शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

२० वर्षांनंतरही अंशकालीन कर्मचाऱ्यांचा वनवास संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

युवराज गोमासे करडी (पालोरा) : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने दोन वर्षांअगोदर तत्कालीन युती शासनाने कंत्राटी नोकरी व ...

युवराज गोमासे

करडी (पालोरा) : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने दोन वर्षांअगोदर तत्कालीन युती शासनाने कंत्राटी नोकरी व मेगा नोकर भरतीत संधी देण्याच्या हेतूने ४५ वर्षे वयाची अट काढून ५५ वर्षांपर्यंतचे शासन परिपत्रक तसेच कंत्राटी नोकरीचे परिपत्रकही काढला. त्याचवेळी कंत्राटी शासकीय नोकरी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. मध्यंतरी सत्तांतर झाले.

युतीचे सरकार जाऊन महाआघाडीचे सरकार आले. परंतु त्या परिपत्रकाची अंमलबजावणी अद्यापपपर्यंत झालेली नाही. आजही पदवीधर अंशकालीन कर्मचारी कंत्राटी नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याने विलंब का, असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी, या मागणीकरिता पदवीधरांना १८ वर्षे वनवास भोगावा लागला. तत्कालीन आघाडी शासनाच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात अनेकदा आंदोलन करावे लागले. धरणे व आमरण उपोषणाचे हत्यार पाजळण्यात आले. परंतु आघाडी शासनाने नोकरीसाठी न्याय दिला नाही. १५ वर्षांनंतर मागील युतीच्या शासनाकडे न्याय व नोकरी देण्याची मागणी अंशकालीन पदवीधरांच्या संघटनेने अनेकदा केली. धरणे व आमरण उपोषणाचे आंदोलने केली, तेव्हा कुठे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पदवीधरांची नोकरीची आशा पल्लवित केली. १८ वर्षाच्या वनवासानंतर राज्यातील महाराष्ट्र शासनाने ११ डिसेंबर २०१८ ला राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राकडे डाटा एंट्री असलेल्या पदवीधरांसाठी विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेतला.

त्या निर्णयानुसार कंत्राटी पद्धतीने थेट नियुक्ती देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी मागील मंत्रिमंडळाने १० टक्के आरक्षणांतर्गत पदवीधरांची नोकरीवर लागण्याची वयाची ४५ वर्षाची मर्यादा वाढवून ५५ वर्ष केली. त्यासंबंधाचे शासन परिपत्रकसुद्धा तातडीने काढले. त्यानंतर कंत्राटी नोकरीचे शासन परिपत्रकही काढला. परंतु काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी अद्यापही जिल्ह्यात करण्यात आलेली नाही.

दरम्यान, युतीचे सरकार जाऊन महाआघाडीचे सरकार उदयास आले. मात्र, दोन वर्षे लोटल्यानंतरही नोकरी देण्यास वारंवार विलंब केला जात आहे. त्यामुळे महाआघाडीचे सरकार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची थट्टा करणार तर नाही ना? असा प्रश्न पदवीधरांना पडला आहे. परिपत्रकाची अंमलबजावणी करून कंत्राटी नोकरी थेट देण्यात यावी, अशी मागणी व न्याय देण्याची अपेक्षा पदवीधर अंशकालीन कर्मचारी बांधवांनी केली आहे.