शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तासिका तत्त्वावरील गुरुजी शेतमजुरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST

दीड दशकांपासूनचा प्रश्न : जिल्ह्यात शंभरापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त इंद्रपाल कटकवार भंडारा : एम.फील., नेट, सेट, एम. एड्. ...

दीड दशकांपासूनचा प्रश्न : जिल्ह्यात शंभरापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त

इंद्रपाल कटकवार

भंडारा : एम.फील., नेट, सेट, एम. एड्. उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाल्यानंतरही अनेक प्राध्यापकांना अद्यापही पूर्णवेळ नियुक्तीचे आदेश न मिळाल्याने त्यांना तासिका तत्त्वावरच मागील दीड दशकांपासून प्रति तासिका ५४ व ७२ रुपयांप्रमाणे काम करावे लागत आहे. त्यातही आठवड्यातून केवळ ६ ते ८ तासिका मिळत आहे. काही शिक्षकांना काम न मिळाल्याने चक्क शेतमजुरीच्या कामावर जावे लागत आहे.

शासनाने तासिका तत्त्वावरील शिक्षक व प्राध्यापकांना केवळ तीन महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश देऊन बोळवण केली. त्यामुळे उर्वरित ९ महिने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मोलमजुरी करून वेळ मारून न्यावी लागत आहे. काही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी चहाटपरी टाकली तर काही रोजगारहमीच्या कामावर जात आहेत तर काहीजण शेतमजुरी करत आहेत. मात्र, शासनाने अद्यापही तासिका तत्त्वांवरील शिक्षक व प्राध्यापकांची दखल घेतली नाही.

कोट

मी अकरा वर्षांपूर्वी एमएससी बी.एड्. परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षकांची पदभरतीची मी प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. त्यातही नियमितता नसल्याने विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन केवळ आश्वासनावर वेळ मारून नेत आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- श्रीकांत खंडाईत, तासिका तत्त्वावरील शिक्षक.

शासनाने मागील आठ-दहा वर्षांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची एकप्रकारे थट्टाच चालविली आहे. यंदा तर केवळ तीन महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न आहे.

- उमेंद्र तरोणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक

शासनाने मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून शिक्षकांची रिक्त पदे भरली नाहीत. त्यामुळे काहींना तासिका तत्त्वावर खासगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची मर्जी सांभाळत काम करावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास समस्या तत्काळ सुटू शकते.

-चक्रधर राऊत, तासिका तत्त्वावरील

शिक्षक

दीड दशकभरापासून लटकला प्रश्न

शासनाने २०१२ पासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी कुठलीच प्रक्रिया केली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ३५ हजारांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १५ दिवसांत प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तत: केली नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावरील आणि नेट-सेट अर्हताधारक उमेदवारांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे.

एमफीएल बेरोजगारांची समस्या वेगळीच

शासनाने प्राध्यापकांसाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले. काही शिक्षक एमफीएल उत्तीर्ण आहेत. शिक्षक व प्राध्यापकांनी मेहनत घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, ही परीक्षा उत्तीर्ण होऊन जवळपास पंधरा वर्षांचा कालावधी झाला तरी त्यांना अद्यापही नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.

राज्यात प्राध्यापकांची ३५ हजारांवर पदे रिक्त आहेत. पण, अद्यापही शासनाने प्राध्यापकांची पदभरती काढली नाही. त्यामुळे नेट-सेट उत्तीर्ण होऊनदेखील त्यांना तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. त्यातही केवळ तीन ते चार महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळत असल्याने त्यांची समस्या वेगळीच आहे.