शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अग्निकांडानंतरही आरोग्यवर्धनी केंद्रात मनमर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी निगडित असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्रावर या भीषण घटनेनंतरही मनमर्जी सुरू आहे. येथे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी केंद्रावर पोहोचत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यातील १४६ आरोग्यवर्धनी केंद्रांतर्गत असलेल्या शेकडो रुग्णांना त्याचा फटका बसतो आणि थेट भंडारा गाठावे लागते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार, ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. त्यात दहा चिमुकल्यांचा प्राण गेला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र काही अपवाद वगळता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमर्जी पाहायला मिळत आहे. आरोग्यवर्धनी केंद्र ग्रामीण आरोग्याशी निगडित आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाते. त्यातून त्यांना उपचाराची दिशा मिळते. भंडारा जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिकांची नियुक्ती असते. काही ठिकाणी नर्सिंगमध्ये पदवी असलेल्या उमेदवारांची वर्णी लावली जाते. येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर दोन-तीन दिवस सर्व कर्मचारी आपल्या नियुक्त ठिकाणी दिसत होते. परंतु आता पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती झाली आहे. बहुतांश केंद्रावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची ग्रामीण रुग्णांची ओरड आहे. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. तेथेही अशीच स्थिती असते. परिणामी ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या रुग्णांना पदरमोड करून भंडारा गाठावे लागते. भंडारा जिल्हा रुग्णालय घटनेनंतर अपडेट झाले असले तरी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांकडे पाहण्याची मानसिकता येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत बदलल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या आरोग्यवर्धनी केवळ पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. अग्निकांडाच्या घटनेनंतर या केंद्राचेही ऑडिट होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

बॉक्स

ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे सुविधांचा अभाव

जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. येथे सुरुवातीपासूनच सुविधांचा अभाव दिसत आहे. येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने कुणावर वचक नाही. औषधांचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते. वेळेवर औषधी न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतरही आरोग्य यंत्रणा बोध घ्यायला तयार नसेल तर याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.