शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले

By admin | Updated: June 11, 2015 00:32 IST

मागील वर्षीची नापिकी, दुष्काळ, उचललेल्या कर्जाची परतफेड, रबी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने, निसर्गाचा ...

पावसाची प्रतीक्षा : हवामानावर बळीराजाची नजर, यांत्रिक शेतीचा फटका, खतांच्या किमती गगनाला भिडल्या, बोगस बियाणे बाजारात दाखलमासळ : मागील वर्षीची नापिकी, दुष्काळ, उचललेल्या कर्जाची परतफेड, रबी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने, निसर्गाचा लहरीपणा यासह अन्य बाबींमुळे शेतकऱ्यांचे तूर्तास खरीप हंगामाचे आर्थिक व इतर नियोजन बिघडल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागातील लग्नसराई जवळपास संपली आहे. लगेच रोहिणी नक्षत्र सुरू झाले. परंतु मशागतीला पूरक असा पाऊस न पडल्याने शेतकरी खरिपाच्या हंगामाकरिता संभ्रमावस्थेत सापडला आहे. गेल्या दोन तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने वातावरणातील तापमान कमालीचे घटले. त्यामुळे शेतकऱ्याला एक आशेचा किरण झळकला. लगेच खरिपासाठी शेतजमिनी तयारीला लागला. परंतु लहरी व बेभरवशाच्या पावसाने पाठ फिरवली व तापमानात पुन्हा वाढ झाली. मौसमी वाऱ्यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही विलंब केला ते आपल्यापर्यंत पोहचतील की नाही, याचीही शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. रोहिणीचा हलका पाऊस जरी झाला तरी शेतकरी मृगामध्ये धुळपेरणीस हिम्मत करतो. मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे यावर्षी सुद्धा धुळपेरणी करावी की नाही, या विवंचनेत सध्या शेतकरी गुरफटला आहे. बहुतांशी शेतकरी दुबार पेरणी टाळण्यासाठी चिखलपेरणी म्हणजे खारी घोटून पऱ्हे भरण्याच्या विचारात आहेत. तर काही शेतकरी आवत्या म्हणजे बाशी करण्याच्या तयारीत आहेत. परंतु इथेही शेतकरी भीतीने ग्रासला आहे. कारण रोहिणीचा पाऊस पडला तर कचरा, तण काढण्यास शेतकऱ्यांना सोयीचे होते परंतु रोहिणी नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना हवामान खात्याचे अंदाज मात्र, शेतकऱ्यांच्या नियोजनात बाधा आणत आहेत. करावे तरी काय, सध्या पेरणीबाबत तर नियोजन बिघडल्याचेच दिसत आहे.जमिनीचा पोत टिकून राहावा, किडीचा प्रादुर्भाव जास्त होवू नये यासाठी शेतकऱ्यांचा शेणखताचा वापर अधिक करण्याकडे कल असतो. परंतु दिवेंदिवस घटत चाललेला पशुधन, चारा टंचाई, पशुखाद्यांच्या वाढत्या किंमती व ट्रॅक्टर व यांत्रिकशेती पद्धती यामुळे पाळीव प्राण्यांची संख्या घटत आहे. पर्यायाने शेणखत सुद्धा दुर्मिळ होत चालला आहे. शेतीला पुरक असा दुग्ध व्यवसाय सुद्धा, दुधाला योग्य भाव नसल्याने परवडत नाही. आणि म्हणून दुभत्या जनावरांची संख्या घटलेली आहे. पर्यायाने शेणखताला सोन्याच्या भावात खरेदी करावा लागत आहे. उत्पादन वाढीसाठी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर करावा लागतो आहे. परंतु त्यांच्याही किंमती गगनाला भिडल्याने, शिवाय किटकनाशकांच्या किंमती आवाक्या बाहेरच्या असल्याने आर्थिक नियोजन सुद्धा बिघडण्याची दाट शक्यता पसरली आहे.संकरित बियाणांचे पेव फुटले आहे. शासकीय यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शनाअभावी बोगस बियाणांना बळी पडण्याचा नेहमीचाच अनुभव शेतकऱ्यांना आहे.अशा वेळी घरच्या शेतीत स्वत: तयार केलेले बियाणे वापरावे की, बाजारातील तथाकथित नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरावे याबाबतीत सुद्धा शेतकरी योग्य नियोजन करण्यात असमर्थ ठरत आहे. माती परीक्षण प्रत्येक शेतकऱ्यांना शक्य नसल्याने कोणता वाण वापरावा, खते किटकनाशके यांचा वापर कसा व किती करायचा, पाणी पुरवठ्याचे साधनांचा अभाव, क्षीण निर्णय क्षमता अशा अनेक समस्यांनी शेतकऱ्यांच्या मनात घर केलेले आहे. त्यामुळे तूर्तास अनेक शेतकरी आर्थिक कोंडीत आहेतच शिवाय खरिपासाठी नियोजन कसे करावे, याही विवंचनेत सापडला आहे. सध्यातरी मृगधारा बरसण्यापर्यंत शेतकऱ्यांचे नियोजन बिघडलेले दिसून येत आहे. (वार्ताहर)