शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पाळ फुटून शेकडो एकरातील धानपीक बुडाले

By admin | Updated: September 17, 2016 00:45 IST

मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळ फुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे.

धानपीक जलमय : वरठी-मोहगाव रस्ता वाहून गेला, नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणीवरठी : मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळ फुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे. या भागातील ३० ते ४० शेतकऱ्यांच्या २०० एकरातील धानपीक पाण्यााखाली असल्याचा अंदाज वर्तविला आहे. वरठी गावालगत लघु पाटबंधारे विभागाचे दोन तलाव आहेत. १९८० च्या दशकातील हे तलाव दुर्लक्षीत आहेत. मागील ३५ वर्षापासुन या तलावाकडे लघु पाटबंधारे विभागाने पाहले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. देखभाल दुरूस्ती नसल्यामुळे तलावाच्या एका भागात अनेक दिवसांपासून पाणी वाहत होते. नहराचे पाणी सुरू असल्यामुळे तलावात पाणी भरून होते. आज शुक्रवारला दुपारपासून तलावाच्या पाळीची माती निघणे सुरू झाले होते. त्यातून कमी प्रमाणात पाणी वाहत होते. सायंकाळच्या सुमारास तलावाच्या पाळीच्या मोठ्या भागाने जागा सोडल्यामुळे तलावातील पाणी शेतात शिरले. काही वेळेपुरते संपुर्ण परिसर पाण्यात बुडाले होते. अजुनही शेकडो एकर शेती पाण्याखाली असुन या शेतातील पीक नष्ट झाले आहे. या तलावाच्या परिसरात वरठी, मोहगाव, सोनुली येथील शेतकऱ्यांची शेती आहे. यात पुरूषोत्तम मरघडे, वामन मरघडे, रामप्रसाद मरघडे, भाग्रता देशमुख, झिंगर मरघडे, मंगर मरघडे, प्यारेलाल मरघडे, गुलाब वाल्मीक, लक्ष्मण थोटे, वामन थोटे, शामराव थोटे, नामदेव थोटे, संतोष थोटे, राजु भाजीपाले, विश्वकांत भुजाडे, चंद्रकांत भुजाडे, शशिकांत भुजाडे, पवनदास मेश्राम, दामोधर गायधने, शिवा गायधने, भिवा गायधने, सुधाकर गायधने, गंगाधर गायधने यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे शेतपिक पाण्यात बुडाले आहे. तलावाची पाळ फुटल्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान वरठीचे सरपंच संजय मिरासे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावाची पाळ फुटल्याचा आरोप केला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. (वार्ताहर)देव तारी त्याला कोण मारी !ज्ञानेश्वर मरघडे यांचे शेत तलावाला लागून आहे. घटनेच्या वेळी ज्ञानेश्वर हा शेतातील कामे आटोपून तलावाच्या पाळीने बैलबंडीने जात होता. दरम्यान, पाळ फुटल्याचा त्याला मोठ्याने आवाज आला. त्यानंतर बैल एकाच ठिकाणी थांबले. त्यावेळी बैलबंडी आणि ज्ञानेश्वर हा घटनास्थळापासून केवळ १० फुट अंतरावर होता. आवाजामुळे बैल सैरावैरा पळाले असते तर बैलबंडीसह पाण्यात वाहून गेलो असतो. नशिब बलवत्तर म्हणूनच बचावलो, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरने ‘लोकमत’शी बोलताना दिली.रहदारीचा रस्ता गेला वाहून तलावापासून दोन किमी अंतरावर असलेला वरठी-मोहगाव हा रस्ता पाण्याुळे वाहून गेला. नहराच्या पुलावर पाणी जाण्यासाठी टाकलेल्या पायऱ्या रस्त्यापासून बाहेर निघून पाण्याने वाहून गेल्या. या पाण्याच्या प्रवाहात वरठी मोहगाव रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यामुळे या रस्त्यावरून रहदारी पुर्णत: बंद झाली होती.