शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

अग्निकांडानंतरही आरोग्यवर्धनी केंद्रात मनमर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी निगडित असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्रावर या भीषण घटनेनंतरही मनमर्जी सुरू आहे. येथे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी केंद्रावर पोहोचत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यातील १४६ आरोग्यवर्धनी केंद्रांतर्गत असलेल्या शेकडो रुग्णांना त्याचा फटका बसतो आणि थेट भंडारा गाठावे लागते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार, ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. त्यात दहा चिमुकल्यांचा प्राण गेला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र काही अपवाद वगळता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमर्जी पाहायला मिळत आहे. आरोग्यवर्धनी केंद्र ग्रामीण आरोग्याशी निगडित आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाते. त्यातून त्यांना उपचाराची दिशा मिळते. भंडारा जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिकांची नियुक्ती असते. काही ठिकाणी नर्सिंगमध्ये पदवी असलेल्या उमेदवारांची वर्णी लावली जाते. येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर दोन-तीन दिवस सर्व कर्मचारी आपल्या नियुक्त ठिकाणी दिसत होते. परंतु आता पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती झाली आहे. बहुतांश केंद्रावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची ग्रामीण रुग्णांची ओरड आहे. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. तेथेही अशीच स्थिती असते. परिणामी ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या रुग्णांना पदरमोड करून भंडारा गाठावे लागते. भंडारा जिल्हा रुग्णालय घटनेनंतर अपडेट झाले असले तरी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांकडे पाहण्याची मानसिकता येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत बदलल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या आरोग्यवर्धनी केवळ पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. अग्निकांडाच्या घटनेनंतर या केंद्राचेही ऑडिट होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

बॉक्स

ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे सुविधांचा अभाव

जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. येथे सुरुवातीपासूनच सुविधांचा अभाव दिसत आहे. येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने कुणावर वचक नाही. औषधांचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते. वेळेवर औषधी न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतरही आरोग्य यंत्रणा बोध घ्यायला तयार नसेल तर याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.