शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करेल

By admin | Updated: November 18, 2014 22:49 IST

गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा

पाहणी : सांसद आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी, नाना पटोले यांचे प्रतिपादनभंडारा : गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करु शकते. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा करण्याच्या माझ्या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवडलेल् या गर्रा बघेडा या गावी नानाभाऊ पटोले यांनी गावात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना खा.पटोले बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, सरपंच वसंतराव तरटे व सर्व प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.खा.पटोले म्हणाले, आदर्श गावाची सुरुवात गावाच्या एकोप्यापासून व्हायला पाहिजे. मतभेदाचे सर्व विचार बाजूला ठेवून गावातील जनता काम करण्यासाठी एकत्र येवू आणि गर्रा बघेडा हे महाराष्ट्रासाठी रोल लमॉडेल करू. गावात चकचकीत रस्ते किंवा समाज मंदिर असल्याने गावाचा विकास झाला असे होत नाही. गरीबांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना चांगले जीवनमान जगण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे आदर्श ग्राममध्ये अपेक्षित आहे. यासाठी गावातील सर्व लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, आदर्श गावातील लोकांना श्रम करावे लागणार आहे. सगळ्या योजनांची अंमलबजावणी गावात करून घेण्यासाठी गावातीलच लोकांनाच पुढाकार घेवून प्रयत्न करावयाचा आहे. तुमच्या प्रयत्नांनी हे गाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आदर्श ग्राम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, लोकसहभागातूनच आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी यशस्वी होईल. गावातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या लोकांपर्यंत गावातील संसाधने पोहचविण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. गावात एकही गुन्हा घडणार नाही. महिला सभा, बाल सभा, ग्राम सभा वेळेत घेतल्या जाऊन त्यामध्ये गावाच्या हिताचे नियोजन गावकऱ्यांनी करावयाचे आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी सरपंच वसंतराव तरटे यांनी प्रास्ताविकामध्ये गावाचा लेखाजोखा मांडताना गावातील समस्या सुद्धा विशद केल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य हरेंद्र राहांगडाले, सुरेश राहांगडाले, तुमसरचे पचायत समितीचे सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली. गावात प्रवेश करताच मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)