शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

खत, बियाणे बिघडविणार बजेट

By admin | Updated: May 11, 2014 00:06 IST

अतिवृष्टी व गारपिटीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता खत व बियाण्यांच्या भाववाढीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे.

भंडारा : अतिवृष्टी व गारपिटीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता खत व बियाण्यांच्या भाववाढीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे. यंदा खत व बियाण्यांच्या किंमतीत प्रचंड भाववाढ झाली आहे. गतवर्षी ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल मिळणार्‍या सोयाबीन बियाण्याच्या किंमती ७ हजार ९५० रुपयांवर पोहोचल्या आहेत तसेच धानाच्या किमती ४ हजार ५०० रुपयांवरुन ६ हजार रुपयांवर व तूर बियाण्यांच्या किमती ९ हजार ५०० रुपयांवरुन १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या संपूर्ण भाववाढीचा शेतकर्‍याला यंदा जबर फटका सहन करावा लागणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यात सरासरी १४ लाख ९९ हजारर ३२ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यासाठी सुमारे ४ लाख ४६ हजार १२३ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी महाबीज महामंडळाकडून १ लाख ९२ हजार १२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामाला साधारण एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. मात्र बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केली आहे. खत बियाण्यांच्या दुकानातील गर्दी वाढू लागली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर व धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या सोयाबीन पिकाला शेतातच अंकुर फुटले होते. शिवाय अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. त्यामुळे योग्य सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून बियाण्याच्या किंमतीतत ही भाववाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. (नगर प्रतिनिधी) सोयाबीन बियाण्यांवर अनुदान हवे गतवर्षीपर्यंत महाबीजच्या सोयाबीन बियाण्यावर राज्य सरकारकडून प्रति क्विंटलमागे ५०० रुपयाचे अनुदान दिले जात होते. त्याचा शेतकर्‍यांना फार मोठा फायदा मिळत होता. परंतु अलिकडे राज्य सरकारने ते अनुुदान बंद केले आहे. यंदा सोयाबीन बियाण्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. पाच ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार्‍या या बियाण्याच्या किंमती आठ हजार रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. एवढ्या महाग बियाण्याच्या खरेदी करणे विदर्भातील शेतकर्‍यांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंदा पुन्हा महाबीज सोयाबीन बियाण्यावरील अनुदान जाहीर करावे अशी शेतकर्‍यांकडून मागणी पुढे येत आहे.