शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर दीड कोटीची थकबाकी

By admin | Updated: March 15, 2016 00:48 IST

पाणीपट्टी करांची वाढती थकबाकी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने सिहोरा परिसरात वसुली सुरू केली आहे.

शेतकरी चौफेर संकटात : पाटबंधारे विभागाची वसुली सुरूचुल्हाड (सिहोरा) : पाणीपट्टी करांची वाढती थकबाकी लक्षात घेता पाटबंधारे विभागाने सिहोरा परिसरात वसुली सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांवर दिड कोटीची थकबाकी आहे. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भीषण दुष्काळाची वास्तविकता अनुभवल्याने शेतकरी चौफतर संकटात अडकला आहे.सिहोरा परिसरात शेतकऱ्यांना खरिप आणि रब्बी हंगामात सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटपाची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाची आहे. या विभागात सिहोरा स्थित कार्यालयात उजवा व डावा कालवा अशी रचना करण्यात आली असून स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. २००७ पुर्वी या विभागाला ६ हजार ९६० हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्याची जबाबदारी होती. परंतु नंतर यात वाढ करण्यात आली. बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पुर्ण होताच १४ हजार हेक्टर आर शेती सिंचित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. १० ते ११ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यात आली आहे. यात यंत्रणा दोषी नाही. नियोजन शुन्यतेमुळे शेतीत हरितक्रांती घडविण्याचे स्वप्न धुळीस प्राप्त झाले आहे. रिक्त पदाचा अनुशेष, नहर व कालव्याची जीर्ण अवस्था यामुळे सिंचित क्षेत्र वाढविता आलेला नाही. टेलवर पाणी पोहचविण्याची समस्या आजवर निकाली काढण्यात आली नाही. प्रभारी शाखा अभियंते, कनिष्ठ लिपिक आदीचा अनुशेष असल्याने कार्यालयात फक्त रिकाम्या खुर्च्या आहेत. कर्जचाऱ्यांचा अभाव असल्याने पाणी पट्टी कराची वसुली अनेक वर्षापासून प्रभावित ठरत आहे. सेवा निवृत्तीचे उंबरठ्यावर असणारे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी गावात वसुलीसाठी हिंडत आहे. १० घरांची वसुली नंतर थकवा त्यांना माघारी परतण्यास बाध्य करित आहे.उजवा कालवा अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून ८२ लाख ४४ हजार व चालु वर्षाची ६ लाख २१ हजार रूपयाची थकबाकी आहे. याशिवाय डावा कालवा अंतर्गत ३५ लाख ६३ हजार व चालु वर्ष ४ लाख २१ हजार रूपये थकीत आहे, असे एकूण १ कोटी २८ लाख ४९ हजार रूपयाची थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे. दरम्यान यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रती एकरात २८० किलो धानाचे उत्पादन झाले आहे. यामुळे थकबाकीची वसुली प्रभावित झाली आहे. याशिवाय महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पांचा वीज पुरवठा गेल्या वर्षापासून खंडीत करण्यात आला आहे. कोट्यवधीचा प्रकल्प भंगारात निघण्याच्या स्थितीत आहे. (वार्ताहर)रिक्त पदांचे संकटसिहोरा परिसरात पाणी वाटप, पाणी पट्टी करांची वसुली, या शिवाय विकास कामे करण्यासाठी पाठबंधारे विभागाची यंत्रणा असली तरी कार्यालय ओसाड असल्याचे चित्र आहे. दोन शाखा अभियंते प्रभारी आहेत. कनिष्ठ लिपिक, शाखा कारकून नाहीत. येत्या आक्टोबर महिन्यात तीन व चार चे कर्मचारी सेवा निवृत्त होत आहेत. यामुळे या कार्यालयाची धुरा मजुराच्या खांद्यावर येणार आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यांचा वाणवा असल्याने विकास कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचा अभाव आहे. यामुळे विकास कामाची गुणवत्ता दिसून येत नाही.चांदपूर जलाशय अंतर्गत शेती सिंचित करणाऱ्या शेतकऱ्याकडे १ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याने पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित होत आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे. -वाईनदेशकर,शाखा अभियंता, सिहोरा.