शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

अखेर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना दिलासा

By admin | Updated: June 2, 2016 02:27 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरु

अशोक पारधी पवनीबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरु आणि वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे, याबाबत . २८ आॅगस्ट २०१५ रोजी शासन आदेश निर्गमीत करण्यात आलेला होता. त्या आदेशान्वये राज्यातील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरून मुख्याध्यापकाशिवाय शाळा अशी स्थिती निर्माण झालेली होती. मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय व विभागीय संघटनांनी हा गंभीर प्रश्न लावून धरल्याने शासनाने २७ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशान्वये अतिरिक्त ठरलेल्या सर्व मुख्याध्यापकांना सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत शाळेत मुख्याध्यापकाचे पदावर कायम राहता येणार आहे.२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णय येण्यापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेले मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकाच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे. परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला होता व त्यानुसार २०१५-१६ ची संचमान्यता करण्यात आलेली होती. संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकाचे पद गोठविण्यात आले होते. शैक्षणिक दर्जावर व गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक यांचेकडे बैठका आयोजित करून मुख्याध्यापक पदाची बाजू प्रभावीपणे मांडली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. २७ मे रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयाद्वारे अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना दिलासा मिळालेला आहे. शासन निर्णयातील प्रस्तावित सुधारणेनुसार शाळांमध्ये मान्य झालेले मुख्याध्यापकाचे पद शासन निर्णयअन्वये अनुज्ञेय ठरत नसल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमधील मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर संबंधित शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यवगण करण्यात यावे. तसेच इयत्ता पाचवीच्या वर्गामुळे मंजूर होणारी शिक्षकांची पदे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पद मंजूर करताना गृहीत ठरण्यात येणार आहेत.