शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

उंबरठे झिजवून पाय थकले, पण प्रशासनाला पाझर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:56 IST

देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.

ठळक मुद्देघरकूल योजना : पाच वर्षांपासून लाखांदूर तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. त्यासाठी मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र समाजातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना पाच वर्षांपासून घरकुलच मिळाले नाही. दारिद्रयरेषेखालील प्रतीक्षा यादीत नाव असलेल्यांना आधी घरकुलाचा लाभ दिला जात होता. यात अनेक लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागत होते. सत्तांतर झाल्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आले. या सरकारने विविध योजना अंमलात आणल्या. सध्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना गोरगरीबांना मोठा दिलासा देणारी आहे. या योजनेंतर्गत गोरगरीबांना हक्काचे घर दिले जाते. यासाठी शासनाने प्रपत्र ब व प्रपत्र ड याद्या तयार केल्या आहेत. प्रथम प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिल्या जात आहे. मात्र समाजघटकातील कित्येक गरजू व पात्र लाभार्थ्याची नावे प्रपत्र ड यादीत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यातच अनेक श्रीमंताचे नावेही या योजनेत आहे. स्वत:चे मोठे घर असतानाही अनेक जण गरीबांच्या योजनेवर डोळा ठेवत आहे.दुसरीकडे गोरगरीब या योजनेच्या लाभासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू व पात्र लाभार्थी आहेत. परंतु त्यांचे नाव योजनेच्या प्रपत्र ड मध्ये आहे. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.घरकुलाचे काम मंदगतीनेएकीकडे शासन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सांगत आहे. परंतु या योजनेचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. अनेकांचे घरकुल मंजूर झाले. परंतु रेतीअभावी काम रखडले आहे. काहींना घरकुल बांधकामाचा हप्ताही मिळाला नाही. त्यामुळे अनेकांचे हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न अर्धवट आहे.