शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करायचे दिवस संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:56 IST

विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामीनाथन आयोग, स्वतंत्र विदर्भ या गोष्टी केंद्रबिंदू होत्या.

ठळक मुद्देनाना पटोले : चप्राड येथे शेतकरी मेळावा व भव्य लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामीनाथन आयोग, स्वतंत्र विदर्भ या गोष्टी केंद्रबिंदू होत्या. परंतु पाहाता पहाता हे सरकार केव्हा आॅनलाईन झाले हा विचार करण्याची गरज आहे. मात्र या सरकारचे दिवस आता भरले. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथील निवडणूकीचा आपल्या बाजुने लागल्यर. ही आपल्या विजयाची नांदी आहे. म्हणुन शेतकरी बांधवांनो, आता संयम ठेवा. कारण आत्महत्या करण्याचे दिवस संपले, असे प्रतिपादन काँग्रेसचे शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.चप्राड येथे भव्य लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून झालेल्या अनेक विकास कामांचे लोकार्पण व शेतकरी मेळावा म्हणून रमेश डोंगरे व चप्राड ग्रामवासी यांच्या प्रयत्नातून आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, जेसा मोटवानी, सभापती मंगला बगमारे, मधुकर लिचडे, जि.प.सदस्या शुध्दमता नंदागवळी, जि.प.सदस्य प्रदिप बुराडे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, सेवादल अध्यक्ष कैलास भगत, जि.प.सदस्य दिपक मेंढे, सरपंच उत्तम भागडकर, सरपंचा कुसुम दिघोरे, उपसरपंच गोपाल घाटेकर आदीउपस्थित होते.पटोले म्हणाले, गत चार वर्षांत यांना राम आठवला नाही किंवा हनुमान आठवला नाही. परंतु आता निवडणुक जवळ येताच यांनी मंदिर वही बनायेंगे व भगवंताचे कास्ट सर्टीफिकेट काढण्याचे काम यांनी सुरू केले आहे, निवडणूक जिंकण्यासाठी अनेक खोटे आश्वासने देऊन टाकली आणि आता जनता यांची कानउघडणी करीत आहे तेव्हा सांगतात की ते सर्व जुमले होते.कार्यक्रमाचे संचालन शेख सर यांनी तर, आभार ओमप्रकाश भुते यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास ढोरे, राजु सोंदरकर, सोपान ढोरे, ज्ञानेश्वर सावलावार, गिरधर बगमारे, राजेंद्र रामटेके, दिलीप वासनिक, प्रभाकर राऊत, नंदलाल ढोरे, महादेव शेंडे, विलास करंडे आदींनी परिश्रम घेतले.