शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अग्निकांडानंतरही आरोग्यवर्धनी केंद्रात मनमर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी निगडित असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्रावर या भीषण घटनेनंतरही मनमर्जी सुरू आहे. येथे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी केंद्रावर पोहोचत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यातील १४६ आरोग्यवर्धनी केंद्रांतर्गत असलेल्या शेकडो रुग्णांना त्याचा फटका बसतो आणि थेट भंडारा गाठावे लागते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार, ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. त्यात दहा चिमुकल्यांचा प्राण गेला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र काही अपवाद वगळता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमर्जी पाहायला मिळत आहे. आरोग्यवर्धनी केंद्र ग्रामीण आरोग्याशी निगडित आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाते. त्यातून त्यांना उपचाराची दिशा मिळते. भंडारा जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिकांची नियुक्ती असते. काही ठिकाणी नर्सिंगमध्ये पदवी असलेल्या उमेदवारांची वर्णी लावली जाते. येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर दोन-तीन दिवस सर्व कर्मचारी आपल्या नियुक्त ठिकाणी दिसत होते. परंतु आता पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती झाली आहे. बहुतांश केंद्रावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची ग्रामीण रुग्णांची ओरड आहे. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. तेथेही अशीच स्थिती असते. परिणामी ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या रुग्णांना पदरमोड करून भंडारा गाठावे लागते. भंडारा जिल्हा रुग्णालय घटनेनंतर अपडेट झाले असले तरी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांकडे पाहण्याची मानसिकता येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत बदलल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या आरोग्यवर्धनी केवळ पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. अग्निकांडाच्या घटनेनंतर या केंद्राचेही ऑडिट होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

बॉक्स

ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे सुविधांचा अभाव

जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. येथे सुरुवातीपासूनच सुविधांचा अभाव दिसत आहे. येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने कुणावर वचक नाही. औषधांचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते. वेळेवर औषधी न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतरही आरोग्य यंत्रणा बोध घ्यायला तयार नसेल तर याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.