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने याचाच फायदा म्हणून दुधात भेसळ केल्या जाते. दुधात भेसळ लक्षात येऊ नये म्हणून दुग्ध व्यापारी वर्ग नानाविधी युक्त्या वापरल्या जातात.अशी केली जाते दुधात भेसळदुधाचे संकलन वाढविण्याची दुधात पाणी मिसळविले जाते. यासोबतच आरारुट पावडर, मालटोल, मक्यापासून बनविलेले पावडर, मिठ आणि अधिक दुधासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जाते. या पद्धतीचा अवलंब केल्याने दुधात पाणी टाकेल तरी दूध घट्ट दिसते. मात्र यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम पडत आहे. पालोरा परिसरात अनेक अवैधरीत्या दुग्ध व्यवसाय करणारे आहेत. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. दुधात भेसळ ओळखण्याकरिता संबंधित विभागाध्यक्ष यांना देण्यात आली. मात्र या मशीनी फक्त शोभेच्या वस्तू ठरत आहे.मिठाई बनविण्यासाठी होतोय वापरपालोरा, लोणारा, कुर्ला परिसरातून हजारो लिटर दुध दररोज कोंढा येथे पाठविल्या जाते. कोंढा येथे आलेल्या बाहेर देशातून आलेले काही व्यापारी गोड पदार्थाचा वापर करतात. यांना दुग्ध संकलन केंद्रातून दररोज हजारो लिटर दुध पुरवठा केला जातो. हा दुध पुर्णपणे भेसळ असून व्यापाऱ्यांना अल्प दरात विकला जातो. यामुळे दुग्धव्यवसायीक व मिठाई विक्रेते मालामाल होत आहेत. मात्र शेतकऱ्यांना भाव अल्पप्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आपले जनावरे विक्रीला नेत आहे. दुधात भेसळ करणारे जेवढे व्यापारी जबाबदार आहेत तेवढेच वरिष्ठ अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत.