शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करायचे दिवस संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:56 IST

विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामीनाथन आयोग, स्वतंत्र विदर्भ या गोष्टी केंद्रबिंदू होत्या.

ठळक मुद्देनाना पटोले : चप्राड येथे शेतकरी मेळावा व भव्य लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विद्यमान सरकार जनतेची सरकार नसून ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योगपतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, स्मार्ट सीटी आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा अधिक दिसत आहे. यांच्या जाहीरनाम्याचा विचार केल्यास केवळ शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामीनाथन आयोग, स्वतंत्र विदर्भ या गोष्टी केंद्रबिंदू होत्या. परंतु पाहाता पहाता हे सरकार केव्हा आॅनलाईन झाले हा विचार करण्याची गरज आहे. मात्र या सरकारचे दिवस आता भरले. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथील निवडणूकीचा आपल्या बाजुने लागल्यर. ही आपल्या विजयाची नांदी आहे. म्हणुन शेतकरी बांधवांनो, आता संयम ठेवा. कारण आत्महत्या करण्याचे दिवस संपले, असे प्रतिपादन काँग्रेसचे शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.चप्राड येथे भव्य लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून झालेल्या अनेक विकास कामांचे लोकार्पण व शेतकरी मेळावा म्हणून रमेश डोंगरे व चप्राड ग्रामवासी यांच्या प्रयत्नातून आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, जेसा मोटवानी, सभापती मंगला बगमारे, मधुकर लिचडे, जि.प.सदस्या शुध्दमता नंदागवळी, जि.प.सदस्य प्रदिप बुराडे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, सेवादल अध्यक्ष कैलास भगत, जि.प.सदस्य दिपक मेंढे, सरपंच उत्तम भागडकर, सरपंचा कुसुम दिघोरे, उपसरपंच गोपाल घाटेकर आदीउपस्थित होते.पटोले म्हणाले, गत चार वर्षांत यांना राम आठवला नाही किंवा हनुमान आठवला नाही. परंतु आता निवडणुक जवळ येताच यांनी मंदिर वही बनायेंगे व भगवंताचे कास्ट सर्टीफिकेट काढण्याचे काम यांनी सुरू केले आहे, निवडणूक जिंकण्यासाठी अनेक खोटे आश्वासने देऊन टाकली आणि आता जनता यांची कानउघडणी करीत आहे तेव्हा सांगतात की ते सर्व जुमले होते.कार्यक्रमाचे संचालन शेख सर यांनी तर, आभार ओमप्रकाश भुते यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास ढोरे, राजु सोंदरकर, सोपान ढोरे, ज्ञानेश्वर सावलावार, गिरधर बगमारे, राजेंद्र रामटेके, दिलीप वासनिक, प्रभाकर राऊत, नंदलाल ढोरे, महादेव शेंडे, विलास करंडे आदींनी परिश्रम घेतले.