शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उंबरठे झिजवून पाय थकले, पण प्रशासनाला पाझर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:56 IST

देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.

ठळक मुद्देघरकूल योजना : पाच वर्षांपासून लाखांदूर तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. त्यासाठी मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र समाजातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना पाच वर्षांपासून घरकुलच मिळाले नाही. दारिद्रयरेषेखालील प्रतीक्षा यादीत नाव असलेल्यांना आधी घरकुलाचा लाभ दिला जात होता. यात अनेक लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागत होते. सत्तांतर झाल्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आले. या सरकारने विविध योजना अंमलात आणल्या. सध्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना गोरगरीबांना मोठा दिलासा देणारी आहे. या योजनेंतर्गत गोरगरीबांना हक्काचे घर दिले जाते. यासाठी शासनाने प्रपत्र ब व प्रपत्र ड याद्या तयार केल्या आहेत. प्रथम प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिल्या जात आहे. मात्र समाजघटकातील कित्येक गरजू व पात्र लाभार्थ्याची नावे प्रपत्र ड यादीत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यातच अनेक श्रीमंताचे नावेही या योजनेत आहे. स्वत:चे मोठे घर असतानाही अनेक जण गरीबांच्या योजनेवर डोळा ठेवत आहे.दुसरीकडे गोरगरीब या योजनेच्या लाभासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू व पात्र लाभार्थी आहेत. परंतु त्यांचे नाव योजनेच्या प्रपत्र ड मध्ये आहे. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.घरकुलाचे काम मंदगतीनेएकीकडे शासन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सांगत आहे. परंतु या योजनेचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. अनेकांचे घरकुल मंजूर झाले. परंतु रेतीअभावी काम रखडले आहे. काहींना घरकुल बांधकामाचा हप्ताही मिळाला नाही. त्यामुळे अनेकांचे हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न अर्धवट आहे.