शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

उंबरठे झिजवून पाय थकले, पण प्रशासनाला पाझर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:56 IST

देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.

ठळक मुद्देघरकूल योजना : पाच वर्षांपासून लाखांदूर तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. त्यासाठी मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र समाजातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना पाच वर्षांपासून घरकुलच मिळाले नाही. दारिद्रयरेषेखालील प्रतीक्षा यादीत नाव असलेल्यांना आधी घरकुलाचा लाभ दिला जात होता. यात अनेक लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागत होते. सत्तांतर झाल्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आले. या सरकारने विविध योजना अंमलात आणल्या. सध्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना गोरगरीबांना मोठा दिलासा देणारी आहे. या योजनेंतर्गत गोरगरीबांना हक्काचे घर दिले जाते. यासाठी शासनाने प्रपत्र ब व प्रपत्र ड याद्या तयार केल्या आहेत. प्रथम प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिल्या जात आहे. मात्र समाजघटकातील कित्येक गरजू व पात्र लाभार्थ्याची नावे प्रपत्र ड यादीत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यातच अनेक श्रीमंताचे नावेही या योजनेत आहे. स्वत:चे मोठे घर असतानाही अनेक जण गरीबांच्या योजनेवर डोळा ठेवत आहे.दुसरीकडे गोरगरीब या योजनेच्या लाभासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू व पात्र लाभार्थी आहेत. परंतु त्यांचे नाव योजनेच्या प्रपत्र ड मध्ये आहे. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.घरकुलाचे काम मंदगतीनेएकीकडे शासन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सांगत आहे. परंतु या योजनेचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. अनेकांचे घरकुल मंजूर झाले. परंतु रेतीअभावी काम रखडले आहे. काहींना घरकुल बांधकामाचा हप्ताही मिळाला नाही. त्यामुळे अनेकांचे हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न अर्धवट आहे.